शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील शाळांसमोर अडचणींचे डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:17 IST

शाळा सुरू झाल्यानंतर शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा. शाळेतील वर्गखोल्या, बाहेरील नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क, खुर्च्या वारंवार निर्जंतुक कराव्यात.

- शशिकांत ठाकूरलोकमत न्यूज नेटवर्ककासा : राज्यातील इयत्ता ९वी ते १२वी पर्यंतच्या शाळा २३ तारखेपासून सुरू होण्याची शक्यता असून त्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, मात्र ग्रामीण भागातील शाळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा. शाळेतील वर्गखोल्या, बाहेरील नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क, खुर्च्या वारंवार निर्जंतुक कराव्यात. हात धुण्याच्या ठिकाणी साबण, हँडवाॅश, स्वच्छतेसाठी पाण्याची व्यवस्था, अल्कोहोलमिश्रित सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात यावे. स्वच्छतागृहे वारंवार निर्जंतुक करावीत. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची दररोज चाचणी म्हणजेच थर्मल स्क्रीनिंग करावे आदी अनेक अटी घालण्यात आलेल्या आहेत.

शाळा, वर्ग दररोज सॅनिटायझिंग करणे, स्वच्छता पुरविणे तसेच इतर साहित्य आदी बाबी खर्चीक आहेत, मात्र शाळांना आता वेतनेतर अनुदान मिळत नाही. त्यामुळे हा खर्च कोठून करायचा, तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती बंद आहे. त्यामुळे शाळेत शिपाई संख्या खूप कमी आहे. त्यामुळे ही सॅनिटायझिंग, स्वच्छतेची कामे रोज कशी करणार, अशा समस्या शाळांपुढे आहेत.

शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे, मात्र विद्यार्थ्यांना तशी अट नाही. त्यामुळे वेगवेगळ्या भागांतून लांबून ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत येतात. त्यामुळे त्यामध्ये कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तसेच शिक्षक कोरोना चाचणीबाबतीत आरोग्य विभागाकडे पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे कित्येक शिक्षक अजून चाचण्या करू शकले नाहीत.

अनेक आव्हानात्मक परिस्थितींचा सामना शाळा सुरू करताना व झाल्यावर करावा लागणार आहे. शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. कारण विद्यार्थी वेगवेगळ्या कुटुंब व भागांतून येणारे आहेत तसेच सॅनिटायझर व इतर सुविधा सरकारकडून पुरविल्या जाव्यात.- पी.टी. पाटील, अध्यक्ष, पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना

पालकांशी संपर्क साधला असता बरेच पालक आपल्या पाल्यास पाठविण्यास तयार नाहीत. कारण वाहतूक व्यवस्था व इतर समस्या आहेत. त्यामुळे सर्व व्यवस्था शासनाने कराव्यात.- वागेश कदम, अध्यक्ष, संस्था चालक संघटना, पालघर जिल्हा

कोरोना विषाणूसंदर्भात  लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करण्याची घाई शासनाने करू नये. त्याआधी शाळा सुरू केल्यास कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो.- विजय जाधव, पालक