शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पाण्याच्या योजनांचा मंत्री घेणार आढावा, गुलाबराव पाटलांचा सोमवारी दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 23:26 IST

Gulabrao Patil : पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यातील पाण्याच्या अनेक योजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येत असून सफाळेवासीयांच्या पाणी प्रश्नावर सकारात्मक उपाययोजना आखली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.विश्वास वळवी यांनी दिली.

पालघर : मागील ९ वर्षांपासून सफाळे भागासाठी कार्यान्वित असलेली परंतु समस्याग्रस्त बनलेल्या उंबरपाडा-नंदाडे व १७ गावे नळपाणीपुरवठा योजनेला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी विश्वास फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यातील पाण्याच्या अनेक योजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येत असून सफाळेवासीयांच्या पाणी प्रश्नावर सकारात्मक उपाययोजना आखली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.विश्वास वळवी यांनी दिली.करवाळे धरणातून उंबरपाडा-नंदाडे व १७ गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेंतर्गत उंबरपाडा-नंदाडे, सफाळे, सरतोंडी, कर्दळ, कपासे, माकणे, मांडे, वेढी, मांजुर्ली, विराथन खुर्द, विराथन बुद्रुक, नवघर, करवाळे, विठ्ठलवाडी, जलसार, टेंभी खोडावे, वाढीव, सरावली, मिठागर आदी गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून एप्रिल २००५ मध्ये कार्यान्वित झालेली ही नळपाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून हेलकावे खात असून टेम्भी खोडावेसारख्या शेवटच्या टोकावरील अनेक गावांत आजही पुरेसे पाणी पोचले नसल्याने लोकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की येत होती. सफाळे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने वाढते नागरिकीकरण आणि परिसरातील पर्यटनस्थळे पाहता करवाळे धरणात वांद्री धरणातून पाणी आणणे गरजेचे बनले आहे. जलशुद्धीकरण केंद्र तातडीने उभारणे आणि राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाच्या २०१३-१४ च्या कृती आराखड्यात खास बाब म्हणून या योजनेचा समावेश करून सुधारित योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करणे आवश्यक असल्याचे विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास वळवी यांनी संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. या वेळी वाढीवचे शाखाप्रमुख हर्षद पाटील,जलसारचे सरपंच गणेश भोईर आदी उपस्थित होते.

टॅग्स :palgharपालघर