शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

चंद्रपाडा-वाकीपाड्यात येण्यास मनाई आदेश

By admin | Updated: April 16, 2016 00:33 IST

वसई तालुक्यातील चंद्रपाडा व वाकीपाडा अतिसंवेदनशील गावे जाहीर करण्यात आली असून निवडणुकीच्या काळात राजकीय संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी

- शशी करपे,  वसईवसई तालुक्यातील चंद्रपाडा व वाकीपाडा अतिसंवेदनशील गावे जाहीर करण्यात आली असून निवडणुकीच्या काळात राजकीय संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदानाच्या तीन दिवस आधीपासून बाहेरील लोकांना गावात येण्यास मनाई आदेश जारी केला आहे. दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १७ एप्रिलला चंद्रपाडा आणि वाकीपाडा ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. दोन्ही गावे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. मागील निवडणुकीतील राजकीय संघर्ष लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी १६ ते १८ एप्रिल अशा तीन दिवसांसाठी स्थानिक लोकांव्यतिरिक्त बाहेरील गावांतील लोकांना गावांत मतदानाच्या कामासाठी येण्यास मनाई आदेश लागू केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुचंद्र व पंचक्राशीतील गावे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील राहिली आहेत. २००४ मध्ये जुचंद्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन राजकीय गटांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली होती. तर, २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारावरून शिवसेना व बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय हाणामारी झाली होती. या हाणीमारी प्रकरणात वालीव पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. बाहेरील मतदानसंघातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत येऊन स्थानिक रहिवासी व भाडेकरू यांना धमकावून जबरदस्तीने आपल्या पक्षास मतदान करण्याचा धाक दाखवण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असे मत आहे.येथील गावकऱ्यांची मते आणि राजकीय संघर्षाची शक्यता पालघर पोलीस अधीक्षकांनी पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या निदर्शनास आणून देऊन तीन दिवसांसाठी गावातील ग्रामस्थांव्यतिरिक्त बाहेरील लोकांना गावात मतदानाच्या कामासाठी येण्यास बंदी होण्यासाठी सीआरपीसी १४४ (१)(२)(३) प्रमाणे मनाई आदेश निर्गमित करावेत, असे कळवले होते. त्यानुसार, पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना प्राप्त असलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता १९७६ चे कलम १४४ (२) व (३) अन्वये अधिकाराचा वापर करून १६ ते १८ एप्रिल या तीन दिवसांसाठी चंद्रपाडा व वाकीपाडा गावांत स्थानिक ग्रामस्थांव्यतिरिक्त बाहेरील गावातील लोकांना मतदानाच्या कामासाठी येण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.