शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
4
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
5
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
6
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
7
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
8
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
9
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
10
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
11
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
12
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
13
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
14
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
15
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
16
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
17
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
18
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
19
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
20
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला

‘नथुराम गोडसे महात्मा होऊच शकत नाही’, गांधी तत्वज्ञानावर भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 12:58 AM

आजचा सनातनी धर्म नथुराम गोडसेची परंपरा मानत आहे. नथुराम गोडसेची प्रवृत्ती सर्वार्थाने निषेधार्ह आहे. आज महात्मा गांधींच्या मारेक-याला देवाच्या जागी प्रस्थापित करण्याचा घाट घातला जात आहे

वसई: आजचा सनातनी धर्म नथुराम गोडसेची परंपरा मानत आहे. नथुराम गोडसेची प्रवृत्ती सर्वार्थाने निषेधार्ह आहे. आज महात्मा गांधींच्या मारेक-याला देवाच्या जागी प्रस्थापित करण्याचा घाट घातला जात आहे. पण, गोडसे हा महात्मा कधीच होऊ शकत नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी वसईत सुवार्ता साहित्य मेळाव्यात बोलताना केले.वसईतील देवतलाव येथील बर्नड भंडारी सभागृहात गांधी जयंतीला सुवार्ता साहित्य मेळावा पार पडला. यावेळी बोलताना सबनीस पुढे म्हणाले की, सत्याचे प्रवासी महात्मा गांधी स्वत:ला सनातनी हिंदू मानत. मात्र, डॉ. दाभोेळकरांची हत्या करणारे सनातनी हिंदू गांधीजींच्या सनातनी हिंदू धर्मातील नाहीत, असा टोलाही सबनीस यांनी आपल्या भाषणात लगावला.महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. गांधींचा महात्मा पंचाधारी आहे. तो गरीबांची वेदना, समस्या जाणतो. मजूर, शेतकरी, शोषित, पीडित यांच्याशी जेव्हा तो संवाद साधतो, तेव्हा तो महात्मा असतो आणि तो जेव्हा इंग्रजांशी वाटाघाटी करीत असे तेव्हा त्याच्यातल बॅरीस्टर जागृत होत असे. त्यांच्या ठायी महात्मा व बॅरिस्टर यांचा सुंदर समन्वय दिसून येतो, असेही प्रा. सबनीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो होते. धर्मा-धर्मातील संवाद, मैत्री यांची कास ख्रिस्तसभा धरते. ख्रिस्तसभा विश्वव्यापी आहे. आपण धर्माने ख्र्स्तिी असलो तरी आपली उपासना ही आपण मराठी भाषेत करीत असतो. आपण मराठी माणसे आहोत. मराठी आपली मातृभाषा आहे. ख्रिस्ती वसईकरांनी मराठी भाषेची जोपासना केलेली आहे. तिचे जतन केलेले आहे. पूर्वी ख्रिस्तसभेची भाषा लॅटीन होती. पण दुसºया व्हॅटिकन परिषदेनंतर जेथे जेथे ख्रिस्ती लोक आहेत, तेथे जी भाषा बोलतात ती त्यांची भाषा असेल, अशी परंपरा सुरु झाली, असे डॉ. मच्याडो यांनी आपल्या भाषणात सांगितले.मेळाव्यात फा. डॉ. रॉबर्ट डिसोजा यांच्या बायबलमधील संदेष्टे, फा. डॉ. एलायस रॉड्रीग्ज यांच्या पेरणी व बायबलचा मराठी अवतार, जॉन गोन्सालवीस यांच्या निवडक बोधकथा व फा. डॉ. नेल्सन फलकाव यांच्या सुबोध ख्रिस्तपुराण या पुस्तकांचे प्रकाशन आर्चबिशप मच्याडो यांच्या हस्ते करण्यात आले.दुसºया सत्रात ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बिवलकर यांनी पत्रकारितेचे बदलते स्वरुप याविषयी आपले मत मांडले. डॉ. नितीन तांडेल यांनी सभोवतालचा निसर्ग हाच तुमचा धन्वंतरी याविषयी मत मांडले. दुपारच्या सत्रात ४२ वर्षे उद्धवस्त शरपंजरी अवस्थेत आयुष्य जगलेल्या परिचारिका अरुणा शानबाग यांच्या जीवनावरील काळीज हादरुन टाकणारा, अरुणा शानबाग यांची वेदना मांडणारी हद्यस्पर्शी एकपात्री प्रयोग मी अरुणा बोलतेय हे डॉ. प्रतिभा जाधव यांनी सादर केला.कविसंमेलनात जसिंटा डायस, सॅबी परेरा, जॉन गोन्सालवीस, जितेंद्र वर्तक, फ्रान्सिस कोळी, रोजिका जांगुल यांनी आपल्या कविता सादर केल्या. समारोपाच्या सत्रात डॉ. विनीत वानखेडे यांनी माझा सामना कॅन्सरच्या रोगाशी याविषयी मन हेलावून टाकणारे आत्मकथन केले.मेळाव्याच्या सुरुवात एस.व्ही.डी. नृत्य अ‍ॅकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या नृत्याने झाली.

टॅग्स :Nathuram Godseनथुराम गोडसेShripal Sabnisश्रीपाल सबनीसVasai Virarवसई विरार