शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मीरा-भार्इंदरच्या मतदार यादीत यंदाही घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:37 IST

निवडणूक आयोगाने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांपैकी मीरा-भार्इंदर मतदारसंघ १४५ मधील याद्यांत मोठ्या प्रमाणात घोळ असून त्यात तब्बल १० हजार ५५८ मतदारांची नावे दोनवेळा नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

भार्इंदर : निवडणूक आयोगाने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांपैकी मीरा-भार्इंदर मतदारसंघ १४५ मधील याद्यांत मोठ्या प्रमाणात घोळ असून त्यात तब्बल १० हजार ५५८ मतदारांची नावे दोनवेळा नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या घोळावर मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने आक्षेप घेतला असून, घोळ सुधारण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.मतदार नोंदणीत यंदाही घोळ झाल्याचे आरोप होत असून, त्यामुळे आगामी निवडणुकांत मोठ्याप्रमाणात बोगस मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या एकट्या मीरा-भार्इंदर मतदारसंघातच १० हजार ५८८ मतदारांची नावे दोनवेळा नोंदविण्यात आली आहेत. अनेक मतदारांची केवळ नावेच नोंदविण्यात आली असून, त्यांचे पत्ते मतदार याद्यांतून गायब करण्यात आले आहेत. अनेक मतदारांच्या नावांपुढे त्यांचे छायाचित्रच प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी निवडणूक कर्मचाºयांना त्यांची ओळख पटवणे शक्य होणार नाही. एकाच इमारतीतील मतदारांना वेगवेगळ्या याद्यांत विभागण्यात आल्याने अधिकृत मतदारांच्या नावांचा गैरफायदा बोगस मतदानासाठी होण्याची शक्यता असल्याचा आरोप काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी केला. या घोळामुळे बोगस मतदानाला चालना देण्याचे काम सत्ताधाºयांच्या दबावाखाली तर होत नाही ना, असा आरोपही सावंत यांनी केला. गेल्या पालिका निवडणुकीतही सुमारे १० हजारांहून अधिक बोगस नावे नोंदविण्यात आली होती.भाजपा काळात घोळही नावे काँग्रेसनेच शोधून अधिकाºयांना वगळायला लावली होती. भाजपाच्या सत्तेतच असे घोळ झाल्याचा आरोप सावंत यांनी केला.या घोळयुक्त याद्यांवर काँग्रेस कमिटीने आक्षेप घेत, ती सुधारण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी भोईर यांना दिली.

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूकmira roadमीरा रोड