शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोखाड्याची वैतरणा नळ पाणीपुरवठा योजना बारगळली?; रोज मरे त्याला कोण रडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 23:31 IST

रोज मरे त्याला कोण रडे

रवींद्र साळवेमोखाडा :  मोखाड्याची पाणीटंचाई  म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी झाली आहे. तालुक्यातील काही गावांना नळ पाणीपुरवठा योजना राबवल्या गेल्या असल्या, तरी त्यांचे स्रोत हे विहिरीच असल्याने या योजनाही निकामी ठरल्या आहेत. यामुळे तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मुंबईतील आयआयटीने सुचवलेल्या अप्पर वैतरणा धरणातील १ टक्के पाणीसाठ्यावरील योजनेचा जिल्हा नियोजन समितीमार्फत २० लाख रुपये खर्च करून सर्व्हेही करण्यात आला होता. या योजनेस मुंबई महापालिकेने हिरवा कंदील दर्शविला होता. तरीही प्रस्तावित अप्पर वैतरणा सामूहिक पाणीपुरवठा योजना बारगळल्याचे दिसून येत आहे. 

२०० कोटींच्या बजेटमधून संपूर्ण मोखाडा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, परंतु याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. उलट गोदावरी नदीच्या पात्रात  पाणी सोडण्याच्या अट्टाहासासाठी मागील दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील चिंचुतारा, भेंडीचापाडा, बेडूकपाडा, उधळे, वडाचापाडा या ठिकाणी शासनाने धरण  बांधण्याची योजना आखली होती, परंतु या प्रकल्पात ३ हजार ८२ एकर  जमीन बुडीत क्षेत्र पाण्याखाली येणार आहे.  ७४ एकर जमीन पाटासाठी संपादित होणार आहे. १३३ एकर जमीन इतर  कामासाठी संपादित होणार आहे.  

मुख्यमंत्री दखल घेणार का?मुंबई पालिकेने या योजनेला त्या वेळेस हिरवा कंदील दिला होता. सध्या राज्यात, मुंबई महानगरपालिकेत आणि मोखाडा पंचायत समितीवरदेखील शिवसेनेची सत्ता आहे. मध्य वैतरणा धरणाचे पाणी १०० किमी अंतरावर मुंबईला पुरवले जाते, परंतु दरवर्षी येथील आदिवासींना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेऊन  संपूर्ण तालुक्याचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायला हवा. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी