शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

उपवन संरक्षकांच्या विरोधात आंदोलन, आदिवासींना केला शेती करण्यास मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:39 IST

वन विभागाचे नियम अटी दाखवून वर्षानुवर्षे कसत असलेल्या वन प्लॉटधारक आदिवासींना त्यांच्या वन प्लॉट जंगलात फिरणे बंदी घातली आहे.

जव्हार : जव्हार वन विभागाचे उपवन संरक्षक अमित मिश्रा यांनी वर्षानुवर्ष कसत असलेल्या वन प्लॉटधारक आदिवासींवर गुन्हे दाखल करून जंगलात फिरण्यास मनाई केली आहे. तर वन प्लॉटधारकांची शेतावरील घरे उद्ध्वस्त करून त्यांना बुजणी, राबणी व शेती करण्यास मनाई केली आहे. म्हणून श्रमजीवी संघटनेने आवाज उठवीत उपवन संरक्षक यांच्या वनविभागाच्या दालनात एकदिवसीय धरणे आंदोलन केले आहे.त्यांनी वन विभागाचे नियम अटी दाखवून वर्षानुवर्षे कसत असलेल्या वन प्लॉटधारक आदिवासींना त्यांच्या वन प्लॉट जंगलात फिरणे बंदी घातली आहे. येथील वन प्लॉटधारक आदिवासी कुटुंबेही गेल्या अनेक वर्षांपासून जंगलातील गावठी भाज्या, फळभाज्या, डिंक याचे उत्पादन घेत होते त्यावर बंदी घातली आहे. त्यातच अनेक वर्षांपासून वन प्लॉट असलेल्या झोपडीवर गुन्हे दाखल करायला लावले आहेत. त्यामुळे येथील जंगलातील आदिवासी कुटुंब भेदरली आहेत. त्यामुळे वनपन संरक्षकांच्या दालनात श्रमजीविच्या नेतृवाखाली धरणे धरण्यात आली.पालघर जिल्ह्यातील जव्हार हा आदिवासी व डोंगराळ भाग आहे. येथील शेकडो आदिवासी कुटुंबांना कायमस्वरूपी असे रोजगाराचे कुठलेही साधन नाही. तर शासनातर्फे वर्षभर रोजगार हमीचं कामही मिळत नाही. जे काही रोजगार हमीचे काम मिळते ते फक्त उन्हाळ्यात. त्यामुळे येथील आदिवासी कुटुंबांना रोजगारासाठी वन प्लॉटवर अवलंबून राहावे लागते. मात्र वन विभागाचे उपवन संरक्षक अमित मिश्रा यांनी वन विभागाचे नियम अटींचा बडगा उगारला आहे.वनखात्याची दंडेलीवन विभागाने मोजणी करून दिलेल्या वन प्लॉटात झाडांची लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्यास सुरवात केली आहे. तर आदिवासी हे जंगल नाश करणारे आहेत. असे समजून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. म्हणून आदिवासींनी श्रमजीविचा आधारघेत बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत हे आंदोलन केले.

टॅग्स :palgharपालघर