शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

पालघर न.प.ला लाखोंचा तोटा, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना । थकबाकीची रक्कम मिळत नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 00:02 IST

पालघर नगर परिषदेमध्ये राहणाºया नागरिकांना होणारा पाणीपुरवठा पालघर व २६ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सूर्यानदीतून केला जातो.

पालघर : पालघर नगर परिषदेकडून चालविण्यात येणाऱ्या २६ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील पाणी वापराची लाखो रुपयांची थकबाकी नगर परिषदेला मिळत नसल्याने दरवर्षी नगर परिषदेला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. बिल आकारणीसाठी पाइपलाइनवर मीटर्स लावण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मान्यता मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.पालघर नगर परिषदेमध्ये राहणाºया नागरिकांना होणारा पाणीपुरवठा पालघर व २६ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सूर्यानदीतून केला जातो. या योजनेत पालघर नगर परिषद हद्दीतील पालघर, गोठणपूर, वेवूर, घोलवीरा, नवली, लोकमान्य नगर, टेभोडे, अल्याळी अशा आठ गावांचा समावेश होतो. उर्वरित सातपाटी, शिरगाव, धनसार, उमरोळी, पंचाळी, दापोली, मोरेकुरण, खारेकुरण, नंडोरे, वाकोरे, पडघे, बिरवाडी, देवखोप, शेलवाली, अंबाडी, वागुळसार, हरणवाडी या गावांनाही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आले असून आॅक्टोबर २०११ रोजी ही योजना पालघर नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आली होती. तेव्हापासून या नळ पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण खर्च पालघर नगर परिषद करीत आली आहे.सध्या या योजनेतून १२ एमएलडी इतका पाणीपुरवठा होत असून त्यातील ६ एमएलडी पाणी नगर परिषद क्षेत्राला तर अन्य ६ एमएलडी पाणी उर्वरित गावांना वितरित केले जात आहे. या योजनेचे वीज बिल, पाण्याचे शुद्धीकरण, मेन्टेनन्स, वहन, कर्मचारी इत्यादी सर्व खर्च नगर परिषदेकडून केला जात आहे. ही योजना चालविण्यासाठी पालघर नगर परिषदेला अंदाजे ४० लाख ९४ हजार ६०६ रुपये इतका मासिक खर्च येत असून वार्षिक ४ कोटी ९१ लाख ३५ हजार २७२ रुपये इतका खर्च येतो, असे नगर परिषदेचे म्हणणे आहे.२७ गावे योजनेतील पाणी वापर करणाºया अन्य १९ ग्रामपंचायतींकडून वापरण्यात येणाºया पाण्याची बिले वसूल करण्याची जबाबदारी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाची आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून पंचायत समितीकडून पाणी वापरापोटी नगर परिषदेला ४० लाख ३ हजार ५३ रुपयांची थकबाकी येणे असल्याचे नगर परिषदेचे म्हणणे आहे. उर्वरित पाणी शुद्धीकरण, पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेण्याची रक्कम, मेंटेनन्स इत्यादी पोटीही लाखो रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. अनेक वेळा मागणी करूनही नगर परिषदेला आपली थकबाकी मिळत नसल्याने नगर परिषदेने खासदार राजेंद्र गावितांना गळ घातली होती. त्या अनुषंगाने पालघरच्या विश्रामगृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, गटनेते भावानंद संखे, कैलास म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र दुधे, मजिप्राचे अधीक्षक अभियंता अरुण निरभवणे, मुख्याधिकारी अरविंद माळी, पं.स.चे उपअभियंता आर. पाध्ये, एस. बी. शिरसीकर, विनोद पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.अखेर खा. राजेंद्र गावितांनी घेतली आढावा बैठकपालघर नगर परिषदेने प्रत्येक गावाच्या पाण्याच्या लाइनवर मीटर बसवून त्याप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीकडून बिल आकारावे, असा ठराव घेण्यात आला असून मजिप्राकडे तो तांत्रिक मंजुरीकरिता सादरही करण्यात आला असून त्याला मंजुरी मिळत नसल्याने नगर परिषदेला तोटा सहन करावा लागत असल्याची बाब खासदारांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तत्काळ या प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या. या वेळी थकबाकी व पाण्याच्या उचलपोटीची रक्कमही पंचायत समितीने नगर परिषदेकडे भरणा करावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा भविष्यात विस्तारला जाणार असल्याने पाण्याचा नियोजन आराखडा तयार केल्यास जादा पाणी मिळविण्यासाठी मी प्रयत्न करीन, असा शब्दही त्यांनी या वेळी दिला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघरWaterपाणी