शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

नालासोपा-यातील खुनाचा उलगडा , आणखी दोघांची हत्या करण्याचा होता डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:44 IST

नालासोपा-यात हत्या झालेल्या अनोळखी व्यक्तीचा छडा लावून त्याच्या तीन मारेक-यांना नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे

वसई : नालासोपा-यात हत्या झालेल्या अनोळखी व्यक्तीचा छडा लावून त्याच्या तीन मारेक-यांना नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांनी आणखी दोनजणांची हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र, त्याआधीच त्यांना अटक झाल्याने दोन जीव वाचले आहेत.पश्चिमेकडील हनुमान नगरातील एका इमारतीमधील एका खोलीत कुजलेल्या अवस्थेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह २८ आॅक्टोबरला आढळून आला होता. या इसमाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. मात्र, मृत इसम अ़नोळखी असल्याने कोणतेही धागेदारे नसतांना त्याची ओळख पटवून त्याच्या मारेकºयांना अटक केली आहे.या खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक सुहास कांबळे, महेश चव्हाण, सिद्धेश शिंदे, हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्वे, रुस्तम राठोड, हर्षद चव्हाण, अश्विन पाटील यांच्या पथकाने मृत व्यक्तीची ओळख पटविली. सफात अली असगर अली (५५) असे मृत इसमाचे नाव असून तो मानखुर्द येथील रहिवासी असल्याची महत्वाची माहिती हाती लागल्यानंतर नालासोपारा पोलिसांनी त्याच्या मारेकºयांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात आल्या.दीपक लंगडा (३५), प्रजापती (४५) आणि विजय चौहान (२०) या मारेकºयांना मुंबईच्या मानखुर्द परिसरातून अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या जबानीत सफात अली हा त्यांचा साथीदार होता. चौघेही वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवण्याचा व्यवसाय करीत. चौघांनी एका व्यापाºयाला लुटून ठार मारण्याचा कट रचला होता. त्यानंतर त्यांना सिमकार्ड पुरवणाºयाचीही हत्या ते करणार होते. मात्र, सफातने व्यापाºयाला लुटून आपण एकटेच मारणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे लुटीतील हिस्सा मिळणार नसल्याने दिपक, प्रजापती आणि विजय यांनी सफातला ठार मारण्याचा बेत रचला. तिघांनी त्याला मुलगी विकत देतो असे सांगून नालासोपाºयातील हनुमान नगरात आणले होते. तेथील एका इमारतीतील बंद असलेल्या खोलीत चौघे दारू प्यायले. तिघांनी सफातच्या दारूमध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. तो बेशुद्ध पडताच त्याची हत्या करून त्यांनी पळ काढला होता. तिघांनी माहिम येथील व्यापाºयाला लुटून त्याची हत्या करण्यासोबतच सीमकार्ड देणाºयाची रेल्वे रुळांवर नेऊन हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी तिघांना जेरबंद केल्याने दोघांचे जीव वाचले.पुरावा नसतांना तपास चौघेही होते ‘दलाल’कोणताही पुरावा नसतांना तपास पथकाने मृताची ओळख पटवली व त्याच्या तीन मारेकºयांना अटक केली. ते चौघेही देहविक्रयासाठी मुली आणि तरुणी पुरविण्याचा गोरखधंदा करीत होते. एका व्यापाºयाला लुटून त्याची हत्या करण्यावरून त्यांच्यात वाद झाला. व त्याचे पर्यवसन तिघांनी या मयताचा खून करण्यात झाले, असे तपासात निष्पन्न झाले.