शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

फेरीवाले हटावसाठी मनसे आक्रमक, पालघर पालिकेची सभा हादरली : उग्र आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:07 IST

शहरातील प्रचंड वाहतूककोंडी, फेरीवाल्यामुळे सर्वसामान्य जनतेस होणाºया त्रासाला सर्वस्वी नगरपरिषदेचे ढिम्म प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करुन मनसेने मंगळवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घुसून निषेध व्यक्त केला आणि ठिय्या आंदोलन छेडले.

पालघर : या शहरातील प्रचंड वाहतूककोंडी, फेरीवाल्यामुळे सर्वसामान्य जनतेस होणाºया त्रासाला सर्वस्वी नगरपरिषदेचे ढिम्म प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करुन मनसेने मंगळवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घुसून निषेध व्यक्त केला आणि ठिय्या आंदोलन छेडले.रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांना प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असून त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व मुख्य रस्त्यावर बसणाºया अनधिकृत फेरीवाल्यांमुळेही सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास होत असून, नागरिकांना चालणेही कठीण होऊन बसले आहे. त्यातच रोज होणाºया वाहतूककोंडीचे फेरीवाले हेच मुख्य कारण असून संबंधित अधिकारी यावर कुठलिही उपाययोजना करीत नसल्यामुळे सर्व सामान्या मधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. शहरात फेरीवाला धोरण आखले जात नसल्याने रस्त्यावर कुठेही बसणाºया या फेरीवाल्या मध्ये शिस्तच राहिलेली नसून, काही लोक स्वत:च्या स्वार्थापोटी तसेच मिळणाºया बाजारकरापोटी संबधीत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास तयार होत नाहीत.२० वर्षांतील विकासाचा लेखाजोखा मांडा-पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून देखील शहरातील प्रमुख रस्त्यापैकी एकही रस्त्यावर साधे शौचालय नसल्याची लाजिरवाणी बाब प्रकर्षाने जाणवत असून महिलांची मोठी कुचंबणा निर्माण होत आहे. या वेळी नगरपरिषदेने वीस वर्षात काय विकास कामे केली याचा लेखाजोखा जनते समोर मांडण्याची मागणी केली गेली.मुख्याधिकाºयांनी फेरीवाल्यांवर कारवाई करून, हटवावे व दिलासा द्यावा. अन्यथा, मनसे कुठल्याही क्षणी उग्र आंदोलन करेल असा इशारा माजी जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे, अनंत दळवी, तालुकाध्यक्ष समीर मोरे यांनी दिला.

टॅग्स :hawkersफेरीवालेMNSमनसे