शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

सातपाटीमध्ये काढली मशालयात्रा

By admin | Updated: September 17, 2016 01:45 IST

इंग्रजा च्या विरोधातील पालघरच्या चले जावं चळवळीत सहभागी होताना ‘माझं गलबत मी वादळात सोडतोय, मी परत आलो नाही तर दु:ख करू नका ’ अशी चिठ्ठी घरी लिहून स्वातंत्र्याच्या इर्षेने पेटून उठून नंतर

पालघर : इंग्रजा च्या विरोधातील पालघरच्या चले जावं चळवळीत सहभागी होताना ‘माझं गलबत मी वादळात सोडतोय, मी परत आलो नाही तर दु:ख करू नका ’ अशी चिठ्ठी घरी लिहून स्वातंत्र्याच्या इर्षेने पेटून उठून नंतर हौतात्म्य पत्करलेल्या सातपाटीच्या हुतात्मा काशीनाथ भाई पागधरे या तरुणांचा जन्मदिवस (१४ सप्टेंबर) सातपाटी मध्ये जन्मशताब्दी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यांच्या बालिदानातून स्फूर्ती घेतलेल्या शेकडो तरुणांनी गावात मशाल यात्रेचे आयोजन करीत त्यांना मानवंदना दिली.१२ मार्च १९३० रोजी गांधीजींनी सुरु वात केलेल्या दांडी यात्रेनंतर पालघर तालुक्यात स्वातंत्र्य लढ्याला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आलेल्या म. रा.गोसावी वकील आदींनी प्रथम सातपाटीच्या श्रीराम मंदिरा समोर मोठी सभा घेऊन काळ्या टोप्या आणि परदेशी कपड्यांची होळी केली. आणि सातपाटी गावातून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य संग्रामाच्या धुगधुगीला सुरु वात झाली. त्या वेळे पासून सातपाटी हे स्वातंत्र्य संग्रामात पालघर तालुक्यातील चळवळीचे केंद्र बनले. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदेशातून पेटून उठलेल्या सातपाटी मधील शेकडो स्वातंत्र्यवीरांनी त्यावेळी ह्या स्वातंत्र्याच्या संग्रामात स्वत:ला झोकून दिले होते. ७ व ८ आॅगस्ट रोजी मुंबईच्या गवळी तलाव मैदानावर भरलेल्या काँग्रेस महाअधिवेशनातील ‘चले जावं’ च्या घोषणेचे पडसाद देशासह सातपाटीतही उमटले. धर्माजी तांडेल आदी नेते आणि नारायण दांडेकर, भुवनेश कीर्तने, मारुती मेहेर यांच्या भाषणा नंतर एक अपूर्व क्रांतीची ज्योत पेटून चंद्रभागा मेहेर, मंजुळा तरे, तुळसा पाटील, हिरु बाई मेहेर इ, महिलांसह काशीनाथभाई व रामचंद्र पागधरे, पंडित मेहेर, बाबुराव पाटील इ,सह ७०० ते ८०० तरुण पालघरच्या कचेरीवर तिरंगा झेंडा फडकविण्यासाठी त्वेशाने निघाले. १३ आॅगस्ट रोजी सात ते आठ हजारांचा जनसागर पालघरमध्ये जमल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी मोर्च्यातील नांदगावच्या चिंतू नाना पाटील यांना इंग्रजांचे सरकारी अधिकारी आल्मीडा यांनी रोखून शिवी हासडल्याने तरुणवर्ग भडकला अशा वेळी नांदगावच्या गोविंद गणेश ठाकूर यांनी ध्वज हातात घेवून वंदे मातरमची घोषणा करीत कचेरीच्या दिशेने मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी आल्मीडा ने झाडलेली गोळीने त्याच्या छातीचा वेध घेतला. पेटून उठलेल्या काशिनाथभार्इंनी त्याच वेळी हातातील ध्वज फडकवीत पुढे कूच केली.पण इंग्रजांच्या बंदुकीतून सुटलेल्या एका गोळीने त्यांच्या कपाळाचा वेध घेतला आणि ते धारातीर्थी पडले.