शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

सागरी सुरक्षेचे वाजले बारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:47 IST

पोलीस स्थानकांवर कोट्यवधीचा खर्च : ड्युटी मात्र मोर्चे, आंदोलने अन् मंत्र्यांच्या सुुरक्षेची

- हितेन नाईक 

पालघर : २६/११ च्या हल्ल्यानंतर जिल्ह्यातील किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी आज पर्यंत कोट्यवधी रु पयांचा खर्च करून सागरी पोलीस ठाणी निर्माण करण्यात आली आहेत. त्यातील बहुतांशी पोलिसांना सागरी सुरक्षिततेकडे लक्ष पुरवू देण्याऐवजी मोर्चे, आंदोलने, मंत्र्यांचा बंदोबस्त आदी दुय्यम कामांना जुंपले जात आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेचे बारा वाजले आहेत. याचाच फायदा घेऊन काही संशयित जिल्ह्यात शिरकाव करू शकत असल्याचा गुप्तचरांनी दिलेला इशारा नवनियुक्त पोलीस अधिक्षकांसाठी आव्हान ठरू शकतो.

पाकिस्तानातील लष्कर-ए-तोईबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेइएम) आदी संघटनांचे दहशतवादी समुद्रीमार्गे येऊन भारतातील बंदरे, अणुप्रकल्प, औष्णिक ऊर्जा प्रकल्प आदी संवेदनशील ठिकाणी घातपात घडविण्याची शक्यता असल्याने केंद्रसरकारकडून सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत.अनेक दहशतवाद्यांना लाहोर, शेखपूरा, फैसलाबाद येथील कालवे येथे पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून समुद्रीमार्गे घुसखोरी करून एखाद्या जहाजावर कब्जा मिळवून भारताचा किनारा गाठण्याचे त्यांचे मनसुबे असल्याचे गुप्तचर यंत्रणेने कळविले आहे.

यामुळे किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू असल्याने गर्दीचा फायदा घेऊन घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई वरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर समुद्रातील सुरक्षा यंत्रणेचे पितळ उघडे पडले होते. या सुरक्षा यंत्रणेतील उणिवा दूर करण्यासाठी शासनाने हॉवरक्राफ्ट स्पीडबोटी खरेदी करून संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी सागरी पोलीस स्थानके उभारण्यात आली होती. किनारपट्टीसह समुद्रातील १२ नॉटिकल पर्यंतच्या क्षेत्राच्या सुरक्षिततेची परवानगी इतर विभागासह देण्यात आली होती. अधिक वृत्त/२नाचविले फक्त कागदी घोडेसध्या हे क्षेत्र कमी करण्यात आले असले तरी सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या देखरेखी खाली ८ उपनिरीक्षक, ७ सहाय्यक उपनिरीक्षक, १४ हवालदार, ४२ शिपाई, २ सारंग, २ इंजिन चालक, ४ खलाशी, असा ७९ पोलिसांचा स्टाफ मंजूर करून १ हेलीकॉप्टर, १ स्पीड बोट, अत्याधुनिक रायफल्स, सर्च लाईट, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आदी गोष्टीची पूर्तता करण्याचे आदेश काढण्यात आले होते.सद्यस्थितीत हे आदेश फक्त कागदोपत्रीच उरले असल्याचे दिसून येत असून अनेक पोलीस स्थानकांना आजही अपुऱ्या पोलीस व अधिकाºयांच्या तुटपुंज्या बळावर सुरक्षेचा गाडा हाकावा लागत आहे. याबाबत वारंवार आवाज उठवूनही गृहखाते त्याला दुर्लक्षितआहे.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्ग