शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

‘नामपाडा’ अडकला लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 23:56 IST

पाच महसुली गावे व १३ आदिवासीपाड्यांची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला शहापूर तालुक्यातील नामपाडा (कुतरकुंड) लघुपाटबंधारे प्रकल्प २०१२ पासून लालफितीत अडकला आहे.

वसंत पानसरे किन्हवली : किन्हवली विभागातील पाच महसुली गावे व १३ आदिवासीपाड्यांची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला शहापूर तालुक्यातील नामपाडा (कुतरकुंड) लघुपाटबंधारे प्रकल्प २०१२ पासून लालफितीत अडकला आहे. निविदा, मुदतवाढ यांची कालमर्यादा संपुष्टात आल्याने हजारो शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. किंबहुना, प्रत्यक्ष प्रकल्पावर १३ कोटी व पर्यायी वनीकरणासाठी एक कोटींचा चुराडा करूनही या प्रकल्पाचे भविष्य अधांतरीच असल्याचे वास्तव समोर आले आहे.टाकीपठार परिसरातील सावरोली ग्रुपग्रामपंचायत क्षेत्रात हिवाळा या जंगलपट्ट्यात कुतरकुंड या डोहावर आघाडी सरकारच्या काळात २००५-०६ मध्ये नामपाडा लघुपाटबंधारे प्रकल्प मंजूर झाला होता. त्यावेळी मुख्य धरणाचे मातीचे बांधकाम, सांडवा विमोचक बांधकाम व इतर कामांसाठी सहा कोटी ५१ लाख ८०२ रु पये मंजूर केले होते. या बंधाºयासाठी वनविभागाची ३८.९८ हेक्टर जमीन संपादित करणे आवश्यक होते. या प्रकल्पास १३ मे २००८ रोजी केंद्राच्या वनविभागाने तत्त्वत: मंजुरी दिल्यानंतर २००९ मध्ये कामाला सुरु वात झाली. दरम्यान, वनाची अंतिम मंजुरी घेण्यासाठी वैष्णवी कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने तत्परता न दाखवल्याने ३५ टक्के काम झाल्यानंतर २०१२ मध्ये वनविभागाने हरकत घेत या प्रकल्पाचे काम थांबवले. दरम्यान, मागील आठ वर्षांत ठेकेदाराने रीतसर प्रक्रि या पूर्ण करून प्रकल्प सुरू करण्यासाठी दुर्लक्ष केल्याने २०१६ मध्ये या प्रकल्पाच्या कामाची निविदा व मुदतवाढ संपुष्टात आली.नामपाडा प्रकल्पासाठी लागणाºया वनजमिनीच्या बदल्यात विविध भागांतील जमिनी वर्ग करण्यात आल्या. पाच कोटी मोबदलाही देण्यात आला होता. परंतु, २००८ पासून त्याबाबतचा अंतिम अहवाल सादर न केल्याने मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने त्रुटींची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते.वनविभागाने लघुपाटबंधारे विभागाला पर्यायी वनीकरणासाठी २०१८ मध्ये ७७ लाख ८८ हजार १८८ रु पये अधिकची रक्कम भरण्याचे आदेश देत मार्च २०१९ पर्यंत त्रुटींची पूर्तता करण्यास मुभा दिली होती. मात्र, त्यानंतरही त्रुटींची पूर्तता न केल्याने २०१९ मध्ये २१ लाख २२ हजार व २०२० मध्ये पुन्हा २४ लाख रु पये भरण्याचे आदेश दिले.या प्रकल्पावर आतापर्यंत १३ कोटी चार लाख खर्च झाले असून केंद्रीय वनविभागाची मान्यता न घेतल्याने नामपाडा प्रकल्प ठप्प झाला आहे. दरम्यान, ठेकेदारास काळ्या यादीत टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.।या गावांमध्ये पाणीटंचाईप्रकल्पाअभावी सावरोली, कानडी, नांदगाव, खरिवली, आपटे या महसुली गावांसह बेलकडी, गांगणवाडी, वडाचीवाडी, हिरव्याचीवाडी, नामपाडा, टाकीचीवाडी, मधलीवाडी, रिकामवाडी, उंबरवाडी, डोंगरी, कातकरीवाडी या आदिवासीपाड्यांत टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.