शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर न.प.ला लाखोंचा तोटा, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना । थकबाकीची रक्कम मिळत नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 00:02 IST

पालघर नगर परिषदेमध्ये राहणाºया नागरिकांना होणारा पाणीपुरवठा पालघर व २६ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सूर्यानदीतून केला जातो.

पालघर : पालघर नगर परिषदेकडून चालविण्यात येणाऱ्या २६ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील पाणी वापराची लाखो रुपयांची थकबाकी नगर परिषदेला मिळत नसल्याने दरवर्षी नगर परिषदेला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. बिल आकारणीसाठी पाइपलाइनवर मीटर्स लावण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मान्यता मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.पालघर नगर परिषदेमध्ये राहणाºया नागरिकांना होणारा पाणीपुरवठा पालघर व २६ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सूर्यानदीतून केला जातो. या योजनेत पालघर नगर परिषद हद्दीतील पालघर, गोठणपूर, वेवूर, घोलवीरा, नवली, लोकमान्य नगर, टेभोडे, अल्याळी अशा आठ गावांचा समावेश होतो. उर्वरित सातपाटी, शिरगाव, धनसार, उमरोळी, पंचाळी, दापोली, मोरेकुरण, खारेकुरण, नंडोरे, वाकोरे, पडघे, बिरवाडी, देवखोप, शेलवाली, अंबाडी, वागुळसार, हरणवाडी या गावांनाही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आले असून आॅक्टोबर २०११ रोजी ही योजना पालघर नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आली होती. तेव्हापासून या नळ पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण खर्च पालघर नगर परिषद करीत आली आहे.सध्या या योजनेतून १२ एमएलडी इतका पाणीपुरवठा होत असून त्यातील ६ एमएलडी पाणी नगर परिषद क्षेत्राला तर अन्य ६ एमएलडी पाणी उर्वरित गावांना वितरित केले जात आहे. या योजनेचे वीज बिल, पाण्याचे शुद्धीकरण, मेन्टेनन्स, वहन, कर्मचारी इत्यादी सर्व खर्च नगर परिषदेकडून केला जात आहे. ही योजना चालविण्यासाठी पालघर नगर परिषदेला अंदाजे ४० लाख ९४ हजार ६०६ रुपये इतका मासिक खर्च येत असून वार्षिक ४ कोटी ९१ लाख ३५ हजार २७२ रुपये इतका खर्च येतो, असे नगर परिषदेचे म्हणणे आहे.२७ गावे योजनेतील पाणी वापर करणाºया अन्य १९ ग्रामपंचायतींकडून वापरण्यात येणाºया पाण्याची बिले वसूल करण्याची जबाबदारी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाची आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून पंचायत समितीकडून पाणी वापरापोटी नगर परिषदेला ४० लाख ३ हजार ५३ रुपयांची थकबाकी येणे असल्याचे नगर परिषदेचे म्हणणे आहे. उर्वरित पाणी शुद्धीकरण, पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेण्याची रक्कम, मेंटेनन्स इत्यादी पोटीही लाखो रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. अनेक वेळा मागणी करूनही नगर परिषदेला आपली थकबाकी मिळत नसल्याने नगर परिषदेने खासदार राजेंद्र गावितांना गळ घातली होती. त्या अनुषंगाने पालघरच्या विश्रामगृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, गटनेते भावानंद संखे, कैलास म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र दुधे, मजिप्राचे अधीक्षक अभियंता अरुण निरभवणे, मुख्याधिकारी अरविंद माळी, पं.स.चे उपअभियंता आर. पाध्ये, एस. बी. शिरसीकर, विनोद पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.अखेर खा. राजेंद्र गावितांनी घेतली आढावा बैठकपालघर नगर परिषदेने प्रत्येक गावाच्या पाण्याच्या लाइनवर मीटर बसवून त्याप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीकडून बिल आकारावे, असा ठराव घेण्यात आला असून मजिप्राकडे तो तांत्रिक मंजुरीकरिता सादरही करण्यात आला असून त्याला मंजुरी मिळत नसल्याने नगर परिषदेला तोटा सहन करावा लागत असल्याची बाब खासदारांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तत्काळ या प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या. या वेळी थकबाकी व पाण्याच्या उचलपोटीची रक्कमही पंचायत समितीने नगर परिषदेकडे भरणा करावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा भविष्यात विस्तारला जाणार असल्याने पाण्याचा नियोजन आराखडा तयार केल्यास जादा पाणी मिळविण्यासाठी मी प्रयत्न करीन, असा शब्दही त्यांनी या वेळी दिला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघरWaterपाणी