शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अनेक गावांना उधाणाचा धोका

By admin | Updated: April 15, 2016 01:16 IST

एप्रिल पासून सुरू होणारे समुद्रातील उधाण, चार महिन्यात होणारा धुवाँधार पाऊस, त्यातच येणाऱ्या महाकाय भरतीमुळे डहाणूच्या किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या घरांना धोका निर्माण झाला

डहाणू : एप्रिल पासून सुरू होणारे समुद्रातील उधाण, चार महिन्यात होणारा धुवाँधार पाऊस, त्यातच येणाऱ्या महाकाय भरतीमुळे डहाणूच्या किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या घरांना धोका निर्माण झाला असून चिंचणी ते बोर्डीपर्यंतच्या किनाऱ्यावर संरक्षक बंधारा बांधण्याच्या मागणीकडे मेरीटाईम बोर्ड तसेच शासन दुर्लक्ष करीत असल्याने हजारो मच्छीमार बांधवांत संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात आपल्या घरांचे काय होईल या भीतीने गोरगरीब मच्छीमार, खलाशी धास्तावले आहेत.गेल्या आठ दिवसांपासून डहाणू समुद्रकिनाऱ्यालगतच्या मच्छीमार पाड्यांच्या वस्तीला समुद्राच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. डहाणूचा धूपप्रतिबंधक बंधारा फुटल्याने समुद्राच्या लाटांच्या मारा थेट वस्तीवर होत आहे. त्यामुळे धा. डहाणू, सोनापूर, मांगेळआळी, किर्तने बंगला, दुबळपाडा, सतीपाडा, पारनाका, आगर इ. ठिकाणच्या मच्छीमारांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांची धावपळ उडाली होती. गेल्या वर्षी हाय टाईड मुळे कल्पना महेश राठोड या विधवा निराधार महिलेचे घर उध्वस्त झाले होते. त्यावेळी तहसिलदार नगरपरिषद प्रशासनाने तेथे भेट देऊन त्यास सरकारी आर्थिक मदतीबाबतीत आश्वासने दिली होती. मात्र तिला अद्यापी काहीही मदत मिळालेली नाही. विशेष म्हणजे समुद्राच्या लाटांमुळे येथील धूप प्रतिबंधक बंधारे जमीनदोस्त झाले आहेत. तरीही येथे प्रशासनाने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने भरतीचे पाणी गावाची वेस ओलांडून रहिवाशांच्या घरात घुसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान गेल्या दोन, तीन वर्षापासून खवळलेल्या समुद्राच्या महाकाय लाटा किनाऱ्यावर आदळत असल्याने चिंचणीपासून थेट बोर्डीपर्यंतच्या किनाऱ्याची प्रचंड धूप होत असून किनारा पूर्णत: खचला आहे. (वार्ताहर) येत्या दोन, तीन वर्षात पावसाळ्यात अशीच धूप होत राहिली तर येथील मच्छीमारांची घरे, सुरूंची बने तसेच सौदर्य जमीनदोस्त होण्याची भीती पंचायत समितीचे सदस्य तसेच मच्छीमार नेते शिवदास अंभिरे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मर्दे यांनी व्यक्त केली. येथील किनाऱ्यावरील धूप रोखण्यासाठी प्रतिबंधक बंधारा बांधण्याची गरज असतानाही मेरीटाईम बोर्ड तसेच पर्यटन विकास महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मच्छीमार, नागरीक तसेच पर्यटकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. किनारपट्टीवरील भूमिपुत्रांचा बळी गेल्या शिवाय जागे व्हायचेच नाही असे सरकारने ठरवले आहे काय असा संतप्त सवाल भूमिपुत्र करीत आहेत.