शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
7
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
8
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
9
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
10
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
11
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
12
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
13
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
14
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
15
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
16
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
17
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
18
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
19
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
20
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!

मोखाड्याचे आदिवासी मजूर वेठबिगारीच्या पाशात; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:22 IST

बोट्याच्या वाडीच्या वेठबिगारांचे धक्कादायक वास्तव

- रविंद्र साळवेमोखाड : ग्रामीण भागात आजही आदिवासी मजुराला वेठबिगार म्हणून राबवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील बोट्याची वाडी गावातील आदिवासी मजूर कुटुंबाला कल्याण - उल्हासनगर येथील एका मालकाने चक्क वेठबिगार म्हणून बंधक बनवले. या कुटुंबातील तीन लोकांना घरी पाठवले मात्र परत येण्याची अट घालून त्यांच्या १३ वर्षीय मुलीला बंधक बनवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांच्या या गावात झालेल्या भेटीदरम्यान हा गंभीर प्रकार उघडकीस आला. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला वेठिबगारीच्या पाशातून मुक्त केले. गुरुवारी याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात मोहन भिका दिवे याने फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे.मोहन भिका दिवे याने दिलेल्या फिर्यादीनुसार मोहन याचे कुटुंब मोखाड्यात बोट्याची वाडी येथे राहते. पूर्वी ते भिवंडीतील पडघा येथे वीटभट्टीवर कामासाठी जायचे. गेल्या गणपतीच्या दरम्यान उल्हासनगर येथील योगेश वायले हा मालक आपल्या वडिलांसोबत वाडीत आला. त्याच्याकडे पूर्वी काम करत असलेल्या काही लोकांनी मोहनचे कुटुंब आणि योगेश वायले याची भेट करून दिली. शेठ चांगला आहे या समजुतीने मोहनचे कुटुंब कामावर जायला तयार झाले. त्यावेळेस योगेश याने ३००० (तीन हजार रुपये) रोख बयाना दिला. त्यानंतर पुन्हा गणपती गेल्यावर काही दिवसांनी येऊन १०,००० (दहा हजार रुपये) इतकी रक्कम देत मी घटस्थापनेनंतर घ्यायला येईन असे सांगून गेला. नंतर ठरलेल्या दिवशी येऊन योगेश याने मोहन, त्याचे आई-वडील, आणि गौरी (७), बायडी (९) आणि शैली (१३) या बहिणींसोबत हे पूर्ण कुटुंब उल्हासनगर ५ नंबर येथे नेले. विटांचे तुकडे भरणे, शेतातील काम, वीट भरायला - उतरवायला गाडीवर अशी अनेक कामे त्यांच्याकडून करून घेतली. सुट्या मजुराला (रोजंदारीच्या) ४०० रुपये देणारा मालक या बंधक मजुरांना केवळ २०० आणि महिलेला १०० मजुरी दडून शोषण करत होता. स्वत:कडे काम नसले की बाहेर कामाला पाठवून तिकडून येणाऱ्या मजुरीच्या पन्नास टक्के रक्कम मालक घेत असे.दिवाळीमध्ये या लोकांनी घरी जाण्याची मागणी केली असता मालकाने विरोध केला. मग तेरा वर्षीय शैला हिला बंधक बनवून ठेवत उर्वरित कुटुंबाला एक रुपयाही न देता गावाला पाठवले. जवळ वाचलेले १००० रु पये घेऊन कसेबसे हे कुटुंब मोखाड्यात पोहोचले. मुलगी मालकाकडे बंधक, खिशात दमडी नाही अशा स्थितीत या कुटुंबाची दिवाळी पार अंधारात गेली. शासकीय योजनेतून घरकुल लागलेले असल्याने मोहनचे वडील घरीच थांबले. दिवाळीनंतर गावातील कुणाकडून तरी ५०० रुपये उसनवारी घेऊन मोहनच्या वडिलांनी म्हणजे भिका दिवे यांनी मोहन, त्याची आई आणि दोन बहिणींना उल्हासनगर येथे धाडले.परत गेल्यावर मोहन आणि कुटुंबाला योगेश आणि त्याचा भाऊ राजू यांच्याकडे किंवा बाहेर मजुरीचे काम करावे लागे. बाहेर मिळालेल्या ३०० रु. मजुरीतून १०० रुपये त्यांना मिळत. कधी कधी तेही मिळत नसत. राजू हा गौरीला मारहाण तसेच शिवीगाळ करायचा. त्रासामुळे पळून जाण्याची इच्छा होती, पण शेठच्या भीतीमुळे काही करता आले नाही.पोलिसांची मदत घेत केली सुटकामोहनने वडील भिका दिवे यांना फोन करून सर्व सांगितले. शेवटी गावातील गावात त्यांनी याबाबत माहिती दिली. ही बाब श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांना कळताच त्यांनी तातडीने या कुटुंबाला मुक्त करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.मोखाड्यातून पांडू मालक, गणेश माळी, उल्हास भानुशाली यांच्यासह कल्याण, अंबरनाथमधील राजेश चन्ने, वासू वाघे आदी कार्यकर्त्यांनी हिल लाईन पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांची मदत घेत या पूर्ण कुटुंबाला मुक्त केले. या घटनेबाबत पंडित यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.