शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिक्षकभरतीतील ७० % आरक्षणासाठी आज नागपुरात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:17 IST

शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, यासाठी कोकणातील डीएड., बीएड.धारक आक्रमक झाले आहेत.

विक्रमगड : शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, यासाठी कोकणातील डीएड., बीएड.धारक आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील डीएड, बीएड.धारक आता नागपूर विधिमंडळासमोर उद्या मंगळवारी धरणे धरणार आहेत.गेल्या आठ वर्षांपासून शिक्षक भरतीवर बंदी आहे. ती उठवून येत्या काही महिन्यांतच ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. कोकणातील डोंगराळ परिस्थितीचा विचार करून या भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमधून होत आहे. सन २०१० पूर्वी शिक्षक भरतीत स्थानिकांना आरक्षण होते. तशाच पद्धतीची भरती झाल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील डीएड्, बीएड्धारकांना न्याय मिळणार आहे, अशी भूमिका त्यांच्या संघटनेने घेतली असल्याचे अध्यक्ष संदीप गराटे, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर, सचिव संदेश रावणंग, संकेत गुरसाळे यांनी सांगितले. कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये परजिल्ह्यातील उमेदवारांची निवड होते आणि तीन वर्षांनंतर पुन्हा ते आपापल्या जिल्ह्यात रवाना होतात. त्यामुळे येथील शाळा शिक्षकांविना ओस पडतात. परजिल्हातील शिक्षकांना स्थानिक जिल्हयाविषयी व भौगोलिक तसेच राजकिय जाण नसल्याने विद्यार्थ्याच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच जिल्हा बदली व नवीन नोकर भरतीवर शासनाचा मोठा खर्च होतो. दरवर्षी ५०० ते ६०० शिक्षक जिल्हाबदली करून जात असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी स्थानिकांना भरतीत प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. परजिल्ह्यातील शिक्षकांना येथील कोकणी बोली भाषेत शिकवता येत नाही. त्यामुळे स्थानिक उमेदवारांची भरती झाल्यास या सर्व समस्यांवर मात करता येईल, असे संघटनेचे म्हणणे आहे.जिल्हा बदल्यांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि भरतीत ७० टक्के आरक्षण स्थानिकांना देण्यात यावे, यासाठी सन २०१० पासून स्थानिकांचा हा लढा सुरू आहे. आजपर्यंत अनेकवेळा मोर्चे, उपोषणे करण्यात आली. परंतु, कोकणातील स्थानिकांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. यासाठी आता थेट नागपूर येथील अधिवेशनात हा मुद्दा तडीस लावण्यासाठी विधीमंडळासमोरील मैदानावर धरणे धरण्याचा निर्णय पाच जिल्ह्यांमधील डीएड्, बीएड्धारकांनी घेतला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियोजनाच्या बैठका पार पडल्या आहेत. कोकण विभागातील नोकर भरतीमधे स्थानिकावर शासनाने नेहमीच आन्यायच केला आहे. २०१८ च्या कोकण विभागातील कृषी सेवक भरतीमधे १६५ (पेसा क्षेत्र सोडून) जागां पैकी फक्त २० उमेदवार हे कोकणातील होते.>नोकर भरतीत शासनाने नेहमीच कोंकण प्रांतातील स्थानिकावर अन्याय केला आहे. लवकरच शिक्षक भरती करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. या भरतीत स्थानिक उमेदवारांना ७० टक्के आरक्षण मिळावे व शासनाचे या मुद्दावर लक्ष जावे यासाठी आम्ही नागपूर येथील पावसाली अधिवेशनात धरणे धरण्याचा निर्णय घेतला आहे.-मिलिंद सीताराम पाटील, डी. एड, बी.एड कोंकण विभाग पालघर जिल्हा अध्यक्ष>२०१८ च्या कोकण विभागातील कृषी सेवक भरतीमधे १६५ (पेसा क्षेत्र सोडून) जागांपैकी केवळ फक्त 20 उमेदवार हे कोकणातील रुजू होऊ शकणार आहेत. त्यामुळे कोकण विभागातील कृषी पदविका, पदवीधारकांवर अन्याय झाला आहे. तो पुन्हा होऊ नये या साठी आमची संघटना स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठीचा मुद्दा लाऊन धरते आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय नोकर भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षणासाठी होणाऱ्या उद्याच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला आहे.-अमोल सांबरे,कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समिती

टॅग्स :Teacherशिक्षक