शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मार्क्सवाद्यांचा मोर्चा, सहायक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 00:09 IST

अनेक मागण्यांसाठी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. रडका कलांगडा यांच्या नेतृत्वाखाली, डहाणू पारनाका ते सहा. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो आदिवासी स्त्री - पुरुषांनी मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

डहाणू : अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, तत्काळ नुकसानभरपाई देण्यात येऊन, त्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, तसेच भूकंपात नुकसान झालेल्या नागरिकांना सहाय्य करून दक्षतेच्या उपाय योजना राबविण्यात याव्यात, आरोग्य, शिक्षण, विद्युतीकरण, सार्वजनिक वितरण व्यवस्था, समाज कल्याण योजना, अशा प्रलंबित योजनांची अंमलबजावणी पूर्ण करण्यात यावी, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. रडका कलांगडा यांच्या नेतृत्वाखाली, डहाणू पारनाका ते सहा. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो आदिवासी स्त्री - पुरुषांनी मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात, कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, तसेच लहान व्यावसायिक, आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक यांच्या ज्वलंत प्रलंबित असलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, त्याचबरोबर वृद्ध, विधवा, अपंग, लाभार्थ्यांना सहाय्य करणे, कृषी विकास आणि मत्स्य व्यवसायाला संरक्षण देण्यात यावे, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, त्याचप्रमाणे नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रदूषण रोखण्यात यावे, अशा अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी नवनिर्वाचित आमदार विनोद निकोले, कॉ.लहानी दौडा, किसान सभा सचिव, चंद्रकांत वरठा, किसान सभा अध्यक्ष, चंद्रकांत घोरखना, डी.वाय.एफ.आय.चे रामदास सुतार, चंदू कोम, बच्चू वाघात, रमेश घुले, रडका गोवारी आदी सहभागी झाले.शेतक-यांचे प्रश्न सुटेपर्यंत आंदोलनविक्रमगड : तालुक्यातील शेतकºयांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेली पिकांचे नुकसान होऊन मातीमोल झाली आहेत. भात शेती कुजून १०० टक्के नुकसान झाले. ज्वारी, उडीद, तूर, भुईमुग, खुरासनी, ही सर्व पिके उद्ध्वस्त झाली. याचे शासन पातळीवर पंचनामे करण्यात आले. मात्र मिळणारी मदत तुटपुंजी आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून, शेतकºयांना रू.२५ हजार रूपये एकरी देण्यात यावे, अशी मागणी माकपाच्या सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चात करण्यात आली.शेतकºयांना एकरामागे २५ हजार रूपये देणे मंजूर करावे, वन अधिकाराची काटेकोर अंमलबजावणी करणे, कुर्झे येथील बेकायदेशीर चालू असलेला कत्तल खाना बंद करण्यात यावा, वाकी ग्रामदान मंडळ येथील निवडणुकीची चौकशी करणे, इंदिरा आवास, पंतप्रधान शबरी आदिवासी निवास योजनेची काटेकोर अंमलबजावणी करणे, विक्रमगड तालुक्यात उपजिल्हा रूग्णालय तयार करणे, तालुका कृषीमधील विविध योजनांची माहिती व आराखडा तयार करून प्रत्येक ग्रामपंचायतीला माहिती देणे, आदिवासी प्रकल्पातून मिळणाºया योजनांची माहिती आदिवासी बांधवांना देण्यात यावी.या सर्व मागण्या जोपर्यंत शासन देण्याचे मान्य करणार नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू राहील, अशी माहिती तालुका सचिव किरण गहला यांनी दिली अनेक प्रश्न जुने असून ते प्रलंबित आहे. परंतु शासन याकडे लक्ष देत नसल्याने हे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

टॅग्स :palgharपालघर