शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

चंद्रपाडा-वाकीपाड्यात येण्यास मनाई आदेश

By admin | Updated: April 16, 2016 00:33 IST

वसई तालुक्यातील चंद्रपाडा व वाकीपाडा अतिसंवेदनशील गावे जाहीर करण्यात आली असून निवडणुकीच्या काळात राजकीय संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी

- शशी करपे,  वसईवसई तालुक्यातील चंद्रपाडा व वाकीपाडा अतिसंवेदनशील गावे जाहीर करण्यात आली असून निवडणुकीच्या काळात राजकीय संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदानाच्या तीन दिवस आधीपासून बाहेरील लोकांना गावात येण्यास मनाई आदेश जारी केला आहे. दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १७ एप्रिलला चंद्रपाडा आणि वाकीपाडा ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. दोन्ही गावे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. मागील निवडणुकीतील राजकीय संघर्ष लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी १६ ते १८ एप्रिल अशा तीन दिवसांसाठी स्थानिक लोकांव्यतिरिक्त बाहेरील गावांतील लोकांना गावांत मतदानाच्या कामासाठी येण्यास मनाई आदेश लागू केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुचंद्र व पंचक्राशीतील गावे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील राहिली आहेत. २००४ मध्ये जुचंद्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन राजकीय गटांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली होती. तर, २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारावरून शिवसेना व बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय हाणामारी झाली होती. या हाणीमारी प्रकरणात वालीव पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. बाहेरील मतदानसंघातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत येऊन स्थानिक रहिवासी व भाडेकरू यांना धमकावून जबरदस्तीने आपल्या पक्षास मतदान करण्याचा धाक दाखवण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असे मत आहे.येथील गावकऱ्यांची मते आणि राजकीय संघर्षाची शक्यता पालघर पोलीस अधीक्षकांनी पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या निदर्शनास आणून देऊन तीन दिवसांसाठी गावातील ग्रामस्थांव्यतिरिक्त बाहेरील लोकांना गावात मतदानाच्या कामासाठी येण्यास बंदी होण्यासाठी सीआरपीसी १४४ (१)(२)(३) प्रमाणे मनाई आदेश निर्गमित करावेत, असे कळवले होते. त्यानुसार, पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना प्राप्त असलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता १९७६ चे कलम १४४ (२) व (३) अन्वये अधिकाराचा वापर करून १६ ते १८ एप्रिल या तीन दिवसांसाठी चंद्रपाडा व वाकीपाडा गावांत स्थानिक ग्रामस्थांव्यतिरिक्त बाहेरील गावातील लोकांना मतदानाच्या कामासाठी येण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.