शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

मीरा-भाईंदरच्या आयुक्तांची उचलबांगडी, वसई विरारच्या आयुक्तांना राजकीय अभय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 18:32 IST

मंगळवारी मीरा भाईंदरच्या आयुक्तांची राज्य शासनाने अवघ्या चारच महिन्यात उचलबांगडी केली. तर त्यांच्या जागी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- आशिष राणे

वसई : दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाचे रुग्णांच्या संख्येत वाढ आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अपयशी ठरलेली पालिकेची आरोग्य यंत्रणा, या सर्व बाबींचा विचार करता असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवून मंगळवारी मीरा भाईंदरच्या आयुक्तांची राज्य शासनाने अवघ्या चारच महिन्यात उचलबांगडी केली. तर त्यांच्या जागी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, मीरा भाईंदरचे आयुक्त चंद्रकांत डांगे हे फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला होता तर केवळ चार  महिन्यात त्यांना राजकीय दबाव सहन करावा लागला, मात्र याच पार्श्वभूमीवर वसई-विरारचे नेहमीच चर्चेत राहीलेले तथा कुणाचेही न ऐकणारे नवनियुक्त आयुक्त गंगाथरन देवराजन यांना मात्र राज्य शासनाने दिलेले अभय हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. 

एकूणच वसई विरारमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना त्यात आयुक्त हे पदभार स्वीकारल्यापासून  लोकप्रतिनिधीचे अजिबात ऐकत नाहीत, एकंदरीत सर्वच बाबतीत त्यांचा सत्ताधारी बविआ सोबत पंगा सुरु आहे.

विशेष म्हणजे, आयुक्त गंगाथरन देवराजन यांच्यात ही हिंमत आली कुठून तर बदली स्थगित होऊन देखील पुन्हा वसई विरार महापालिकेत रुजू होण्यासाठी त्यांना दिलेले हे अभय कोणचे आहे अथवा राज्य शासनातील कोणत्या वजनदार मंत्र्यामुळे मिळत आहे, अशी चर्चा सुरु आहे.

सत्ताधारी लोकप्रतिनिधी व महापौर यांची कोंडी !वसई विरार पालिकेमध्ये तीन महिन्यापूर्वी रुजू झालेल्या आयुक्त गंगाथरन देवराजन यांनी पदभार स्वीकारल्या पासून त्यांनी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला विश्वासात न घेताच सर्वंकष  सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे ज्या आयुक्तांना अवघ्या चार दिवसात  स्थगितीच्या आदेशाने स्वगृही परत पाठविले होते. त्याच आयुक्तांना याठिकाणी वसई विरार मध्ये कोणत्या वजनदार मंत्र्यांच्या आशीर्वादाने परत आणले किंबहुना याचीच चर्चा आता सर्वत्र रंगत आहे.

कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असताना त्यावर सर्वतोपरी उपचार व आरोग्य यंत्रणांना सोबत ठेवून सगळ्यांना बरोबर  घेऊन जावे व आपले कर्तव्य बजावले जावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्याने सांगत असताना इथं मात्र अबोल आयुक्त आपला मनमानी कारभार रेटून नेत आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री यांच्या आदेशालाच आयुक्तांनी केराची टोपली दाखविली आहे, हे उघड झाले आहे. यासंदर्भात सत्ताधारी बविआ व त्यांचे आमदार, महापौर यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार केली आहे.

हे तर आयुक्तांचे मंत्री बळ; केवळ निवडणूका डोळ्यासमोर आहेत म्हणून....आयुक्तांना कोणत्या पॉवरफुल मंत्र्यांचे पाठबळ मिळत आहे, हे आता वसईकरांपासून लपलेले नाही. हे सारे निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन करण्यात  येत असल्याचा आरोप माजी सभापती नरेंद्र पाटील यांनी केला असून ते 'लोकमत'शी बोलत होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर