शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

शिक्षकभरतीतील ७० % आरक्षणासाठी आज नागपुरात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:17 IST

शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, यासाठी कोकणातील डीएड., बीएड.धारक आक्रमक झाले आहेत.

विक्रमगड : शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, यासाठी कोकणातील डीएड., बीएड.धारक आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील डीएड, बीएड.धारक आता नागपूर विधिमंडळासमोर उद्या मंगळवारी धरणे धरणार आहेत.गेल्या आठ वर्षांपासून शिक्षक भरतीवर बंदी आहे. ती उठवून येत्या काही महिन्यांतच ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. कोकणातील डोंगराळ परिस्थितीचा विचार करून या भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमधून होत आहे. सन २०१० पूर्वी शिक्षक भरतीत स्थानिकांना आरक्षण होते. तशाच पद्धतीची भरती झाल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील डीएड्, बीएड्धारकांना न्याय मिळणार आहे, अशी भूमिका त्यांच्या संघटनेने घेतली असल्याचे अध्यक्ष संदीप गराटे, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर, सचिव संदेश रावणंग, संकेत गुरसाळे यांनी सांगितले. कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये परजिल्ह्यातील उमेदवारांची निवड होते आणि तीन वर्षांनंतर पुन्हा ते आपापल्या जिल्ह्यात रवाना होतात. त्यामुळे येथील शाळा शिक्षकांविना ओस पडतात. परजिल्हातील शिक्षकांना स्थानिक जिल्हयाविषयी व भौगोलिक तसेच राजकिय जाण नसल्याने विद्यार्थ्याच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच जिल्हा बदली व नवीन नोकर भरतीवर शासनाचा मोठा खर्च होतो. दरवर्षी ५०० ते ६०० शिक्षक जिल्हाबदली करून जात असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी स्थानिकांना भरतीत प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. परजिल्ह्यातील शिक्षकांना येथील कोकणी बोली भाषेत शिकवता येत नाही. त्यामुळे स्थानिक उमेदवारांची भरती झाल्यास या सर्व समस्यांवर मात करता येईल, असे संघटनेचे म्हणणे आहे.जिल्हा बदल्यांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि भरतीत ७० टक्के आरक्षण स्थानिकांना देण्यात यावे, यासाठी सन २०१० पासून स्थानिकांचा हा लढा सुरू आहे. आजपर्यंत अनेकवेळा मोर्चे, उपोषणे करण्यात आली. परंतु, कोकणातील स्थानिकांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. यासाठी आता थेट नागपूर येथील अधिवेशनात हा मुद्दा तडीस लावण्यासाठी विधीमंडळासमोरील मैदानावर धरणे धरण्याचा निर्णय पाच जिल्ह्यांमधील डीएड्, बीएड्धारकांनी घेतला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियोजनाच्या बैठका पार पडल्या आहेत. कोकण विभागातील नोकर भरतीमधे स्थानिकावर शासनाने नेहमीच आन्यायच केला आहे. २०१८ च्या कोकण विभागातील कृषी सेवक भरतीमधे १६५ (पेसा क्षेत्र सोडून) जागां पैकी फक्त २० उमेदवार हे कोकणातील होते.>नोकर भरतीत शासनाने नेहमीच कोंकण प्रांतातील स्थानिकावर अन्याय केला आहे. लवकरच शिक्षक भरती करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. या भरतीत स्थानिक उमेदवारांना ७० टक्के आरक्षण मिळावे व शासनाचे या मुद्दावर लक्ष जावे यासाठी आम्ही नागपूर येथील पावसाली अधिवेशनात धरणे धरण्याचा निर्णय घेतला आहे.-मिलिंद सीताराम पाटील, डी. एड, बी.एड कोंकण विभाग पालघर जिल्हा अध्यक्ष>२०१८ च्या कोकण विभागातील कृषी सेवक भरतीमधे १६५ (पेसा क्षेत्र सोडून) जागांपैकी केवळ फक्त 20 उमेदवार हे कोकणातील रुजू होऊ शकणार आहेत. त्यामुळे कोकण विभागातील कृषी पदविका, पदवीधारकांवर अन्याय झाला आहे. तो पुन्हा होऊ नये या साठी आमची संघटना स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठीचा मुद्दा लाऊन धरते आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय नोकर भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षणासाठी होणाऱ्या उद्याच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला आहे.-अमोल सांबरे,कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समिती

टॅग्स :Teacherशिक्षक