शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

नाखवा निघाले म्हावरं ‘लुटायला’

By admin | Updated: August 29, 2015 22:07 IST

आज नारळी पोर्णिमे निमित्त वसई समुद्रकिनारी असलेल्या अर्नाळा, कळंब, गावातील मच्छीमारांनी समुद्राची विधीवत पूजा केली. वर्षभर रोजीरोटी देणारा समुद्र शांत रहावा म्हणून समुद्राला

वसई : आज नारळी पोर्णिमे निमित्त वसई समुद्रकिनारी असलेल्या अर्नाळा, कळंब, गावातील मच्छीमारांनी समुद्राची विधीवत पूजा केली. वर्षभर रोजीरोटी देणारा समुद्र शांत रहावा म्हणून समुद्राला मानाचा नारळ देऊन प्रार्थना करण्यात येते. या वेळी महिलांनी आपल्या पारंपारिक पोषाखात माझा धनी सुखी राहुदे आणि माझे सौभाग्य अखंड राहो, व्यवसायातून समृद्धी लागो अशी आळवणी केली.दरवर्षी पावसाळ्यातील मासेमारी बंदीनंतर पश्चिम किनारपट्टीवरील गावातील मच्छीमार नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची विधीवत पूजा केल्यानंतर आपल्या मासेमारी व्यवसायास सुरूवात करीत असतात. मात्र यंदा अधिक मास असल्यामुळे नारळी पौर्णिमा १५ ते १६ दिवस उशीराने आली. बंदीचा काळ संपल्यानंतर मासेमारीला यापूर्वीच सुरूवात झाली होती. परंतु मच्छीमार समाजामध्ये समुद्रपुजनाला अनन्य साधारण महत्व असल्यामुळे ही पूजा कधीही टाळली जात नाही. यंदाही ही पूजा विधीवत पार पडली. यावेळी अनेक मच्छीमार महिला पारंपारीक पेहराव करून समुद्र पूजनाला आल्या होत्या. (प्रतिनिधी)गेल्या काही वर्षापासून या व्यवसायावर मंदीचे सावट आहे. या व्यवसायाकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन, घटते समुद्रधन, वाढता इंधनाचा खर्च व साहित्याच्या दरात झालेली वाढ अशा नानाविध अडचणीमुळे मासेमारी व्यवसाय सध्या उतरणीला लागला आहे. अशाही परिस्थितीमध्ये भार्इंदर, उत्तन, वसई, कळंब, अर्नाळा, चिंचणी, डहाणू या समुद्रकिनारी असलेल्या गावामधील हजारो कुटुंबे या व्यवसायामध्ये रोजगार मिळवून आपला उदरनिर्वाह चालवत असतात. गावागावातील मच्छीमार सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मासेमारी व्यवसायातही सहकार तत्वावर मासे खरेदी-विक्री होत असते.