शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

सर्वच पक्षांत जुळतील नवी समीकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:53 IST

या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा जो निकाल लागला आहे.

पालघर : या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा जो निकाल लागला आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील सत्ता समीकरणे बदलली जाणार आहेत. राजेंद्र गावितांचा विजय झाला असला तरी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा, जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे आणि राज्यकार्यकारणी सदस्य बाबाजी काठोळे यांना ज्यापद्धतीने मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रचारयंत्रणेपासून दूर ठेवले आणि आपल्या विश्वासातील आमदार प्रविण दरेकर यांच्या हाती सगळी प्रचारसूत्रे दिली. ते सूचक होते आता या दृष्टीकोनातून भाजपमध्ये बरेच संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत. विक्रमगडचे नेते आणि विकास आघाडीचे सूत्रधार निलेश सांबरे यांच्यारुपाने भाजपाच्या हाती मोठा नेता लागला आहे. त्यामुळे त्यांना संघटनेत महत्वाचे पद मिळू शकते. तसेच ते भाजपचे एखाद्या मतदारसंघातील उमेदवारही ठरू शकतील. पालघर जिल्ह्याला नवा जिल्हाध्यक्षही लाभू शकतो.तसेच आगामी निवडणूकीच्या प्रचाराची सूत्रे प्रविण दरेकर यांच्याकडेच पुन्हा सोपविली जाऊ शकतात. पालघर जिल्ह्याची फारशी माहिती नसताना व तिथे शिवसेनेचा आमदार असताना त्यांनी भाजप उमेदवाराला ३ हजारांहून अधिक मतांची आघाडी प्राप्त करून दिली आहे. ते पाहता ते आता या मतदारसंघात भाजपला विजयाप्रती आश्वस्त करणारे नेते ठरले आहेत. त्यामुळे त्यांचेच जिल्ह्यात आणि भाजपाच्या राज्यसंघटनेत महत्व वाढलेले आहे. तर या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य बाबाजी काठोळे यांचीही गच्छंती होण्याची चिन्हे आहेत. तसेच विष्णू सवरा यांच्याही स्थानाला धक्का लागू शकतो.शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा जरी पराभूत झालेले असले तरी पहिल्याच निवडणूकीत निवडणूक मोहिमेचे सूत्रधार आणि पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक तसेच दोन नवनियुक्त जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण आणि राजेश शहा यांचे संघटनेतील महत्व निश्चितच वाढणार आहे.काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दत्ता नर हे भाजपात प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकारिणीची रचना नव्याने होण्याची शक्यता आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष केदार काळे यांचा कोणताही प्रभाव या निवडणूकीत न पडल्याने त्यांनाही नारळ मिळू शकतो. तर अनेकदा खासदारकी जिंकलेल्या शिंगडा यांना पडलेली ४७७१४ मते पाहता यापुढे त्यांचा उमेदवारीसाठी विचार होईल की नाही असा प्रश्न निर्माण होईल. काहीही झाले तरी मला किंवा माझ्या पुत्राला लोकसभेची उमेदवारी दिली पाहिजे या त्यांच्या अट्टाहासाला काँग्रेस यापुढे बळी पडणार नाही, असेही चित्र आहे. याचा अर्थ या मतदारसंघात काँग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागेल किंवा राष्टÑवादीसोबत आघाडी झाली तर हा मतदार संघ राष्टÑवादीला अर्पण करावा लागेल.