शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुंबई-नाशिकच्या पर्यटकांचा मोर्चा पालघरकडे, सलग तीन दिवसांची सुट्टी अन् ख्रिसमस साजरा करण्याचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:24 IST

Palghar : कोरोनाचा उद्रेक आता हळूहळू बऱ्यापैकी ओसरत असल्याने सरकारने पर्यटनावर लादलेली अनेक बंधने हटवली आहेत, तसेच करमणुकीच्या साधनांना परवानगी दिली आहे.

पालघर : मुंबईमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान असलेल्या संचारबंदीमुळे मजा करण्यास मुकणार असल्याने ख्रिसमसमुळे सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांची मजा लुटण्यासाठी मुंबई, नाशिक आदी भागांतून शेकडो पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील  केळवे, बोर्डी, दातीवरे आदी भागांत पर्यटकांची मोठी संख्या दिसून येत आहे. कोरोनाचा उद्रेक आता हळूहळू बऱ्यापैकी ओसरत असल्याने सरकारने पर्यटनावर लादलेली अनेक बंधने हटवली आहेत, तसेच करमणुकीच्या साधनांना परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे वॉटर स्पोर्ट, नौकानयन आणि मनोरंजन पार्क उघडले गेले आहेत. २५ डिसेंबर ख्रिसमस आणि सलग आलेल्या शनिवार, रविवार अशा तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कोरोनाकाळात घरात अडकून पडलेली अनेक कुटुंबे जिल्ह्यातील ११० किमीच्या किनाऱ्यावर उभारलेल्या पर्यंटनस्थळांवरील रिसॉर्ट, हॉटेल्समध्ये दाखल झाली आहेत. त्यामुळे पालघरच्या केळवे, डहाणू, नरपड, बोर्डी, उसरणी, कोरेसर, वसई तालुक्यातील कळंब, राजोडी, अर्नाळा आदी भागांत पर्यटकांनी किनारे फुलून गेले आहेत.हॉटेल रेस्टॉरंट, लॉजिंग पर्यटकांनी व्यापले आहेत. दरम्यान, गर्दी होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने नाताळ सण आणि थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत पाचपेक्षा अधिक नागरिकांना फिरण्यास मनाई केली आहे, मात्र पालघर जिल्ह्यामध्ये असा कुठलाही मनाई आदेश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी जारी केला नाही. त्यामुळे हॉटेल मालक, रिसॉर्ट मालक यांनी समाधान व्यक्त केले असून  मागील १० महिन्यांपासून मरगळ आलेल्या या व्यवसायाला पुनरुज्जीवित करण्यासाठी ख्रिसमससह आलेल्या सलग तीन दिवस सुट्ट्यांची संधी साधण्यासाठी हॉटेल मालक सज्ज झाले आहेत.

कडक पोलीस बंदोबस्तकेळवे सागरी पोलिसांनी पर्यटकांच्या वाढत्या गर्दीला रोखण्यासाठी बीचवर पोलीस बंदोबस्त वाढविला असून सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट मालकांना डीजेबंदी, मद्यपानासह वेळेचे बंधन पाळण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि बी.जी. गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिली. मुंबई, नाशिक आदी भागांतून येणारी गर्दी, केळवे पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या हॉटेल्समध्ये रेव्ह पार्टी, मादक द्रव्यांचा वापर होऊ नये यासाठी पोलीस सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघर