शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

नगर-कल्याण फक्त ३ तासांत, अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वेचे सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:52 IST

पुणे-ठाणे, पालघर, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणाऱ्या व पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वे मार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले

राजुरी : पुणे-ठाणे, पालघर, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणाऱ्या व पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वे मार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले असून एकूण २६ रेल्वेस्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मार्गावर रेल्वे सुरू होणार असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये; तसेच शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व हा मार्ग सुरू झाल्यास नगर ते कल्याण अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येणार आहे.गेल्या पंचवीस वर्षांपासून रखडलेला अहमदनगर - कल्याण रेल्वे मार्गाला नुकतीच परवानगी मिळाली असून नगर व पुणे जिल्ह्यातील शेतमाल मुंबई येथे अत्यंत कमी वेळेत पोहोचवू शकणाºया या रेल्वे मार्गाची अनेक वर्षांपासून मागणी होती. तो व्हावा, यासाठी माळशेज रेल्वे कृती समितीने मोठा संघर्ष केलेला आहे. हा मार्ग अहमदनगर येथे सुरू होणार असून नगर, भाळवणी, धोत्रे, वासुंदे, शिंदेवाडी, काटाळवाडी, माळवाडी, पादरवाडी, ओतूर, जुन्नर रोड, मढ, केबिन, देवरूखवाडी, नागतार सफरकेबीन, डाहरी मिल्वे, मुरबाड, पाटगाव, आपटी कांबा रोड, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी व कल्याण असा मार्ग असणार असून ही वरील गावांची नावे रेल्वे स्थानक म्हणून प्रस्तावित करण्यात आली आहेत.रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करणाºयांनी हा रेल्वे मार्ग पूर्णपणे फायद्यात असेल असा निर्वाळा दिला आहे. सध्या या तांत्रिक सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल आला असला तरी अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर रेल्वे बोर्डासमोर ठेवण्यात येणार आहे. मार्गाला मान्यता मिळण्याची फक्त औपचारिकता बाकी असल्याने हा मार्ग मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे पाहता हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर याचा फायदा विशेषकरून ग्रामीण भागातील शेतकºयांना तसेच मुंबई या ठिकाणी कामासाठी असलेल्या कामगारांना होणार आहे. कारण शेतकरीवर्ग आपला शेतीमाल दररोज मुंबईला विकण्यासाठी नेऊ शकतो, कारण शेतीमाल मुंबईला एसटीने घेऊन जायचा असेल तर सहा ते सात तास लागतात व यासाठी खर्चही खूप येतो हाच माल रेल्वेने नेला तर अवघ्या दीड ते दोन तासात पोहोचत असून खर्चही खूप कमी येणार आहे, तसेच मुंबईला नोकरीसाठी असलेले ग्रामीण भागातील जे लोक आहेत, ते दररोज जाऊन येऊन ती करू शकतील व त्यांच्या खर्चातदेखील बचत होणार आहे. तसेच या मार्गावर असणारा माळशेज घाट सध्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण असून रेल्वेच्या सोयीमुळे तेथील पर्यटन व्यवसाय अधिक फुलणार आहे व जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी तालुका पर्यटन तालुका व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती व त्यात त्यांना यशदेखील आले आहे व तालुका पर्यटन क्षेत्रात मोडला आहे. तसेच या विभागाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले, की हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर कसा होईल, यासाठी सतत पाठपुरावा केलेला आहे तसेच लवकरच मान्यतेसाठी प्रयत्न चालू आहे. यामुळे आता त्याच्या प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते? याकडे चारही जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.>शेतकºयांना मिळणार मोठी बाजारपेठहा माळशेज रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर ठाणे पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकºयांसाठी असलेल्या बाजारपेठ जवळ येणार आहेत.तसेच अहमदनगरमार्गे पुढे औरंगाबादमार्गे विशाखापट्टणम हा मार्गदेखील जवळ येणार आहे. त्यामुळे हा मार्ग या चारही जिल्ह्यांतील शेतकºयांसाठी विकासाचे नवीन पर्व घेऊन येणार असून महत्त्वाचा ठरेल.