शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय?
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
4
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
5
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
6
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
7
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
8
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
9
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
10
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
11
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
12
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
13
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
14
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
15
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
16
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
17
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
18
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
19
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
20
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अनेक गावांना उधाणाचा धोका

By admin | Updated: April 15, 2016 01:16 IST

एप्रिल पासून सुरू होणारे समुद्रातील उधाण, चार महिन्यात होणारा धुवाँधार पाऊस, त्यातच येणाऱ्या महाकाय भरतीमुळे डहाणूच्या किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या घरांना धोका निर्माण झाला

डहाणू : एप्रिल पासून सुरू होणारे समुद्रातील उधाण, चार महिन्यात होणारा धुवाँधार पाऊस, त्यातच येणाऱ्या महाकाय भरतीमुळे डहाणूच्या किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या घरांना धोका निर्माण झाला असून चिंचणी ते बोर्डीपर्यंतच्या किनाऱ्यावर संरक्षक बंधारा बांधण्याच्या मागणीकडे मेरीटाईम बोर्ड तसेच शासन दुर्लक्ष करीत असल्याने हजारो मच्छीमार बांधवांत संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात आपल्या घरांचे काय होईल या भीतीने गोरगरीब मच्छीमार, खलाशी धास्तावले आहेत.गेल्या आठ दिवसांपासून डहाणू समुद्रकिनाऱ्यालगतच्या मच्छीमार पाड्यांच्या वस्तीला समुद्राच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. डहाणूचा धूपप्रतिबंधक बंधारा फुटल्याने समुद्राच्या लाटांच्या मारा थेट वस्तीवर होत आहे. त्यामुळे धा. डहाणू, सोनापूर, मांगेळआळी, किर्तने बंगला, दुबळपाडा, सतीपाडा, पारनाका, आगर इ. ठिकाणच्या मच्छीमारांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांची धावपळ उडाली होती. गेल्या वर्षी हाय टाईड मुळे कल्पना महेश राठोड या विधवा निराधार महिलेचे घर उध्वस्त झाले होते. त्यावेळी तहसिलदार नगरपरिषद प्रशासनाने तेथे भेट देऊन त्यास सरकारी आर्थिक मदतीबाबतीत आश्वासने दिली होती. मात्र तिला अद्यापी काहीही मदत मिळालेली नाही. विशेष म्हणजे समुद्राच्या लाटांमुळे येथील धूप प्रतिबंधक बंधारे जमीनदोस्त झाले आहेत. तरीही येथे प्रशासनाने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने भरतीचे पाणी गावाची वेस ओलांडून रहिवाशांच्या घरात घुसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान गेल्या दोन, तीन वर्षापासून खवळलेल्या समुद्राच्या महाकाय लाटा किनाऱ्यावर आदळत असल्याने चिंचणीपासून थेट बोर्डीपर्यंतच्या किनाऱ्याची प्रचंड धूप होत असून किनारा पूर्णत: खचला आहे. (वार्ताहर) येत्या दोन, तीन वर्षात पावसाळ्यात अशीच धूप होत राहिली तर येथील मच्छीमारांची घरे, सुरूंची बने तसेच सौदर्य जमीनदोस्त होण्याची भीती पंचायत समितीचे सदस्य तसेच मच्छीमार नेते शिवदास अंभिरे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मर्दे यांनी व्यक्त केली. येथील किनाऱ्यावरील धूप रोखण्यासाठी प्रतिबंधक बंधारा बांधण्याची गरज असतानाही मेरीटाईम बोर्ड तसेच पर्यटन विकास महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मच्छीमार, नागरीक तसेच पर्यटकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. किनारपट्टीवरील भूमिपुत्रांचा बळी गेल्या शिवाय जागे व्हायचेच नाही असे सरकारने ठरवले आहे काय असा संतप्त सवाल भूमिपुत्र करीत आहेत.