शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

पालघरच्या जंगलातील वणवे मानवनिर्मित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:44 IST

पर्यावरणरक्षकांकडून कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : पालघर, ठाणे जिल्ह्यांतील डोंगराला एकाच आठवड्यात अनेक ठिकाणी लागलेले वणवे मानवाने लावले असल्याने या मागच्या षड् यंत्राचा शोध वनविभाग पोलिसांनी लावून वनपरिक्षेत्र आणि त्यावर सहवास करणाऱ्या जीवांना उद्ध्वस्त करणाऱ्याविरोधात कडक कारवाईची मागणी पर्यावरणरक्षकांकडून केली जात आहे. वनपरिक्षेत्रातील प्लॉट मोकळे व्हावे, कोळशाची उपलब्धता व्हावी, तसेच शिकार करता यावी, आदी अनेक कारणांसाठी जंगलात वणवे लावले जात असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याला २४ हजार हेक्टर क्षेत्राची वनसंपदा लाभली असून अनेक दुर्मीळ जातीचे, वनौषधीचे वृक्ष असून जवळ असलेल्या कोहोज किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नव्याने करण्यात आलेली वृक्षारोपणातील झाडे नुकत्याच लागलेल्या आगीत नष्ट झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मनोर, विक्रमगड, सफाळे तर ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी, पडघा, कुहे, चिंबीपाडा, दिघाशी, कांबा आदी भागांतील वनपरिक्षेत्रात वणवे लावण्याचे प्रकार एकापाठोपाठ घडत आहेत. हे वणवे मानवनिर्मित असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात असून या मागच्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी प्रो. भूषण भोईर यांनी केली आहे. 

पालघर, ठाणे जिल्ह्यांच्या अनेक वनक्षेत्रांत बिबटे, रानडुक्कर, मोर, ससे, माकडे आदी प्राणी-पक्ष्यांचा सहवास असून या आगीमुळे त्यांच्या अधिवासाची ठिकाणे नष्ट होणार आहेत. मागच्याच आठवड्यात ९ मार्चला पालघरजवळील चहाडे, लालठाणे येथील डोंगरावर वणवा लावण्यात आला होता. 

डोंगरावर अनेक भागांत लागलेल्या आगींवरून हा वणवा मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होत आहे. या आगीतून निर्माण होणारा कोळसा शहरात विकला जात आहे. यासंदर्भात वनविभाग गंभीर नसल्याचे निदर्शनास येत असून त्यांची गस्ती पथके याआगी लावण्याच्या प्रकारांना आळा घालण्यास अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघरfireआग