शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड तालुक्यातील अनेक भागातील भातरोपे कुजली, शेतकऱ्यांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 00:15 IST

विक्रमगड तालुक्यात ९० टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे. मात्र, सतत पाऊस पडत असल्याने शेतात पाणी भरून रोपे पाण्यात बुडली आहेत.

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात ९० टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे. मात्र, सतत पाऊस पडत असल्याने शेतात पाणी भरून रोपे पाण्यात बुडली आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांची रोपे कुजली आहेत. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास भातशेतीला धोका निर्माण होऊन गेल्या काही वर्षांत जसे भातिपकाचे नुकसान झाले होते तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.विक्रमगड तालुक्यासह खुडेद, ओंदे, शील, झडपोली, केव, म्हसरोली, सजन आदी भागांतील शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह वाहून गेले आहेत. तर काहींच्या शेतात माती आल्याने भात पिके गाडली आहेत. अनेकांची भातशेती पाण्याखाली तसेच जास्त पावसामुळे लागवडीखालील भातरोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. नुकसान झालेल्या शेतकºयांच्या भात पिकाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.सततच्या पावसाने माझ्या शेतातील भात पीक कुजले आहे. जर पावसाचे प्रमाण असेच राहिले तर भातिपकाची नासाडी होईल. वारंवार शेतकरी संकटात येत असून निसर्गाच्या या लहरीपणामुळे दिवसेंदिवस भातशेती करणे जिकिरीचे होते आहे. पुढील काळात जर अशीच परिस्थिती राहील्यास भातशेतीचे क्षेत्र कमी होण्याची चिन्हे आहेत. आज पारंपारिक व या भागात भातशेती हेच मुख्य पिक असल्याने शेतकरी करीत आहे. परंतु खर्च करु न जर पदरात निराशा पडत असेल तर शेतकºयांनी करायचे काय? - गजानन देऊ जाधव (शेतकरी)

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर