शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

Maharashtra Lockdown : वसईत संचारबंदीचे तीनतेरा, अन्यत्र चांगला प्रतिसाद; विरार, नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 23:36 IST

Maharashtra Lockdown: विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात तर प्रवाशांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनचा पहिलाच दिवस नागरिकांनी अक्षरश: धाब्यावर बसवल्याने लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले.

विरार/पारोळ : कोरोनाची साखळी तुटावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ३० एप्रिलपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, वसई - विरारमध्ये मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. पहिल्याच दिवशी लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले. अपुऱ्या बळामुळे पोलीस हैराण झाले असून, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात नसल्याने नागरिकांचा मुक्त संचार सुरू होता.विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात तर प्रवाशांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनचा पहिलाच दिवस नागरिकांनी अक्षरश: धाब्यावर बसवल्याने लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले. संचारबंदीत नागरिकांच्या वावरावर बंदी असताना नागरिक मात्र कशाचीही तमा न बाळगता बिनधोकपणे फिरत असल्याचे दिसून आले. शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे होते. मात्र, तसा पोलीस बंदोबस्तही कोठे दिसून आला नाही. अनेक पोलिसांनाच कोरोनाची लागण झाल्याने पोलीस बळाची वानवा दिसून आली. त्यामुळे सध्याच्या संचारबंदीत आणि वाढत्या गुन्ह्यांच्या आलेखावर नियंत्रण ठेवण्याची कसरत पोलिसांना करावी लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील हैराण झाले आहेत.संचारबंदीत वाणसामानाची अडचण होऊ नये म्हणून नागरिकांनी सकाळपासूनच  रेशन दुकानांत गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. रेशन दुकानांत रेशन घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची गर्दी पाहता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संचारबंदीच्या आदेशाची वसईत अक्षरश: पायमल्ली झाल्याचे दिसून आले. दरम्यान, वसईतील कोरोनाचा उद्रेक मोठा आहे. त्यामुळे शासनाने दिलेले आदेश शिरसावंद्य मानून नागरिकांनी कठीण काळात जबाबदारीने वागणे संयुक्तिक आहे. परंतु तशी वर्तणूक बहुसंख्य वसई-विरारकरांकडून होताना दिसली नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस