शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

विवाहित प्रेयसीच्या खुन्याला अखेर अटक

By admin | Updated: January 11, 2017 06:04 IST

नालासोपाऱ्यातील धानीव बाग येथे झालेल्या विवाहित महिलेच्या हत्येप्रकरणी वालीव पोलिसांनी तिच्या प्रियकराला त्याच्या

विरार : नालासोपाऱ्यातील धानीव बाग येथे झालेल्या विवाहित महिलेच्या हत्येप्रकरणी वालीव पोलिसांनी तिच्या प्रियकराला त्याच्या तीन साथीदारासह उत्तरप्रदेशातून अटक केली. तिचे अन्य कुणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्यानेच त्याने तिची हत्या केली होती.२९ डिसेंबर २०१७ रोजी धानीव बाग येथील एका चाळीतील खोलीत सरोज जयस्वाल हिचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला होता. त्या आधी ती तीन दिवस बेपत्ता होती. तिचा पती वीरेंद्र जयस्वाल यांने ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तिचा मृतदेह हाती येताच त्याने दिलेल्या माहितीवरून अजीम खान, सोनू खान, तालीब खान आणि नजीम खान यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक माने, पो.ह.संजय नवले, पो. ना. शिवाजी पाटील, गोविंंद केंद्रे यांनी उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील चंदपा येथून चारही आरोपींना अटक केली. विवाहित सरोजचे अजीम खान (२३) या तरुणाशी अनैतिक संबंध होते. तिचे अन्य कुणाशी संबंध असल्याच्या संशयामुळे भांडणे होत होती. सततच्या वादाला कंटाळून तिने अजीमला दूर केले होते. याचा राग मनात असलेल्या अजीमने तिला आपल्या घरी बोलावून घेतले होते. त्याच रात्री तिचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर आपल्या साथीदारांसह तो गावी पळून गेला होता. (वार्ताहर)