शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मोखाड्याची वैतरणा नळ पाणीपुरवठा योजना बारगळली?; रोज मरे त्याला कोण रडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 23:31 IST

रोज मरे त्याला कोण रडे

रवींद्र साळवेमोखाडा :  मोखाड्याची पाणीटंचाई  म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी झाली आहे. तालुक्यातील काही गावांना नळ पाणीपुरवठा योजना राबवल्या गेल्या असल्या, तरी त्यांचे स्रोत हे विहिरीच असल्याने या योजनाही निकामी ठरल्या आहेत. यामुळे तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मुंबईतील आयआयटीने सुचवलेल्या अप्पर वैतरणा धरणातील १ टक्के पाणीसाठ्यावरील योजनेचा जिल्हा नियोजन समितीमार्फत २० लाख रुपये खर्च करून सर्व्हेही करण्यात आला होता. या योजनेस मुंबई महापालिकेने हिरवा कंदील दर्शविला होता. तरीही प्रस्तावित अप्पर वैतरणा सामूहिक पाणीपुरवठा योजना बारगळल्याचे दिसून येत आहे. 

२०० कोटींच्या बजेटमधून संपूर्ण मोखाडा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, परंतु याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. उलट गोदावरी नदीच्या पात्रात  पाणी सोडण्याच्या अट्टाहासासाठी मागील दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील चिंचुतारा, भेंडीचापाडा, बेडूकपाडा, उधळे, वडाचापाडा या ठिकाणी शासनाने धरण  बांधण्याची योजना आखली होती, परंतु या प्रकल्पात ३ हजार ८२ एकर  जमीन बुडीत क्षेत्र पाण्याखाली येणार आहे.  ७४ एकर जमीन पाटासाठी संपादित होणार आहे. १३३ एकर जमीन इतर  कामासाठी संपादित होणार आहे.  

मुख्यमंत्री दखल घेणार का?मुंबई पालिकेने या योजनेला त्या वेळेस हिरवा कंदील दिला होता. सध्या राज्यात, मुंबई महानगरपालिकेत आणि मोखाडा पंचायत समितीवरदेखील शिवसेनेची सत्ता आहे. मध्य वैतरणा धरणाचे पाणी १०० किमी अंतरावर मुंबईला पुरवले जाते, परंतु दरवर्षी येथील आदिवासींना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेऊन  संपूर्ण तालुक्याचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायला हवा. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी