शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

पालघरच्या जंगलातील वणवे मानवनिर्मित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:44 IST

पर्यावरणरक्षकांकडून कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : पालघर, ठाणे जिल्ह्यांतील डोंगराला एकाच आठवड्यात अनेक ठिकाणी लागलेले वणवे मानवाने लावले असल्याने या मागच्या षड् यंत्राचा शोध वनविभाग पोलिसांनी लावून वनपरिक्षेत्र आणि त्यावर सहवास करणाऱ्या जीवांना उद्ध्वस्त करणाऱ्याविरोधात कडक कारवाईची मागणी पर्यावरणरक्षकांकडून केली जात आहे. वनपरिक्षेत्रातील प्लॉट मोकळे व्हावे, कोळशाची उपलब्धता व्हावी, तसेच शिकार करता यावी, आदी अनेक कारणांसाठी जंगलात वणवे लावले जात असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याला २४ हजार हेक्टर क्षेत्राची वनसंपदा लाभली असून अनेक दुर्मीळ जातीचे, वनौषधीचे वृक्ष असून जवळ असलेल्या कोहोज किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नव्याने करण्यात आलेली वृक्षारोपणातील झाडे नुकत्याच लागलेल्या आगीत नष्ट झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मनोर, विक्रमगड, सफाळे तर ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी, पडघा, कुहे, चिंबीपाडा, दिघाशी, कांबा आदी भागांतील वनपरिक्षेत्रात वणवे लावण्याचे प्रकार एकापाठोपाठ घडत आहेत. हे वणवे मानवनिर्मित असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात असून या मागच्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी प्रो. भूषण भोईर यांनी केली आहे. 

पालघर, ठाणे जिल्ह्यांच्या अनेक वनक्षेत्रांत बिबटे, रानडुक्कर, मोर, ससे, माकडे आदी प्राणी-पक्ष्यांचा सहवास असून या आगीमुळे त्यांच्या अधिवासाची ठिकाणे नष्ट होणार आहेत. मागच्याच आठवड्यात ९ मार्चला पालघरजवळील चहाडे, लालठाणे येथील डोंगरावर वणवा लावण्यात आला होता. 

डोंगरावर अनेक भागांत लागलेल्या आगींवरून हा वणवा मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होत आहे. या आगीतून निर्माण होणारा कोळसा शहरात विकला जात आहे. यासंदर्भात वनविभाग गंभीर नसल्याचे निदर्शनास येत असून त्यांची गस्ती पथके याआगी लावण्याच्या प्रकारांना आळा घालण्यास अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघरfireआग