शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत - जिग्नेश मेवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 05:02 IST

मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. नाटके करण्यात हुशार असल्याने ते खरे ‘नटसम्राट’ आहेत. भाजपा सरकार गरिबांचा नाही, तर अंबानी-अदानींसारख्या बड्या उद्योजकांचा विकास करीत आहे.

वसई : मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. नाटके करण्यात हुशार असल्याने ते खरे ‘नटसम्राट’ आहेत. भाजपा सरकार गरिबांचा नाही, तर अंबानी-अदानींसारख्या बड्या उद्योजकांचा विकास करीत आहे. बुलेट ट्रेनच्या नावाखाली वसईतील हरितपट्टा नष्ट करण्याचे धोरण सरकारने अवलंबिले असल्याची टीका गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केली.वसईमध्ये नव्याने विकसित होणाऱ्या बुलेट ट्रेन व मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या विकास आराखड्याच्या प्रकल्पाला हजारो ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या प्रकल्पाविरोधात वसई पर्यावरण समिती व ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मेवाणी येथे आले होते. या वेळी भूमीसेना संस्थापक काळूराम धोदडे, फा. फ्रान्सिस दिब्रिटो, नगररचनाकार चंद्रशेखरप्रभू आदी उपस्थित होते.एमएमआरडीएने मुंबईसह वसई-विरार, भार्इंदर, ठाणे, पनवेल, रायगड, उरण, अलिबाग या महानगर प्राधिकरण क्षेत्रासाठी २०१६ ते २०३६ असा २० वर्षांसाठीचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. मात्र, हा आराखडा शेतकरी व भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा असल्याने त्याला विरोध झाला आहे. वसई विरारमधून या आराखड्या विरोधात ३५ हजारांहून अधिक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.बुलेट ट्रेनलाही विरोधतसेच बुलेट ट्रेन प्रकल्पालादेखील येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. बुलेट ट्रेनसारखा प्रकल्प वसई-विरारवासीयांच्या फायद्याचा नसतानाही स्थानिकांना उध्वस्त करण्याचा डाव प्रशासनाने आखला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विकासाच्या नावाखाली वसईतून कोस्टल कॉरीडोर रोड, बुलेट ट्रेन, रेल्वे कॉरीडोर, औद्योगिक क्षेत्र, असे प्रकल्प राबविले जाणार असल्याने येथील शेतकरी, मच्छीमारबांधव व भूमिपुत्र उद्धवस्त होणार असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीVasai Virarवसई विरार