शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मंत्री खोतकरांशी घोडांची चर्चा

By admin | Updated: June 4, 2017 04:07 IST

जिल्ह्यातील किनारपट्टीवरील नामंजूर झालेल्या पाच धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांना पुन्हा मंजूरी दिली जावी यासाठी आमदार अमित घोडा यांनी मत्सोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर

- हितेन नाईक । लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यातील किनारपट्टीवरील नामंजूर झालेल्या पाच धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांना पुन्हा मंजूरी दिली जावी यासाठी आमदार अमित घोडा यांनी मत्सोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन चर्चा केली. बंधारे महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीआर झेड) नामंजूर केल्याच्या ‘लोकमत’ च्या वृत्तानंतर आमदार अमित घोडा यांनी महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, मच्छिमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधीसह मंत्र्यांची मंत्रालयात भेट घेत धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची अत्यावश्यकता असल्याचे सांगितले. ह्यावेळी पर्ससीन नेटवर बंदी, पावसाळी बंदी वाढ या महत्वपूर्ण विषयावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.पालघर जिल्ह्याला नायगाव ते झाई-बोर्डी असा प्रशस्त सागरी किनारा लाभला असून पावसाळ्याला सुरु वात झाल्याने २५ जूनला समुद्रात ५ मीटर्सच्या मोठ्या लाटा उसळणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छीमारांच्या घरांना या महाकाय लाटांपासून असणारा धोका पाहता मच्छीमारांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या घरांचे संरक्षण व्हावे, यासाठी सातपाटी, एडवण, नवापूर, तारापूर,घिवली ह्या गावासाठी पाच धूपप्रतिबंधक बंधारे मेरिटाईम बोर्डाकडून मंजूर करण्यात आले होते. मात्र हे मंजूर करण्यात आलेल्या पाच धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांना महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीआरझेड) नाहरकत दाखला देण्यास नकार दिला होता. त्यामुळे या बंधाऱ्यांची परवानगी रद्द होणार असल्याने किनाऱ्याजवळ राहणाऱ्या सर्वच घरांना धोका निर्माण झाला होता. मच्छीमारांच्या घरांना निर्माण झालेला हा धोका ओळखून लोकमतने या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्या नंतर स्थानिक लोकप्रतिनिधी, मच्छिमार संघटना, सहकारी संस्थांची धावपळ सुरू झाली होती.या पाशर््वभूमीवर पालघर विधानसभेचे आमदार अमित घोडा, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव ज्योती मेहेर, मच्छिमार संस्थेचे चेअरमन राजन मेहेर, व्हा.चेअरमन विठोबा चौधरी, कव-दालदा संघर्ष समिती अध्यक्ष जयप्रकाश मेहेर, जि.प.सदस्य शुभांगी कुटे, प.स.सदस्य मुकेश मेहेर, रमेश दवणे, जगदीश नाईक, सुधीर तामोरे, राजू कुटे ई. नी भेट घेतली. यावेळी महाकाय लाटामुळे किनाऱ्या जवळच्या घरांचे होणारे नुकसान पाहता तात्काळ बंधाऱ्यांची दुरु स्तीचे काम हाती घेण्यात यावे अशा सूचना राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. केंद्र शासनाशी बोलून सर्वत्र एकच बंदी कालावधी घोषित केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असे निदर्शनास आणून दिले. यावर आपण केंद्राशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करू असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.कोणत्या केल्या गेल्या मागण्या?यावेळी पर्ससिन मासेमारीवर बंदी असतानाही मत्स्यव्यवसाय विभागातील काही अधिकाऱ्यांच्या छुप्या पाठिंब्यामुळे प्रतिबंधित भागात सुरु असलेली मासेमारी रोखण्यासाठी मासे उतरविण्याच्या जेट्टीवर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, तसेच भविष्यात पर्ससीन मासेमारांविरोधात कडक धोरणांची अंमलबजावणी करावी, तसेच सध्या १ जून ते ३१ जुलै असा दोन महिन्याचा मासेमारी बंदी कालावधी घोषित करण्यात आला असला तरी माशांची सुरु असलेली अपरिमित मासेमारी आणि मत्स्यप्रजोत्पादन काळानंतर लहान माशांची होणारी मासेमारी पाहता मत्स्य उत्पादनात मोठी घट होत आहे.त्यामुळे १ जून ऐवजी १ मे पासूनच मासेमारी बंदी ची घोषणा केल्यास माशाच्या उत्पादन वाढीस मोठा हातभार लागू शकतो ही बाब मच्छिमार प्रतिनिधींनी राज्यमंत्र्याचा लक्षात आणून दिले गेले.