शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सागरी पर्यटनस्थळे ड्रग्जमाफियांच्या रडारवर?, सुरक्षा यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 23:49 IST

Palghar : पालघर जिल्ह्याला ११० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

-   हितेन नाईक/अनिरुद्ध पाटील 

पालघर/बोर्डी : मुंबईत ड्रग्जमाफियांवर पोलीस आणि अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडून छापेसत्र सुरू असल्याने, ते लगतच्या उपनगराकडे वळले आहेत. तेथेही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे नाताळ आणि ३१ डिसेंबर या काळात पालघर जिल्ह्यातील सागरी पर्यटनस्थळांना हे माफिया लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, येथील सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.पालघर जिल्ह्याला ११० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. येथे वसई, कळंब, अर्नाळा, राजोडी, कोरे, उसरणी, केळवे, चिंचणी, पारनाका, चिखले, घोलवड, बोर्डी आणि झाई ही सागरी पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहेत. यापैकी बहुतेक चौपाट्या वस्तीपासून लांब आणि गर्द सुरू बागांनी वेढलेल्या असल्याने निर्मनुष्य अशा या भागात नीरव शांतता असते. त्यामुळे बाहेरून आलेले पर्यटक आणि स्थानिक यांचा संबंध कमी येतो.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात आठ महिने हॉटेल व्यवसायाने मंदीचा सामना केला आहे. नाताळ आणि ३१ डिसेंबर या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दाखल होणाऱ्या पर्यटकांना विशेष कार्यक्रम आणि सवलतीचे पॅकेज देऊन पर्यटकांना आकर्षित करून, या व्यवसायाला उभारी देण्याचा प्रयत्न या व्यावसायिकांकडून केला जात आहे. सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्युनंतर मुंबईत ड्रग्जमाफियांवर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाकडून कारवाई सुरू झाल्याने, त्यांनी उपनगरांकडे मोर्चा वळविला आहे. मात्र, तेथेही कारवाई सुरू झाली आहे. नाताळ ते नवीन वर्ष या काळात शहरी पर्यटक विविध भागांतून पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळाला पसंती देतात. कोरोनाचा धोका लक्षात घेता, राज्य शासनाने ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.

पाेलिसांचीही असणार नजरयंदा ग्रामीण भागातील सागरी पर्यटनस्थळांना ड्रग्ज पेडलर्स लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संभाव्य धोका लक्षात घेता, जिल्ह्यातील पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी विभागाला सक्रिय राहण्याची गरज आहे. या काळात होणारे विविध कार्यक्रम आणि पर्यटनस्थळांवर वावरणारे पर्यटक यांच्यावर करडी नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार