शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

शहानिशा केल्यानंतरच मतदारयादीतून नावे वगळावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 23:40 IST

राज्यात १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयाद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.

ठाणे : जिल्ह्यातील मतदारयादीमध्ये समाविष्ट असलेले मयत मतदार, दुबार नाव असलेले मतदार, स्थलांतरितांची नावे मतदारयादीतून वगळण्याची कार्यवाही आदी करताना योग्य ती शहानिशा केल्यानंतरच मतदारांची नावे मतदारयादीतून वगळावी. मतदारयाद्यांच्या विशेष पुनरिक्षणासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्राधान्यक्रमाने करावेत, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त तथा मतदारयादी निरीक्षक अण्णासाहेब मिसाळ यांनी जिल्ह्यातील ''''छायाचित्रांंसह मतदारयाद्यांच्या विशेष पुनरिक्षण'''' कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत सोमवारी केल्या.

राज्यात १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयाद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच मतदार जनजागृती व नोंदणी कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे, मतदारयाद्यांमधील तांत्रिक अडचणी तत्काळ दूर कराव्यात. नवमतदारांच्या नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करावेत आदी सूचना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्पणा सोमाणी आणि जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांचे नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विभागीय कोकण आयुक्तांची मतदार निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. त्यानुसार मिसाळ यांनी मतदारयाद्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम आढावा, मतदारछायाचित्र त्रुटी, मतदारांचे अचूक ओळखपत्र,  निवडणूक आयोगाच्या तक्रार निवारण पोर्टलवर तक्रारी आदींचा विषयनिहाय आढावा घेतला.

टॅग्स :ElectionनिवडणूकVasai Virarवसई विरार