शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
2
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
3
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
4
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
5
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
6
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
7
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
8
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
9
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
10
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
11
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
12
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
13
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
14
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
15
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
16
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
17
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
18
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
19
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
20
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 23:59 IST

मीरा-भाईंदरमध्ये दुप्पट भाडेवसुली : दाेन प्रवाशांच्या बंधनाचे उल्लंघन

धीरज परब लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षात दाेन प्रवाशांनाच परवानगी आहे. जास्त प्रवासी बसवल्यास दाेन हजारांच्या दंडाची कारवाई पोलिसांकडून केली जाते. अनेक रिक्षाचालक कोरोना नियमानुसार दाेन प्रवासीच घेतात. मात्र, काही बेशिस्त रिक्षाचालक तीन किंवा चार ते पाच प्रवासी घेऊन त्यांच्याकडून जास्तीचे भाडे उकळत आहेत. शहरातील रिक्षा या सीएनजीवर सुरू आहेत. अजून तरी रिक्षाचालकांनी भाड्यात वाढ केलेली नाही. पण, नव्याने येणारे भाडेदर पत्रक पाहून निर्णय घेण्याचा पर्याय रिक्षाचालकांनी खुला ठेवला आहे. मीरा रोडमध्ये बहुतांश रिक्षा या मीटरप्रमाणे धावतात. काही प्रमाणात शेअर मार्गही चालतात. भाईंदरमध्ये रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात. प्रवाशांमध्येही याबाबत तेवढी जागरूकता नसली तरी रिक्षाचालकच मीटरप्रमाणे भाडे नाकारत असल्याने भांडण, वाद कोण करत बसणार, अशी व्यथाही प्रवासी मांडतात. मीरा रोडमध्ये मीटरप्रमाणे भाडे घेतले जात असल्याने प्रवाशांची लूट होत नाही. मीटरप्रमाणे भाडे नाकारून मनमानी भाडे सांगून असंख्य रिक्षाचालक प्रवाशांची लूट करत आहेत. प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस कधी तरी थोडीफार कारवाई करून हात वर करतात. भाईंदरमध्ये किमान भाडे मीटरप्रमाणे १८ रुपये होत असताना प्रवाशांना किमान ३० रुपये मोजावे लागतात. कोरोनामुळे केवळ दाेन प्रवाशांना परवानगी असल्यामुळे शेअर भाडे १० रुपयांवरून १५ रुपये केले आहे. दाेन प्रवासी बसवायचे म्हणून तिसऱ्या प्रवाशाचे भाडे दोन प्रवाशांकडून वसूल केले जात आहे. मात्र अनेक जण ३ ते ५ प्रवासी कोंबतात आणि भाडेही जास्त उकळतात. मुर्धाचे १५ चे २० रुपये तर मोर्वाचे २० चे २५ रुपये आणि उत्तनचे ३० रुपये भाडे असताना ५० रुपयांपर्यंत प्रति प्रवासी भाडे घेतले जाते. आता लाेकलमुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. लोकल व बसमध्ये गर्दी होत असताना रिक्षासाठी दाेनऐवजी तीन प्रवासी बसवण्याची परवानगी द्या, अशी मागणी रिक्षाचालक संघटना करत आहेत. मीटरप्रमाणे भाडे न घेणाऱ्या आणि जास्त शेअर भाडे व जास्त प्रवासी बसवणाऱ्यांविरोधात नगरसेवक, राजकारणीही ब्र काढायला तयार नाहीत. तर प्रवाशांच्या संघटनाही आवाज उठवणाऱ्या नाहीत. त्यातच आता रिक्षा भाडे वाढीने आणखी भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शहरातील रिक्षा सीएनजीवर सुरू असल्याने पेट्रोल-डिझेल दरवाढीचा रिक्षाचालकांना फटका बसलेला नाही. त्यामुळे सध्याच्या कोरोना काळात भाडेवाढ नकोच, असा सूर प्रवाशांचा आहे. 

लोकल व बसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. रिक्षात मात्र केवळ दाेन प्रवाशांची अट अजून कशाला? तीन प्रवासी घेण्याची परवानगी द्या. जेणेकरून प्रवाशांना पडणारा भुर्दंड थांबेल. त्यातच लोकल सुरू झाल्याने प्रवासी संख्या  वाढली आहे.    - रेमी डिसोझा, अध्यक्ष,     रिक्षा चालक-मालक असोसिएशन

भाईंदरमध्ये मीटर पद्धत सक्तीची करा तसेच मंजूर शेअर मार्गही सुरू ठेवा.मीटरप्रमाणे रिक्षाभाडे मंजूर असतानाही रिक्षाचालक सरळ नकार देतात. मनमानी भाडे उकळतात. त्यांच्यावर नियमित कारवाई केली जात नसल्याने त्यांचे फावले आहे. कोरोनाकाळात रिक्षा भाडेवाढ करायला नको.     - आदित्य कुटे, प्रवासी