शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘हरित वसई’च्या सदस्यांना महापालिकेची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 03:51 IST

पर्यावरण संवर्धन समितीतर्फे हरित वसई साठी लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरावर ते अनधिकृत असल्याची नोटीस पालिकेने पाठवुन हरीत वसई चे आंदोलन दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे.

वसई : पर्यावरण संवर्धन समितीतर्फे हरित वसई साठी लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरावर ते अनधिकृत असल्याची नोटीस पालिकेने पाठवुन हरीत वसई चे आंदोलन दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. या कार्यकर्त्यांच्या स्वत:च्या नावावर कोणतीही मालमत्ता नसताना पालिकेने नोटीस काढल्यामूळे त्यांनी उच्च न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे.२९ गावांना महापालिकेतून वगळण्यात यावे यासाठी गेल्या दहा वर्षांपासून वसईत अनेक आंदोलने व मोर्चे निघाले. मात्र, वसई करांच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या पर्यावरण संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर ते अनिधकृत असल्याचा ठपका ठेवत पालिका कारवाई करण्याची नोटीस काढत असल्यामूळे वसईत खळबळ उडाली आहे. निसर्गसपन्न वसईत गेल्या काही वर्षात सिमेंटची जंगले वाढत चालली आहेत. येथील बावखल, तलाव, पाणथळ जागा व खारटन वाचिवण्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीच्या मार्फत समीर वर्तक लढत आहेत.वसईतील अनेक सरकारी जमीनीवर अतिक्र मण करत भूमाफीयांनी अनधिकृत इमारती बांधत सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक चालवली असताना, महानगरपालिका प्रशासन मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. वसईतील,पालघर मधील भूमीपुत्रांच्या अस्तित्वासाठी झटत असल्यामूळे अशा प्रकारच्या नोटीस काढली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. ही नोटीस मला नव्हे तर वसईतील सर्व भूमिपुत्रांना काढली असल्याचे त्यांनी सांगीतले .शनिवारी वाघोली मांडलई येथे शेकडो वसईकरांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या विरोधात सभा घेण्यात आली. या सभेत आपल्याला पाठविलेल्या नोटीस संदर्भात वर्तक यांनी, माझ्या नावावर कोणतेही घर किंवा मालमत्ता नसतांना महानगरपालिका नोटीस काढूच कशी शकते असा प्रश्न उपस्थीत केला. यासाठी महानगरपालिकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याची प्रक्रि या चालू केली असल्याचे त्यांनी सांगीतले.मी माझ्या वडिलांच्या घरात राहत असून ते तोडण्याअगोदर आणि स्थानिकांच्या घराकडे वाकडी नजर टाकणाºया महानगरपालिकेने वसईतील भूमाफियानी वसईतील स्थानिकाच्या जमिनी लुबाडून जी अनधिकृत बांधकामे बांधली आहेत ती सर्वप्रथम तोडावी आणि मगच माङयाकडे यावे, असे सांगितले.याचिका न्यायालयातवसई विरार महानगरपालिका क्षेत्रातून २९ गावे वगळण्याचा आदेश कॉग्रेस सरकारने दिला होता. त्याविरोधात महापालिकेने उच्च न्यायालयात याचीका दाखल असून त्याला स्थगिती देण्यात आली आहे. ज्या वाघोली गावात वर्तक राहतात ते गाव महाराष्ट्र सरकारने महानगरपालिकेतून वगळलेले आहे. आणि गावे वगळणे हे प्रकरण सद्या कोर्टात प्रलंबित आहे. महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाचे शास्ती संदर्भात व गावातील घरांच्या बाबतीत असलेले राजपत्र तपासावीत, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार