शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘हरित वसई’च्या सदस्यांना महापालिकेची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 03:51 IST

पर्यावरण संवर्धन समितीतर्फे हरित वसई साठी लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरावर ते अनधिकृत असल्याची नोटीस पालिकेने पाठवुन हरीत वसई चे आंदोलन दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे.

वसई : पर्यावरण संवर्धन समितीतर्फे हरित वसई साठी लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरावर ते अनधिकृत असल्याची नोटीस पालिकेने पाठवुन हरीत वसई चे आंदोलन दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. या कार्यकर्त्यांच्या स्वत:च्या नावावर कोणतीही मालमत्ता नसताना पालिकेने नोटीस काढल्यामूळे त्यांनी उच्च न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे.२९ गावांना महापालिकेतून वगळण्यात यावे यासाठी गेल्या दहा वर्षांपासून वसईत अनेक आंदोलने व मोर्चे निघाले. मात्र, वसई करांच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या पर्यावरण संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर ते अनिधकृत असल्याचा ठपका ठेवत पालिका कारवाई करण्याची नोटीस काढत असल्यामूळे वसईत खळबळ उडाली आहे. निसर्गसपन्न वसईत गेल्या काही वर्षात सिमेंटची जंगले वाढत चालली आहेत. येथील बावखल, तलाव, पाणथळ जागा व खारटन वाचिवण्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीच्या मार्फत समीर वर्तक लढत आहेत.वसईतील अनेक सरकारी जमीनीवर अतिक्र मण करत भूमाफीयांनी अनधिकृत इमारती बांधत सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक चालवली असताना, महानगरपालिका प्रशासन मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. वसईतील,पालघर मधील भूमीपुत्रांच्या अस्तित्वासाठी झटत असल्यामूळे अशा प्रकारच्या नोटीस काढली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. ही नोटीस मला नव्हे तर वसईतील सर्व भूमिपुत्रांना काढली असल्याचे त्यांनी सांगीतले .शनिवारी वाघोली मांडलई येथे शेकडो वसईकरांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या विरोधात सभा घेण्यात आली. या सभेत आपल्याला पाठविलेल्या नोटीस संदर्भात वर्तक यांनी, माझ्या नावावर कोणतेही घर किंवा मालमत्ता नसतांना महानगरपालिका नोटीस काढूच कशी शकते असा प्रश्न उपस्थीत केला. यासाठी महानगरपालिकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याची प्रक्रि या चालू केली असल्याचे त्यांनी सांगीतले.मी माझ्या वडिलांच्या घरात राहत असून ते तोडण्याअगोदर आणि स्थानिकांच्या घराकडे वाकडी नजर टाकणाºया महानगरपालिकेने वसईतील भूमाफियानी वसईतील स्थानिकाच्या जमिनी लुबाडून जी अनधिकृत बांधकामे बांधली आहेत ती सर्वप्रथम तोडावी आणि मगच माङयाकडे यावे, असे सांगितले.याचिका न्यायालयातवसई विरार महानगरपालिका क्षेत्रातून २९ गावे वगळण्याचा आदेश कॉग्रेस सरकारने दिला होता. त्याविरोधात महापालिकेने उच्च न्यायालयात याचीका दाखल असून त्याला स्थगिती देण्यात आली आहे. ज्या वाघोली गावात वर्तक राहतात ते गाव महाराष्ट्र सरकारने महानगरपालिकेतून वगळलेले आहे. आणि गावे वगळणे हे प्रकरण सद्या कोर्टात प्रलंबित आहे. महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाचे शास्ती संदर्भात व गावातील घरांच्या बाबतीत असलेले राजपत्र तपासावीत, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार