शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

मोखाड्याचे आदिवासी मजूर वेठबिगारीच्या पाशात; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:22 IST

बोट्याच्या वाडीच्या वेठबिगारांचे धक्कादायक वास्तव

- रविंद्र साळवेमोखाड : ग्रामीण भागात आजही आदिवासी मजुराला वेठबिगार म्हणून राबवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील बोट्याची वाडी गावातील आदिवासी मजूर कुटुंबाला कल्याण - उल्हासनगर येथील एका मालकाने चक्क वेठबिगार म्हणून बंधक बनवले. या कुटुंबातील तीन लोकांना घरी पाठवले मात्र परत येण्याची अट घालून त्यांच्या १३ वर्षीय मुलीला बंधक बनवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांच्या या गावात झालेल्या भेटीदरम्यान हा गंभीर प्रकार उघडकीस आला. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला वेठिबगारीच्या पाशातून मुक्त केले. गुरुवारी याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात मोहन भिका दिवे याने फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे.मोहन भिका दिवे याने दिलेल्या फिर्यादीनुसार मोहन याचे कुटुंब मोखाड्यात बोट्याची वाडी येथे राहते. पूर्वी ते भिवंडीतील पडघा येथे वीटभट्टीवर कामासाठी जायचे. गेल्या गणपतीच्या दरम्यान उल्हासनगर येथील योगेश वायले हा मालक आपल्या वडिलांसोबत वाडीत आला. त्याच्याकडे पूर्वी काम करत असलेल्या काही लोकांनी मोहनचे कुटुंब आणि योगेश वायले याची भेट करून दिली. शेठ चांगला आहे या समजुतीने मोहनचे कुटुंब कामावर जायला तयार झाले. त्यावेळेस योगेश याने ३००० (तीन हजार रुपये) रोख बयाना दिला. त्यानंतर पुन्हा गणपती गेल्यावर काही दिवसांनी येऊन १०,००० (दहा हजार रुपये) इतकी रक्कम देत मी घटस्थापनेनंतर घ्यायला येईन असे सांगून गेला. नंतर ठरलेल्या दिवशी येऊन योगेश याने मोहन, त्याचे आई-वडील, आणि गौरी (७), बायडी (९) आणि शैली (१३) या बहिणींसोबत हे पूर्ण कुटुंब उल्हासनगर ५ नंबर येथे नेले. विटांचे तुकडे भरणे, शेतातील काम, वीट भरायला - उतरवायला गाडीवर अशी अनेक कामे त्यांच्याकडून करून घेतली. सुट्या मजुराला (रोजंदारीच्या) ४०० रुपये देणारा मालक या बंधक मजुरांना केवळ २०० आणि महिलेला १०० मजुरी दडून शोषण करत होता. स्वत:कडे काम नसले की बाहेर कामाला पाठवून तिकडून येणाऱ्या मजुरीच्या पन्नास टक्के रक्कम मालक घेत असे.दिवाळीमध्ये या लोकांनी घरी जाण्याची मागणी केली असता मालकाने विरोध केला. मग तेरा वर्षीय शैला हिला बंधक बनवून ठेवत उर्वरित कुटुंबाला एक रुपयाही न देता गावाला पाठवले. जवळ वाचलेले १००० रु पये घेऊन कसेबसे हे कुटुंब मोखाड्यात पोहोचले. मुलगी मालकाकडे बंधक, खिशात दमडी नाही अशा स्थितीत या कुटुंबाची दिवाळी पार अंधारात गेली. शासकीय योजनेतून घरकुल लागलेले असल्याने मोहनचे वडील घरीच थांबले. दिवाळीनंतर गावातील कुणाकडून तरी ५०० रुपये उसनवारी घेऊन मोहनच्या वडिलांनी म्हणजे भिका दिवे यांनी मोहन, त्याची आई आणि दोन बहिणींना उल्हासनगर येथे धाडले.परत गेल्यावर मोहन आणि कुटुंबाला योगेश आणि त्याचा भाऊ राजू यांच्याकडे किंवा बाहेर मजुरीचे काम करावे लागे. बाहेर मिळालेल्या ३०० रु. मजुरीतून १०० रुपये त्यांना मिळत. कधी कधी तेही मिळत नसत. राजू हा गौरीला मारहाण तसेच शिवीगाळ करायचा. त्रासामुळे पळून जाण्याची इच्छा होती, पण शेठच्या भीतीमुळे काही करता आले नाही.पोलिसांची मदत घेत केली सुटकामोहनने वडील भिका दिवे यांना फोन करून सर्व सांगितले. शेवटी गावातील गावात त्यांनी याबाबत माहिती दिली. ही बाब श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांना कळताच त्यांनी तातडीने या कुटुंबाला मुक्त करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.मोखाड्यातून पांडू मालक, गणेश माळी, उल्हास भानुशाली यांच्यासह कल्याण, अंबरनाथमधील राजेश चन्ने, वासू वाघे आदी कार्यकर्त्यांनी हिल लाईन पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांची मदत घेत या पूर्ण कुटुंबाला मुक्त केले. या घटनेबाबत पंडित यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.