शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

सर्वच पक्षांत जुळतील नवी समीकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:53 IST

या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा जो निकाल लागला आहे.

पालघर : या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा जो निकाल लागला आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील सत्ता समीकरणे बदलली जाणार आहेत. राजेंद्र गावितांचा विजय झाला असला तरी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा, जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे आणि राज्यकार्यकारणी सदस्य बाबाजी काठोळे यांना ज्यापद्धतीने मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रचारयंत्रणेपासून दूर ठेवले आणि आपल्या विश्वासातील आमदार प्रविण दरेकर यांच्या हाती सगळी प्रचारसूत्रे दिली. ते सूचक होते आता या दृष्टीकोनातून भाजपमध्ये बरेच संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत. विक्रमगडचे नेते आणि विकास आघाडीचे सूत्रधार निलेश सांबरे यांच्यारुपाने भाजपाच्या हाती मोठा नेता लागला आहे. त्यामुळे त्यांना संघटनेत महत्वाचे पद मिळू शकते. तसेच ते भाजपचे एखाद्या मतदारसंघातील उमेदवारही ठरू शकतील. पालघर जिल्ह्याला नवा जिल्हाध्यक्षही लाभू शकतो.तसेच आगामी निवडणूकीच्या प्रचाराची सूत्रे प्रविण दरेकर यांच्याकडेच पुन्हा सोपविली जाऊ शकतात. पालघर जिल्ह्याची फारशी माहिती नसताना व तिथे शिवसेनेचा आमदार असताना त्यांनी भाजप उमेदवाराला ३ हजारांहून अधिक मतांची आघाडी प्राप्त करून दिली आहे. ते पाहता ते आता या मतदारसंघात भाजपला विजयाप्रती आश्वस्त करणारे नेते ठरले आहेत. त्यामुळे त्यांचेच जिल्ह्यात आणि भाजपाच्या राज्यसंघटनेत महत्व वाढलेले आहे. तर या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य बाबाजी काठोळे यांचीही गच्छंती होण्याची चिन्हे आहेत. तसेच विष्णू सवरा यांच्याही स्थानाला धक्का लागू शकतो.शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा जरी पराभूत झालेले असले तरी पहिल्याच निवडणूकीत निवडणूक मोहिमेचे सूत्रधार आणि पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक तसेच दोन नवनियुक्त जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण आणि राजेश शहा यांचे संघटनेतील महत्व निश्चितच वाढणार आहे.काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दत्ता नर हे भाजपात प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकारिणीची रचना नव्याने होण्याची शक्यता आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष केदार काळे यांचा कोणताही प्रभाव या निवडणूकीत न पडल्याने त्यांनाही नारळ मिळू शकतो. तर अनेकदा खासदारकी जिंकलेल्या शिंगडा यांना पडलेली ४७७१४ मते पाहता यापुढे त्यांचा उमेदवारीसाठी विचार होईल की नाही असा प्रश्न निर्माण होईल. काहीही झाले तरी मला किंवा माझ्या पुत्राला लोकसभेची उमेदवारी दिली पाहिजे या त्यांच्या अट्टाहासाला काँग्रेस यापुढे बळी पडणार नाही, असेही चित्र आहे. याचा अर्थ या मतदारसंघात काँग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागेल किंवा राष्टÑवादीसोबत आघाडी झाली तर हा मतदार संघ राष्टÑवादीला अर्पण करावा लागेल.