शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सातपाटीमध्ये काढली मशालयात्रा

By admin | Updated: September 17, 2016 01:45 IST

इंग्रजा च्या विरोधातील पालघरच्या चले जावं चळवळीत सहभागी होताना ‘माझं गलबत मी वादळात सोडतोय, मी परत आलो नाही तर दु:ख करू नका ’ अशी चिठ्ठी घरी लिहून स्वातंत्र्याच्या इर्षेने पेटून उठून नंतर

पालघर : इंग्रजा च्या विरोधातील पालघरच्या चले जावं चळवळीत सहभागी होताना ‘माझं गलबत मी वादळात सोडतोय, मी परत आलो नाही तर दु:ख करू नका ’ अशी चिठ्ठी घरी लिहून स्वातंत्र्याच्या इर्षेने पेटून उठून नंतर हौतात्म्य पत्करलेल्या सातपाटीच्या हुतात्मा काशीनाथ भाई पागधरे या तरुणांचा जन्मदिवस (१४ सप्टेंबर) सातपाटी मध्ये जन्मशताब्दी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यांच्या बालिदानातून स्फूर्ती घेतलेल्या शेकडो तरुणांनी गावात मशाल यात्रेचे आयोजन करीत त्यांना मानवंदना दिली.१२ मार्च १९३० रोजी गांधीजींनी सुरु वात केलेल्या दांडी यात्रेनंतर पालघर तालुक्यात स्वातंत्र्य लढ्याला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आलेल्या म. रा.गोसावी वकील आदींनी प्रथम सातपाटीच्या श्रीराम मंदिरा समोर मोठी सभा घेऊन काळ्या टोप्या आणि परदेशी कपड्यांची होळी केली. आणि सातपाटी गावातून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य संग्रामाच्या धुगधुगीला सुरु वात झाली. त्या वेळे पासून सातपाटी हे स्वातंत्र्य संग्रामात पालघर तालुक्यातील चळवळीचे केंद्र बनले. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदेशातून पेटून उठलेल्या सातपाटी मधील शेकडो स्वातंत्र्यवीरांनी त्यावेळी ह्या स्वातंत्र्याच्या संग्रामात स्वत:ला झोकून दिले होते. ७ व ८ आॅगस्ट रोजी मुंबईच्या गवळी तलाव मैदानावर भरलेल्या काँग्रेस महाअधिवेशनातील ‘चले जावं’ च्या घोषणेचे पडसाद देशासह सातपाटीतही उमटले. धर्माजी तांडेल आदी नेते आणि नारायण दांडेकर, भुवनेश कीर्तने, मारुती मेहेर यांच्या भाषणा नंतर एक अपूर्व क्रांतीची ज्योत पेटून चंद्रभागा मेहेर, मंजुळा तरे, तुळसा पाटील, हिरु बाई मेहेर इ, महिलांसह काशीनाथभाई व रामचंद्र पागधरे, पंडित मेहेर, बाबुराव पाटील इ,सह ७०० ते ८०० तरुण पालघरच्या कचेरीवर तिरंगा झेंडा फडकविण्यासाठी त्वेशाने निघाले. १३ आॅगस्ट रोजी सात ते आठ हजारांचा जनसागर पालघरमध्ये जमल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी मोर्च्यातील नांदगावच्या चिंतू नाना पाटील यांना इंग्रजांचे सरकारी अधिकारी आल्मीडा यांनी रोखून शिवी हासडल्याने तरुणवर्ग भडकला अशा वेळी नांदगावच्या गोविंद गणेश ठाकूर यांनी ध्वज हातात घेवून वंदे मातरमची घोषणा करीत कचेरीच्या दिशेने मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी आल्मीडा ने झाडलेली गोळीने त्याच्या छातीचा वेध घेतला. पेटून उठलेल्या काशिनाथभार्इंनी त्याच वेळी हातातील ध्वज फडकवीत पुढे कूच केली.पण इंग्रजांच्या बंदुकीतून सुटलेल्या एका गोळीने त्यांच्या कपाळाचा वेध घेतला आणि ते धारातीर्थी पडले.