शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

मीरा-भार्इंदर: परिवहन विभागाला मिळणार आगार, १२ वर्षे प्रतीक्षा : मे २०१८ मध्ये खुला होणार, कर्मचा-यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 02:29 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाची स्थापना २००५ मध्ये होऊन हा विभाग मात्र आगारापासून वंचित आहे. परंतु, मे २०१८ मध्ये आगार मिळणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सांगितले.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाची स्थापना २००५ मध्ये होऊन हा विभाग मात्र आगारापासून वंचित आहे. परंतु, मे २०१८ मध्ये आगार मिळणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सांगितले.२५ सप्टेंबर २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन कंत्राटावर परिवहन सेवा सुरू केली. त्यासाठी १०० बस खरेदी केल्या असल्या तरी आतापर्यंत केवळ ४८ बसच सेवेत सामावून घेतल्या आहेत. उर्वरित बस आगाराअभावी कंपनीत धूळखात आहेत. या सर्व सेवा सुरू करताना पालिकेने कंत्राटदारांसोबत केलेल्या करारात आगाराची सोय करून देण्याचा उल्लेख केला असला, तरी अद्यापही आगार दिलेले नाही. मीरा रोडच्या कनाकिया व प्लेझंट पार्क येथे बस उभ्या करण्यासाठी जागा दिली आहे. त्यापैकी कनाकिया येथील जागेत जुन्या कंत्राटातील ५० नादुरुस्त बस ठेवल्या असून प्लेझंट पार्क येथे सध्या बस उभ्या केल्या जात आहेत. या ठिकाणीदेखील पुरेशा सुविधा नसल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी पसरली आहे. परिवहन विभागासाठी घोडबंदर येथील ट्रक टर्मिनससाठी राखीव असलेल्या जागेवरील ५ एकर जागेवर आगाराची दुमजली इमारत बांधण्यात येत आहे.या आगारात एकावेळी २३ बस उभ्या करता येणार असून तळ मजल्यावर कॅश कलेक्शन सेंटर, कॉन्फरन्स रूम, कंट्रोलर अलोकेशन सेंटर व नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर चालक, वाहकांसाठी विश्रांती कक्ष असेल. दुसºया मजल्यावर अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कक्षासह कॅन्टीनची सोय करण्यात येणार आहे.आगारातच इंधन तसेच कार्यशाळेची केली जाणार सोयआगारातच बसमध्ये इंधन भरण्याची सोय करून देण्यात येणार असून त्यासाठी दोन यंत्रे बसवण्यात येणार आहेत. यासाठी एकूण ३६ कोटींचा खर्च होणार असून या आगारात अद्ययावत संगणक प्रणालीचा वापर केला जाणार आहे.त्यात इमारत व्यवस्थापन सॉफ्टवेअर व पार्किंग व्यवस्थापन सिस्टीमचा समावेश आहे. या आगाराचा वापर मे २०१८ मध्ये सुरू होणार असून त्यादृष्टीने कामे पूर्ण करण्यात येत असल्याचेआयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक