शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नगर-कल्याण फक्त ३ तासांत, अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वेचे सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:52 IST

पुणे-ठाणे, पालघर, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणाऱ्या व पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वे मार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले

राजुरी : पुणे-ठाणे, पालघर, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणाऱ्या व पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वे मार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले असून एकूण २६ रेल्वेस्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मार्गावर रेल्वे सुरू होणार असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये; तसेच शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व हा मार्ग सुरू झाल्यास नगर ते कल्याण अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येणार आहे.गेल्या पंचवीस वर्षांपासून रखडलेला अहमदनगर - कल्याण रेल्वे मार्गाला नुकतीच परवानगी मिळाली असून नगर व पुणे जिल्ह्यातील शेतमाल मुंबई येथे अत्यंत कमी वेळेत पोहोचवू शकणाºया या रेल्वे मार्गाची अनेक वर्षांपासून मागणी होती. तो व्हावा, यासाठी माळशेज रेल्वे कृती समितीने मोठा संघर्ष केलेला आहे. हा मार्ग अहमदनगर येथे सुरू होणार असून नगर, भाळवणी, धोत्रे, वासुंदे, शिंदेवाडी, काटाळवाडी, माळवाडी, पादरवाडी, ओतूर, जुन्नर रोड, मढ, केबिन, देवरूखवाडी, नागतार सफरकेबीन, डाहरी मिल्वे, मुरबाड, पाटगाव, आपटी कांबा रोड, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी व कल्याण असा मार्ग असणार असून ही वरील गावांची नावे रेल्वे स्थानक म्हणून प्रस्तावित करण्यात आली आहेत.रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करणाºयांनी हा रेल्वे मार्ग पूर्णपणे फायद्यात असेल असा निर्वाळा दिला आहे. सध्या या तांत्रिक सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल आला असला तरी अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर रेल्वे बोर्डासमोर ठेवण्यात येणार आहे. मार्गाला मान्यता मिळण्याची फक्त औपचारिकता बाकी असल्याने हा मार्ग मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे पाहता हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर याचा फायदा विशेषकरून ग्रामीण भागातील शेतकºयांना तसेच मुंबई या ठिकाणी कामासाठी असलेल्या कामगारांना होणार आहे. कारण शेतकरीवर्ग आपला शेतीमाल दररोज मुंबईला विकण्यासाठी नेऊ शकतो, कारण शेतीमाल मुंबईला एसटीने घेऊन जायचा असेल तर सहा ते सात तास लागतात व यासाठी खर्चही खूप येतो हाच माल रेल्वेने नेला तर अवघ्या दीड ते दोन तासात पोहोचत असून खर्चही खूप कमी येणार आहे, तसेच मुंबईला नोकरीसाठी असलेले ग्रामीण भागातील जे लोक आहेत, ते दररोज जाऊन येऊन ती करू शकतील व त्यांच्या खर्चातदेखील बचत होणार आहे. तसेच या मार्गावर असणारा माळशेज घाट सध्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण असून रेल्वेच्या सोयीमुळे तेथील पर्यटन व्यवसाय अधिक फुलणार आहे व जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी तालुका पर्यटन तालुका व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती व त्यात त्यांना यशदेखील आले आहे व तालुका पर्यटन क्षेत्रात मोडला आहे. तसेच या विभागाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले, की हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर कसा होईल, यासाठी सतत पाठपुरावा केलेला आहे तसेच लवकरच मान्यतेसाठी प्रयत्न चालू आहे. यामुळे आता त्याच्या प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते? याकडे चारही जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.>शेतकºयांना मिळणार मोठी बाजारपेठहा माळशेज रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर ठाणे पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकºयांसाठी असलेल्या बाजारपेठ जवळ येणार आहेत.तसेच अहमदनगरमार्गे पुढे औरंगाबादमार्गे विशाखापट्टणम हा मार्गदेखील जवळ येणार आहे. त्यामुळे हा मार्ग या चारही जिल्ह्यांतील शेतकºयांसाठी विकासाचे नवीन पर्व घेऊन येणार असून महत्त्वाचा ठरेल.