शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

पाण्याच्या योजनांचा मंत्री घेणार आढावा, गुलाबराव पाटलांचा सोमवारी दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 23:26 IST

Gulabrao Patil : पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यातील पाण्याच्या अनेक योजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येत असून सफाळेवासीयांच्या पाणी प्रश्नावर सकारात्मक उपाययोजना आखली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.विश्वास वळवी यांनी दिली.

पालघर : मागील ९ वर्षांपासून सफाळे भागासाठी कार्यान्वित असलेली परंतु समस्याग्रस्त बनलेल्या उंबरपाडा-नंदाडे व १७ गावे नळपाणीपुरवठा योजनेला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी विश्वास फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यातील पाण्याच्या अनेक योजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येत असून सफाळेवासीयांच्या पाणी प्रश्नावर सकारात्मक उपाययोजना आखली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.विश्वास वळवी यांनी दिली.करवाळे धरणातून उंबरपाडा-नंदाडे व १७ गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेंतर्गत उंबरपाडा-नंदाडे, सफाळे, सरतोंडी, कर्दळ, कपासे, माकणे, मांडे, वेढी, मांजुर्ली, विराथन खुर्द, विराथन बुद्रुक, नवघर, करवाळे, विठ्ठलवाडी, जलसार, टेंभी खोडावे, वाढीव, सरावली, मिठागर आदी गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून एप्रिल २००५ मध्ये कार्यान्वित झालेली ही नळपाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून हेलकावे खात असून टेम्भी खोडावेसारख्या शेवटच्या टोकावरील अनेक गावांत आजही पुरेसे पाणी पोचले नसल्याने लोकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की येत होती. सफाळे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने वाढते नागरिकीकरण आणि परिसरातील पर्यटनस्थळे पाहता करवाळे धरणात वांद्री धरणातून पाणी आणणे गरजेचे बनले आहे. जलशुद्धीकरण केंद्र तातडीने उभारणे आणि राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाच्या २०१३-१४ च्या कृती आराखड्यात खास बाब म्हणून या योजनेचा समावेश करून सुधारित योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करणे आवश्यक असल्याचे विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास वळवी यांनी संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. या वेळी वाढीवचे शाखाप्रमुख हर्षद पाटील,जलसारचे सरपंच गणेश भोईर आदी उपस्थित होते.

टॅग्स :palgharपालघर