शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

गणेशोत्सवात दोन दिवस वीज गायब

By admin | Updated: September 23, 2015 03:54 IST

विक्रमगड महावितरणचा गलथान कारभार नेहमीचाच आहे. मात्र, सणासुदीच्या काळात तरी व्यवस्थित सेवा मिळावी अशी इच्छा असताना तालुक्यातील कुंर्झे गावठण

विक्रमगड : विक्रमगड महावितरणचा गलथान कारभार नेहमीचाच आहे. मात्र, सणासुदीच्या काळात तरी व्यवस्थित सेवा मिळावी अशी इच्छा असताना तालुक्यातील कुंर्झे गावठण आणि परिसरातील दहाहुन अधिक गावांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून विद्युत पुरवठा बंद झाला. त्यामुळे गणेशभक्तांसह नागरीकांमध्ये महावितरणविरोधात संतापाची लाट उसळली आहे.शुक्रवारी रात्री खंडीत झालेला वीजपुरवठा शनिवारी रात्री सुरू झाला. मात्र, जेमतेम तीन तास टिकून पुन्हा वीज खंडीत झाली ती सोमवारी सकाळी दहा वाजता सुरळीत झाली. मात्र अधुन मधून विजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरूच असल्याने याबाबत गणेशभक्तांनी विजवितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या कॉलला उत्तर देण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले. याबाबत विक्रमगड महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता नानोठ यांच्याशी संपर्क केला असता आमचे काम सुरू आहे, लाईट दोन किंवा तीन तासात येईल अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरवर्षी पावसाळ्याआधी ही कामे करणे गरजेचे असते. मात्र विक्रमगड तालुक्यात महावितरण ही कामे व्यवस्थित करीत नसल्याने नागरीकांना याचा त्रास होतो. महावितरणचा गलथान कारभार हा नेहमीचाच असल्याचे सर्व कामांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद ठाकरे यांनी सांगितले. (वार्ताहर)