शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
5
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
6
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
7
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
8
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
9
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
10
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
11
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
12
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
13
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
14
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
15
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
17
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
18
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
20
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 23:59 IST

मीरा-भाईंदरमध्ये दुप्पट भाडेवसुली : दाेन प्रवाशांच्या बंधनाचे उल्लंघन

धीरज परब लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षात दाेन प्रवाशांनाच परवानगी आहे. जास्त प्रवासी बसवल्यास दाेन हजारांच्या दंडाची कारवाई पोलिसांकडून केली जाते. अनेक रिक्षाचालक कोरोना नियमानुसार दाेन प्रवासीच घेतात. मात्र, काही बेशिस्त रिक्षाचालक तीन किंवा चार ते पाच प्रवासी घेऊन त्यांच्याकडून जास्तीचे भाडे उकळत आहेत. शहरातील रिक्षा या सीएनजीवर सुरू आहेत. अजून तरी रिक्षाचालकांनी भाड्यात वाढ केलेली नाही. पण, नव्याने येणारे भाडेदर पत्रक पाहून निर्णय घेण्याचा पर्याय रिक्षाचालकांनी खुला ठेवला आहे. मीरा रोडमध्ये बहुतांश रिक्षा या मीटरप्रमाणे धावतात. काही प्रमाणात शेअर मार्गही चालतात. भाईंदरमध्ये रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात. प्रवाशांमध्येही याबाबत तेवढी जागरूकता नसली तरी रिक्षाचालकच मीटरप्रमाणे भाडे नाकारत असल्याने भांडण, वाद कोण करत बसणार, अशी व्यथाही प्रवासी मांडतात. मीरा रोडमध्ये मीटरप्रमाणे भाडे घेतले जात असल्याने प्रवाशांची लूट होत नाही. मीटरप्रमाणे भाडे नाकारून मनमानी भाडे सांगून असंख्य रिक्षाचालक प्रवाशांची लूट करत आहेत. प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस कधी तरी थोडीफार कारवाई करून हात वर करतात. भाईंदरमध्ये किमान भाडे मीटरप्रमाणे १८ रुपये होत असताना प्रवाशांना किमान ३० रुपये मोजावे लागतात. कोरोनामुळे केवळ दाेन प्रवाशांना परवानगी असल्यामुळे शेअर भाडे १० रुपयांवरून १५ रुपये केले आहे. दाेन प्रवासी बसवायचे म्हणून तिसऱ्या प्रवाशाचे भाडे दोन प्रवाशांकडून वसूल केले जात आहे. मात्र अनेक जण ३ ते ५ प्रवासी कोंबतात आणि भाडेही जास्त उकळतात. मुर्धाचे १५ चे २० रुपये तर मोर्वाचे २० चे २५ रुपये आणि उत्तनचे ३० रुपये भाडे असताना ५० रुपयांपर्यंत प्रति प्रवासी भाडे घेतले जाते. आता लाेकलमुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. लोकल व बसमध्ये गर्दी होत असताना रिक्षासाठी दाेनऐवजी तीन प्रवासी बसवण्याची परवानगी द्या, अशी मागणी रिक्षाचालक संघटना करत आहेत. मीटरप्रमाणे भाडे न घेणाऱ्या आणि जास्त शेअर भाडे व जास्त प्रवासी बसवणाऱ्यांविरोधात नगरसेवक, राजकारणीही ब्र काढायला तयार नाहीत. तर प्रवाशांच्या संघटनाही आवाज उठवणाऱ्या नाहीत. त्यातच आता रिक्षा भाडे वाढीने आणखी भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शहरातील रिक्षा सीएनजीवर सुरू असल्याने पेट्रोल-डिझेल दरवाढीचा रिक्षाचालकांना फटका बसलेला नाही. त्यामुळे सध्याच्या कोरोना काळात भाडेवाढ नकोच, असा सूर प्रवाशांचा आहे. 

लोकल व बसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. रिक्षात मात्र केवळ दाेन प्रवाशांची अट अजून कशाला? तीन प्रवासी घेण्याची परवानगी द्या. जेणेकरून प्रवाशांना पडणारा भुर्दंड थांबेल. त्यातच लोकल सुरू झाल्याने प्रवासी संख्या  वाढली आहे.    - रेमी डिसोझा, अध्यक्ष,     रिक्षा चालक-मालक असोसिएशन

भाईंदरमध्ये मीटर पद्धत सक्तीची करा तसेच मंजूर शेअर मार्गही सुरू ठेवा.मीटरप्रमाणे रिक्षाभाडे मंजूर असतानाही रिक्षाचालक सरळ नकार देतात. मनमानी भाडे उकळतात. त्यांच्यावर नियमित कारवाई केली जात नसल्याने त्यांचे फावले आहे. कोरोनाकाळात रिक्षा भाडेवाढ करायला नको.     - आदित्य कुटे, प्रवासी