शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

पर्यटकांना पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने घातली बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 17:42 IST

Mira Bhayander And Vasai Virar : मीरा भाईंदर - वसई विरार हद्दीत विस्तीर्ण समुद्रकिनारा असून या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने हॉटेल, लॉज आहेत.

मीरा रोड - पावसाळ्यात समुद्र, धबधबे, धरण, नदी, खाडी, तलाव आदी पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने १८ ऑगस्टपर्यंत बंदी घातली आहे. त्यासाठी कलम १४४ नुसार फौजदारी मनाई आदेश पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी जारी केला आहे. 

मीरा भाईंदर - वसई विरार हद्दीत विस्तीर्ण समुद्रकिनारा असून या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने हॉटेल, लॉज आहेत. समुद्रकिनारी पर्यटक तसेच मद्यपी मोठ्या संख्येने मौजमजेसाठी जात असतात. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. उंच लाटा उसळत असतात. अशा प्रसंगात समुद्रकिनारी, समुद्राच्या पाण्यात उतरणार्‍या पर्यटकांच्या जीवाला धोका असतो. समुद्रात बुडून मरण पावल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. 

तशीच परिस्थिती ही चिंचोटी सारख्या धबधब्याच्या ठिकाणी असते. पावसात या ठिकाणी पर्यटक पाण्यात वाहून मरण पावल्याच्या घटना घडत असतात. काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील चेणे गावात असलेल्या लक्ष्मी नदीत सुधा अनेक तरुण मद्यपी पार्टी झोडायला जात असतात. नदीत पोहायला उतरणारे अनेक जण बुडून मरण पावल्याच्या घटना दर वर्षी घडत असतात. त्या अनुषंगाने पावसाळ्यात जीवित हानी रोखण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी मनाई आदेश जारी केला आहे.  १८ ऑगस्ट पर्यंत समुद्र, धबधबे, नदी, धरण आदी पाण्याच्या ठिकाणी जाण्यास तसेच पाण्यात उतरण्यास पर्यटकांना कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे.

सदर ठिकाणी सेल्फी काढणे, मद्यपान करणे, मध्य विक्री करणे, ध्वनीक्षेपक डीजे वाजवणे, रस्त्यांवर वाहने थांबवणे, प्लास्टिक- थर्माकोलचा कचरा टाकणे आदींवर बंदी घातली आहे. ध्वनी, वायु व जल प्रदूषण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस