शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

ग्रामीण भागातील शाळांसमोर अडचणींचे डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:17 IST

शाळा सुरू झाल्यानंतर शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा. शाळेतील वर्गखोल्या, बाहेरील नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क, खुर्च्या वारंवार निर्जंतुक कराव्यात.

- शशिकांत ठाकूरलोकमत न्यूज नेटवर्ककासा : राज्यातील इयत्ता ९वी ते १२वी पर्यंतच्या शाळा २३ तारखेपासून सुरू होण्याची शक्यता असून त्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, मात्र ग्रामीण भागातील शाळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा. शाळेतील वर्गखोल्या, बाहेरील नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क, खुर्च्या वारंवार निर्जंतुक कराव्यात. हात धुण्याच्या ठिकाणी साबण, हँडवाॅश, स्वच्छतेसाठी पाण्याची व्यवस्था, अल्कोहोलमिश्रित सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात यावे. स्वच्छतागृहे वारंवार निर्जंतुक करावीत. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची दररोज चाचणी म्हणजेच थर्मल स्क्रीनिंग करावे आदी अनेक अटी घालण्यात आलेल्या आहेत.

शाळा, वर्ग दररोज सॅनिटायझिंग करणे, स्वच्छता पुरविणे तसेच इतर साहित्य आदी बाबी खर्चीक आहेत, मात्र शाळांना आता वेतनेतर अनुदान मिळत नाही. त्यामुळे हा खर्च कोठून करायचा, तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती बंद आहे. त्यामुळे शाळेत शिपाई संख्या खूप कमी आहे. त्यामुळे ही सॅनिटायझिंग, स्वच्छतेची कामे रोज कशी करणार, अशा समस्या शाळांपुढे आहेत.

शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे, मात्र विद्यार्थ्यांना तशी अट नाही. त्यामुळे वेगवेगळ्या भागांतून लांबून ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत येतात. त्यामुळे त्यामध्ये कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तसेच शिक्षक कोरोना चाचणीबाबतीत आरोग्य विभागाकडे पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे कित्येक शिक्षक अजून चाचण्या करू शकले नाहीत.

अनेक आव्हानात्मक परिस्थितींचा सामना शाळा सुरू करताना व झाल्यावर करावा लागणार आहे. शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. कारण विद्यार्थी वेगवेगळ्या कुटुंब व भागांतून येणारे आहेत तसेच सॅनिटायझर व इतर सुविधा सरकारकडून पुरविल्या जाव्यात.- पी.टी. पाटील, अध्यक्ष, पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना

पालकांशी संपर्क साधला असता बरेच पालक आपल्या पाल्यास पाठविण्यास तयार नाहीत. कारण वाहतूक व्यवस्था व इतर समस्या आहेत. त्यामुळे सर्व व्यवस्था शासनाने कराव्यात.- वागेश कदम, अध्यक्ष, संस्था चालक संघटना, पालघर जिल्हा

कोरोना विषाणूसंदर्भात  लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करण्याची घाई शासनाने करू नये. त्याआधी शाळा सुरू केल्यास कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो.- विजय जाधव, पालक