शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

वसई विरारमध्ये बत्ती गुल

By admin | Updated: July 15, 2015 23:45 IST

वसई-विरार परिसरात वीज वितरण व्यवस्थेचा खेळखंडोबा अद्याप थांबलेला नाही. मंगळवारी या दोन्ही परिसरात सुमारे २२ तास वीजपुरवठा खंडीत झाला होता.

वसई : वसई-विरार परिसरात वीज वितरण व्यवस्थेचा खेळखंडोबा अद्याप थांबलेला नाही. मंगळवारी या दोन्ही परिसरात सुमारे २२ तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. विरार पश्चिम भागात सकाळी गेलेली वीज सायंकाळी ७ वाजता आली तर पूर्व भागात रात्री १२ वाजता गेलेली वीज सकाळी ७ वाजता आली. वीज खंडीत होण्यामागची कारणे एकाही कार्यालयाकडून कळू शक ले नाहीत.गेला महिन्या भरा पासून वसई विरार भागात सतत वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरीक कंटाळले आहेत तर दुसरीकडे शासकीय कार्यालये, शाळा, हॉस्पिटल आदींवर परिणाम जाणवू लागला आहे. दोन आठवड्यापुर्वी सतत खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे बोळींज येथे गावकरी रस्त्यावर उतरले होते. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.या संदर्भात आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई उपविभागाचे अधिक्षक अभियंता सोनावणे यांच्याशी संपर्क साधून त्वरीत कार्यवाही करा अन्यथ: उद्रेक होण्याची शक्यता आहे असे कळवले होते. त्यानंतरही वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा झाली नाही. उलट वीज खंडीत होण्याच्या प्रकारामध्ये वाढ होत गेली. नालासोपारा येथे खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नगरसेवकांनी एकत्र येऊन अधिक्षक अभियंता कार्यालयावर हल्लाबोल केला होता. परंतु त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही.सहा दिवस मेट गाव अंधारातवाडा तालुक्यातील मेट येथे असलेल्या विद्युत राहित्रात बिघाड झाल्याने मेट या गावपाड्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. महावितरणला कळवून सुद्धा वीज न आल्याने गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीची पाणी योजना बंद असून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणी अशुद्ध असल्याने साथीचे आजार होण्याची भीती गावकरी व्यक्त करीत आहेत.