शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Lockdown News: परराज्यांतील मजुरांची रस्त्यांवरून पुन्हा पायपीट; गावी जाण्याची लागली ओढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 01:38 IST

केंद्र-राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरू नये, यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे.

मनोर : कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या कामगारांना त्यांच्यात्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी काही विशेष गाड्याही सोडण्यात आलेल्या आहेत, मात्र तरीही काही मजूर पुन्हा गावी जाण्यासाठी रस्त्यावरून पायपीट करताना दिसत आहेत.

पालघर जिल्ह्यातील मनोर परिसरात असे अनेक कामगार पायी निघाले असल्याचे दिसून आले. त्यांना विचारले असता, ‘ट्रेन का तिकीट मिलने के लिये और दो महिना लगेगा’, असे त्यांनी उत्तर दिले. पालघर-बोईसर येथील कंपन्यांमध्ये काम करणारे हे हजारो कामगार आपल्या गावी उत्तर प्रदेश, बिहार, झाडखंड येथे जाण्यासाठी ट्रेनची वाट न बघता हातात पाण्याची बाटली, पाठीवर बॅग घेऊन रस्त्यारस्त्यांवर पायपीट करताना दिसत आहेत.

सरकारने या मजुरांना त्यांच्यात्यांच्या गावी सोडण्यासाठी विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. पालघर जिल्ह्यामधूनच आतापर्यंत दोन विशेष गाड्या सोडल्या गेल्या आहेत. एक गाडी वसईवरून उत्तर प्रदेशसाठी तर दुसरी गाडी डहाणू येथून राजस्थानातील जयपूरसाठी सोडण्यात आली. उर्वरित मजुरांना त्यांच्यात्यांच्या गावी सोडण्यासाठीही व्यवस्था केली जात आहे, मात्र आधीच ४० दिवसांपेक्षा जास्त काळ लॉकडाउनमध्ये अडकलेल्या आणि हातावर पोट असलेल्या या मजुरांचा संयम संपत चालला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आपला नंबर येऊन तिकीट मिळण्यासाठी खूपच वेळ लागेल. म्हणून आम्ही पायी निघालो आहोत. कसेही करून आम्हाला घरी पोहोचायचे आहे. जेवण मिळाले नाही तरी चालेल, पण आम्हाला आमच्या मुलाबाळांना भेटायचे आहे. एवढी एकच ओढ आता आम्हाला आहे.कामगारांना गाडी मिळेपर्यंत धीर धरवेनाकेंद्र-राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरू नये, यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे. परराज्यांतील अनेक मजूर अस्वस्थ झाले असून त्यांना आता लवकरात लवकर गावी जाण्याची ओढ लागली आहे. सरकार जरी प्रयत्न करीत असले तरी आपला नंबर कधी येईल, याची त्यांना शाश्वती नाही. एवढे दिवस हातांना काम नसल्याने हातावर पोट असलेल्या या मजुरांच्या हाती पैसेही नाहीत. त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या घराच्या दिशेने पायपीट करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Migrationस्थलांतरणcorona virusकोरोना वायरस बातम्या