शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

म्हात्रे खून : पोलिसांवर 30 वर्षांनंतर कारवाई होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:08 IST

मागासवर्गीय आयोगाने मागविला अहवाल; बोगस साक्षीदारांवरही अ‍ॅक्शन

नालासोपारा : १९८८ साली घडलेल्या यादव म्हात्रे यांच्या निर्घृण खून खटल्यात धनदांडग्या मारेकऱ्यांना वाचविण्यासाठी गरीब आदिवासींना नाहक गोवणाऱ्या पोलिसांवर अखेर कारवाईची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण या प्रकरणी राष्ट्रीय आदिवासी आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना व पालघर पोलीस अधीक्षकांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल पाठविण्याचा आदेश दिला आहे.१९८८ साली कामण येथील सामाजिक कार्यकर्ते यादव म्हात्रे यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.या खुनातील धनदांडग्या आरोपींना वाचविण्यासाठी गरीब आदिवासींना नाहक गोव्यात आले होते. त्यांनी कबुली द्यावी यासाठी त्यांचा अमानुष छळ करण्यात आला होता. दरम्यान त्यापैकी एका आदिवासीचा मृत्यू झाला होता.तर एक आदिवासी अजूनही मरणोन्मुख आहे.या लढ्यात आदिवासी सेवक व यादव यांचे सख्खे भाऊ गंगाधर म्हात्रे यांनी लढा दिल्यामुळे अटकेत असलेल्या आदिवासी आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.गेली ३० वर्षे हा लढा ते एकटे लढत आहेत. त्यांनी या खटल्यातील सीआयडी अधिका-यांची लबाडी कोर्टाच्या निदर्शनास आणली होती. या दुष्कृत्याचा जाब पोलिसांना आता मागासवर्गीय आयोगापुढे द्यावा लागणार आहे. त्यामुळे पोलिसांचे व या खटल्यात खोटी साक्ष देणाºयांचे धाबे दणाणले आहेत.त्यानुसार आता चौकशी व कारवाईची चक्रे वेगाने फिरणार आहेत.काय आहे यादव खून प्रकरण...कामण येथील यादव म्हात्रे यांचा २९ जून १९८७ साली गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.हे प्रकरण त्यावेळी खूप गाजले होते.हा खून होतांना पाहणारे प्रत्यक्षदर्र्शी व त्यांचे लहान बंधू गंगाधर म्हात्रे गेली तीस वर्षे आपल्या भावाच्या मारेकºयांना शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयात ३० वर्षे झुंज देत आहेत.यात त्यांना हळूहळू न्याय मिळू लागल्यामुळे आरोपींचे धाबे दणाणले होते. त्यांच्यावर गेल्या वर्षी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली.अनेक शस्त्रक्रि या व लाखो रूपये खर्च केल्यानंतरही वर्षभर ते बिछान्यावर पडून होते.त्यानंतरही बरे झाल्यावर आपल्या भावाच्या मारेकºयांना शिक्षा मिळावी हा एकच ध्यास घेतलेल्या म्हात्रे यांनी बचेंगे तो और भी लढेंगे म्हणत आपला लढा सुरू ठेवला. आरोपींकडून आपल्यावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेवून त्यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. परिस्थीतीचे गांर्भीय लक्षात घेऊन राज्य माहिती आयुक्त थँक्सी थेकेकरा यांनी म्हात्रे यांना पोलिस संरक्षण देण्याचे आदेश दिले.पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांनी दोन महिने टाळाटाळ केल्यानंतर पोलिस संरक्षण दिले होते. नवे पोलीस अधीक्षक सिंगे यांनी पूर्वसूचना न देता त्यांचे संरक्षण काढून घेतले. त्यांनी सिंगे यांची भेट घेऊन या प्रकरणी खुलासा मागीतला असता जिल्हा पोलीस संरक्षण कमिटीच्या निर्णयानुसार ते काढून घेतल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या खटल्यात आदिवासींना गोवून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिस अधिकाºयांवर व खोटी साक्ष देणाºयांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.खºया आरोपींना सोडून तीन आदिवासींना पोलिसांनी या प्रकरणात गोवले होते. दिलीप, अशोक व गणपत तुंबडा यांनी गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. त्यामुळे अशोक तुंबडांचा १४ दिवसात तर त्याचे वडील गणपत तुंबडा यांचा वर्षभरात मृत्यू झाला. दिलीप तुंबडा हे हाडामांसाचा गोळा बनून जिवंत आहे. २२ वर्षानंतर तुंबडांची मुक्तता झाली. त्यानंतर मूळ आरोपींवर खटला भरला. त्यामुळे मुख्य आरोपींना अभय देण्यासाठी पोलिसांनी तुंबडाकुटुंबीयांचा बळी घेतल्याचे उघड झाले.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाVasai Virarवसई विरार