शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

सातपाटीमध्ये काढली मशालयात्रा

By admin | Updated: September 17, 2016 01:45 IST

इंग्रजा च्या विरोधातील पालघरच्या चले जावं चळवळीत सहभागी होताना ‘माझं गलबत मी वादळात सोडतोय, मी परत आलो नाही तर दु:ख करू नका ’ अशी चिठ्ठी घरी लिहून स्वातंत्र्याच्या इर्षेने पेटून उठून नंतर

पालघर : इंग्रजा च्या विरोधातील पालघरच्या चले जावं चळवळीत सहभागी होताना ‘माझं गलबत मी वादळात सोडतोय, मी परत आलो नाही तर दु:ख करू नका ’ अशी चिठ्ठी घरी लिहून स्वातंत्र्याच्या इर्षेने पेटून उठून नंतर हौतात्म्य पत्करलेल्या सातपाटीच्या हुतात्मा काशीनाथ भाई पागधरे या तरुणांचा जन्मदिवस (१४ सप्टेंबर) सातपाटी मध्ये जन्मशताब्दी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यांच्या बालिदानातून स्फूर्ती घेतलेल्या शेकडो तरुणांनी गावात मशाल यात्रेचे आयोजन करीत त्यांना मानवंदना दिली.१२ मार्च १९३० रोजी गांधीजींनी सुरु वात केलेल्या दांडी यात्रेनंतर पालघर तालुक्यात स्वातंत्र्य लढ्याला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आलेल्या म. रा.गोसावी वकील आदींनी प्रथम सातपाटीच्या श्रीराम मंदिरा समोर मोठी सभा घेऊन काळ्या टोप्या आणि परदेशी कपड्यांची होळी केली. आणि सातपाटी गावातून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य संग्रामाच्या धुगधुगीला सुरु वात झाली. त्या वेळे पासून सातपाटी हे स्वातंत्र्य संग्रामात पालघर तालुक्यातील चळवळीचे केंद्र बनले. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदेशातून पेटून उठलेल्या सातपाटी मधील शेकडो स्वातंत्र्यवीरांनी त्यावेळी ह्या स्वातंत्र्याच्या संग्रामात स्वत:ला झोकून दिले होते. ७ व ८ आॅगस्ट रोजी मुंबईच्या गवळी तलाव मैदानावर भरलेल्या काँग्रेस महाअधिवेशनातील ‘चले जावं’ च्या घोषणेचे पडसाद देशासह सातपाटीतही उमटले. धर्माजी तांडेल आदी नेते आणि नारायण दांडेकर, भुवनेश कीर्तने, मारुती मेहेर यांच्या भाषणा नंतर एक अपूर्व क्रांतीची ज्योत पेटून चंद्रभागा मेहेर, मंजुळा तरे, तुळसा पाटील, हिरु बाई मेहेर इ, महिलांसह काशीनाथभाई व रामचंद्र पागधरे, पंडित मेहेर, बाबुराव पाटील इ,सह ७०० ते ८०० तरुण पालघरच्या कचेरीवर तिरंगा झेंडा फडकविण्यासाठी त्वेशाने निघाले. १३ आॅगस्ट रोजी सात ते आठ हजारांचा जनसागर पालघरमध्ये जमल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी मोर्च्यातील नांदगावच्या चिंतू नाना पाटील यांना इंग्रजांचे सरकारी अधिकारी आल्मीडा यांनी रोखून शिवी हासडल्याने तरुणवर्ग भडकला अशा वेळी नांदगावच्या गोविंद गणेश ठाकूर यांनी ध्वज हातात घेवून वंदे मातरमची घोषणा करीत कचेरीच्या दिशेने मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी आल्मीडा ने झाडलेली गोळीने त्याच्या छातीचा वेध घेतला. पेटून उठलेल्या काशिनाथभार्इंनी त्याच वेळी हातातील ध्वज फडकवीत पुढे कूच केली.पण इंग्रजांच्या बंदुकीतून सुटलेल्या एका गोळीने त्यांच्या कपाळाचा वेध घेतला आणि ते धारातीर्थी पडले.