शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

उमेदवार यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंड? अमित घोडा यांना वगळले तर श्रीनिवास वनगांना दिलेला शब्द सेनेने पाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 00:16 IST

विधानसभेच्या सहापैकी चार जागा शिवसेनेला सोडल्याचे उमेदवारांच्या यादीवरून स्पष्ट होताच झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत बंडाचे निशाण फडकावले आहे.

- हितेन नाईकपालघर : जिल्ह्यात भाजपचा एक खासदार आणि दोन आमदार असूनही आधी लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. तसेच आता विधानसभेच्या सहापैकी चार जागा शिवसेनेला सोडल्याचे उमेदवारांच्या यादीवरून स्पष्ट होताच झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवारांना बविआ किंवा आघाडीपेक्षा आपल्याच बंडखोरांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे आधी राम नाईक यांनी या भागाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर स्वतंत्र मतदारसंघ झाल्यावर १९९६ पासून पालघर लोकसभेवर चिंतामण वनगांच्या रूपाने भाजपचे वर्चस्व होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त जागेवरील पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपवर कुरघोडी करत वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी देत भाजपला अडचणीत आणले. प्रत्युत्तरादाखल मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमधून राजेंद्र गावितांना भाजपची उमेदवारी देत पालघरची जागा जिंकून दाखवली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांत प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही भाजपचे राजेंद्र गावित शिवसेनेच्या तिकीटावर मोठ्या मताधिक्याने निवडून आले.डहाणू विधानसभेतून पास्कल धनारे, विक्रमगडमधून विष्णू सवरा निवडून आले. पालघर विधानसभेतून निवडून आलेले अमित घोडा ही एकमेव जागा शिवसेनेकडे असतानाही भाजप श्रेष्ठींनी आधी लोकसभेची जागा शिवसेनेला दिली. तसेच जागावाटपात पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई या चार जागा शिवसेनेला सोडल्याने स्थानिक भाजप पदाधिकारी - कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. या संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी बोईसरमध्ये आलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदासाठी हा निर्णय घेत असल्याचे सांगितल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे केला. परंतु, स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी बुधवारी मनोर येथे तातडीची बैठक बोलावली असून प्रसंगी स्वबळावर तयारी चालविल्याचे कळते. डहाणू मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा आ. पास्कल धनारे यांना संधी दिली आहे. त्यांची लढत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद निकोले यांच्याशी होणार आहे. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआसह कष्टकरी संघटनेचा पाठिंबा मिळणार आहे. येथे मनसे, वंचित आघाडी आदी उमेदवार असले तरी खरी लढत भाजप आणि माकप आघाडीत होणार आहे.विक्रमगड विधानसभा निर्मितीपासून भाजप-शिवसेना एकमेकांविरूद्ध लढत होते. तेथे युतीचा वरचष्मा आहे. सध्या माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते निवडणूक लढविणार नसल्याने त्यांचा मुलगा डॉ. हेमंत सवरा यांच्यासह अनेक इच्छुक होते. भाजपने डॉ. सवरा यांना संधी दिली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांना उमेदवारी दिली असून महाआघाडीतून काँग्रेस, बविआ व माकप यांची साथ लाभल्याने येथे कडवी लढत रंगेल. जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, श्रमजीवी संघटना आणि २०१४ मधील सेनेचे उमेदवार व जि.प. सदस्य प्रकाश निकम आणि विष्णू सवरा यांच्यातून विस्तवही जात नसल्याने या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.पालघर विधानसभेतील विद्यमान आमदार अमित घोडा यांना संधी नाकारत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी श्रीनिवास वनगांना दिलेला शब्द पाळला आहे. त्यांना ए-बी फॉर्म दिले आहेत. मतदारसंघातील तोकडा जनसंपर्क, निष्क्रियतेचा अमित यांना बसल्याचे बोलले जाते. वाढवण बंदराबाबतची सेनेची अस्पष्ट भूमिका, डहाणू प्राधिकरण रद्द करण्याच्या हालचाली याबाबतची मतदारांची नाराजी शिवसेनेला भोवू शकते. येथे वंचित आघाडी, मनसेही निवडणूक लढवत असली, तरी मुख्य लढत सेना विरु द्ध बविआ अशीच रंगणार आहे.बहुजन विकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्षनालासोपारा हा बहुजन विकास आघाडीचा सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने बविआचे शिट्टी चिन्ह गोठवून त्यांना अडचणीत आणले होते. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी या मतदारसंघातून बविआच्या उमेदवारापेक्षा जास्त मते मिळावत बविआला धक्का दिला होता. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. तेथे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना संधी देण्यात आली आहे. मात्र हितेंद्र ठाकूर वसईऐवजी नालासोपाºयातून उतरण्याची तयारी करत आहेत.वसई मतदारसंघातून सोमवारी हितेंद्र ठाकूर, त्यांची पत्नी प्रविणा ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितीज ठाकूर या तिघांनीही अर्ज भरले. त्यातील दोघांचे अर्ज डमी असले, तरी अंतिम उमेदवार कोण हे सांगण्यास बविआचे नेते तयार नाहीत. वसईत काँग्रेस बविआला पाठिंबा देणार असल्याचे कळताच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगपती असलेल्या काँग्रेसचे विजय पाटील यांना शिवसेनेत प्रवेश देत त्यांची उमेदवारी घोषित केली.खिस्ती समाजाचे प्राबल्य असलेला येथील मतदार २९ गावे वगळण्याच्या प्रश्नावर नाराज असल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ‘नोटा’ला मतदान केले. विजय पाटील यांच्या पत्नी ख्रिश्चन समाजातील असल्यानेही त्यांना संधी दिली गेली. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून २९ गावे वगळण्याबाबत ठोस आश्वासने देत येथील मतदार शिवसेनेकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.भाजपची खेळी? : युतीत शिवसेनेने चार मतदारसंघ पदरात पाडून घेतले असले, तरी त्यातील तीन ठिकाणी त्यांना बविआशी झुंजावे लागेल आणइ एका मतदारसंघात बंडाळीचा सामना करावा लागेल, अशी सध्याची स्थिती आहे. भाजपने मात्र विक्रमगड, डहाणू हे आपले सुरक्षित मतदारसंघ शाबूत ठेवले आहेत. त्यामुळे जागावाटपात शिवसेनेला झुकते माप मिळाले असले, तरी सनेला झुंजवण्याची भाजपची खेळी तर नाही ना, अशी चर्चा शिवसेनेत सुरू आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019palgharपालघर