शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पर्यटकांना पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने घातली बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 17:42 IST

Mira Bhayander And Vasai Virar : मीरा भाईंदर - वसई विरार हद्दीत विस्तीर्ण समुद्रकिनारा असून या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने हॉटेल, लॉज आहेत.

मीरा रोड - पावसाळ्यात समुद्र, धबधबे, धरण, नदी, खाडी, तलाव आदी पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने १८ ऑगस्टपर्यंत बंदी घातली आहे. त्यासाठी कलम १४४ नुसार फौजदारी मनाई आदेश पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी जारी केला आहे. 

मीरा भाईंदर - वसई विरार हद्दीत विस्तीर्ण समुद्रकिनारा असून या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने हॉटेल, लॉज आहेत. समुद्रकिनारी पर्यटक तसेच मद्यपी मोठ्या संख्येने मौजमजेसाठी जात असतात. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. उंच लाटा उसळत असतात. अशा प्रसंगात समुद्रकिनारी, समुद्राच्या पाण्यात उतरणार्‍या पर्यटकांच्या जीवाला धोका असतो. समुद्रात बुडून मरण पावल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. 

तशीच परिस्थिती ही चिंचोटी सारख्या धबधब्याच्या ठिकाणी असते. पावसात या ठिकाणी पर्यटक पाण्यात वाहून मरण पावल्याच्या घटना घडत असतात. काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील चेणे गावात असलेल्या लक्ष्मी नदीत सुधा अनेक तरुण मद्यपी पार्टी झोडायला जात असतात. नदीत पोहायला उतरणारे अनेक जण बुडून मरण पावल्याच्या घटना दर वर्षी घडत असतात. त्या अनुषंगाने पावसाळ्यात जीवित हानी रोखण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी मनाई आदेश जारी केला आहे.  १८ ऑगस्ट पर्यंत समुद्र, धबधबे, नदी, धरण आदी पाण्याच्या ठिकाणी जाण्यास तसेच पाण्यात उतरण्यास पर्यटकांना कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे.

सदर ठिकाणी सेल्फी काढणे, मद्यपान करणे, मध्य विक्री करणे, ध्वनीक्षेपक डीजे वाजवणे, रस्त्यांवर वाहने थांबवणे, प्लास्टिक- थर्माकोलचा कचरा टाकणे आदींवर बंदी घातली आहे. ध्वनी, वायु व जल प्रदूषण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस