शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

नाखवा निघाले म्हावरं ‘लुटायला’

By admin | Updated: August 29, 2015 22:07 IST

आज नारळी पोर्णिमे निमित्त वसई समुद्रकिनारी असलेल्या अर्नाळा, कळंब, गावातील मच्छीमारांनी समुद्राची विधीवत पूजा केली. वर्षभर रोजीरोटी देणारा समुद्र शांत रहावा म्हणून समुद्राला

वसई : आज नारळी पोर्णिमे निमित्त वसई समुद्रकिनारी असलेल्या अर्नाळा, कळंब, गावातील मच्छीमारांनी समुद्राची विधीवत पूजा केली. वर्षभर रोजीरोटी देणारा समुद्र शांत रहावा म्हणून समुद्राला मानाचा नारळ देऊन प्रार्थना करण्यात येते. या वेळी महिलांनी आपल्या पारंपारिक पोषाखात माझा धनी सुखी राहुदे आणि माझे सौभाग्य अखंड राहो, व्यवसायातून समृद्धी लागो अशी आळवणी केली.दरवर्षी पावसाळ्यातील मासेमारी बंदीनंतर पश्चिम किनारपट्टीवरील गावातील मच्छीमार नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची विधीवत पूजा केल्यानंतर आपल्या मासेमारी व्यवसायास सुरूवात करीत असतात. मात्र यंदा अधिक मास असल्यामुळे नारळी पौर्णिमा १५ ते १६ दिवस उशीराने आली. बंदीचा काळ संपल्यानंतर मासेमारीला यापूर्वीच सुरूवात झाली होती. परंतु मच्छीमार समाजामध्ये समुद्रपुजनाला अनन्य साधारण महत्व असल्यामुळे ही पूजा कधीही टाळली जात नाही. यंदाही ही पूजा विधीवत पार पडली. यावेळी अनेक मच्छीमार महिला पारंपारीक पेहराव करून समुद्र पूजनाला आल्या होत्या. (प्रतिनिधी)गेल्या काही वर्षापासून या व्यवसायावर मंदीचे सावट आहे. या व्यवसायाकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन, घटते समुद्रधन, वाढता इंधनाचा खर्च व साहित्याच्या दरात झालेली वाढ अशा नानाविध अडचणीमुळे मासेमारी व्यवसाय सध्या उतरणीला लागला आहे. अशाही परिस्थितीमध्ये भार्इंदर, उत्तन, वसई, कळंब, अर्नाळा, चिंचणी, डहाणू या समुद्रकिनारी असलेल्या गावामधील हजारो कुटुंबे या व्यवसायामध्ये रोजगार मिळवून आपला उदरनिर्वाह चालवत असतात. गावागावातील मच्छीमार सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मासेमारी व्यवसायातही सहकार तत्वावर मासे खरेदी-विक्री होत असते.