शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:37 IST

जून महिन्याच्या तिसऱ्याच आठ्वड्यात सुरु झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजासह जिल्हावासिय सुखावले असले तरी सोमवार पासून पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ

पालघर : जून महिन्याच्या तिसऱ्याच आठ्वड्यात सुरु झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजासह जिल्हावासिय सुखावले असले तरी सोमवार पासून पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून रेल्वे, बस आदी सेवेवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असल्याने दररोज वेळेवर लोकल पकडणाºया चाकरमान्यांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लेटमार्क बसला.जिल्ह्यात सोमवार पर्यंत १४५.३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या दिवसात सर्वाधिक पाऊस तलासरी तालुक्यात झाला असून २१०.२ मिमी इतकी नोंद झाली आहे तर सर्वात कमी पावसाची नोंद मोखाडा तालुक्यात २७.६ मिमी इतकी झाली आहे. तलासरी खालोखाल डहाणू तालुक्यात १७४.७ मिमी, वसई तालुक्यात १७३ मिमी, विक्र मगड तालुक्यात १५२.५ मिमी, जव्हार तालुक्यात १३० मिमी, तर वाडा तालुक्यात १०१ मिमी पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. तीन दिवस सतत पडत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील धामणी, कवडास व वांद्री धरणाच्या पाणीसाठ्याच्या पातळीत वाढ होऊ लागली असून यातील कवडास धारण १०० टक्के भरलेले आहे. कवडास धरणाची पाणीसाठा क्षमता ९.९६ दलघमी इतका असून तो पूर्णपणे भरला आहे. धामणी धरणाच्या पाणीसाठ्याची एकूण क्षमता २७६.३५ दलघमी इतकी असून त्यापैकी ते १००.४४ दलघमीने भरले आहे.याची टक्केवारी सुमारे ३६ टक्के आहे. वांद्री धरणाचा एकूण पाणीसाठा क्षमता ३५.९४ दलघमी इतका आहे. त्यापैकी सोमवारपर्यंत म्हणजे अवघ्या तीन दिवसात हे धरण ६.८३ दलघमीने म्हणजे १८.९९ टक्क्याने भरले आहे.तलासरी : भागात रविवारी रात्री पासून पडणार्या संततधार पावसाने नदी नालेदुथडी भरून वाहू लागले तसेच रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद पडली आजच्या पावसाने जनजीवन च विस्कळीत झाले त्याचा फटका पदवीधर मतदारसंघाच्या मतदानावरही झाला. तलासरी उंबरगावं मार्गावरील झारीखडी नदी च्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने यामार्गावरीळ वाहतूक बंद पडली सोमवार तलासरी आढवडा बाजाराचा दिवस पण हा बाजारही पावसा मुले भरला नाही.कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात रविवार रात्री पासून जोरदार सुरु झालेला पाऊस सोमवारी दिवस भर सुरूच होता.पावसाचा जोर कमी न झाल्याने नदी नाल्याच्या मोठा पूर आला होता. कासा भागात रस्त्यावर ही पाणी साचले होते. त्यामुळे बाजारपेठे दिवस भर शुकशुकाट होता. तर सूर्या नदीला पूर आल्याने ग्रामीण भागात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.बोईसर : तारापूर सह परिसरातील गावांमध्ये शनिवारीपहाटेपासून सुरू झालेला पावसाची सततधार आजही कायम असून बोईसर मंडळक्षेत्रात तीन दिवसांमध्ये ५८२ मि. मी. पाऊस होऊन मुसळधार पावसाने शहरासह परिसराला अक्षरश: झोडपले असून विस्कटलेल्या जनजीवनाबरोबरच नागरिकांची पावसाने अक्षरश: त्रेधारितरपीट उडविली आहे.मनोर : गेल्या तीन दिवसा पासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने मनोर परिसरातील वैतरणा, देहरजा, सूर्या, हाथ, पिंजाळ या नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. तर शेताला तलावाचे स्वरूप आले होते. त्यातच मनोर पालघर रस्त्यावर वाघोबा खिंड येथे डोंगरावरून धोधो पाणी पडत असल्याने आगामी काळात पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. मुसळधार सुरुच असल्याने पेरणीचे काम थांबले आहे.पारोळ :मुंबई-अहमादाबाद महामार्गावरील पाणी सोमवार सकाळपासून वाढायला लागले होते. त्यामुळे मुंबई व गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्ण थांबून त्याठिकाणी तासंन तास मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी ओसरायला वाहनचालकांना मोठा विलंब लागला. वसई महामार्गावर गुडघाभर तर काही ठिकाणी कंबरे एवढे पाणी साचल्याने सोमवारी दिवसभर वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा झाला होता.विक्रमगड : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. पाऊस लांबला असला तरी काल पासुन पावसाने जोर पकडला आहे. या मुसळदार पावसा मुळे शेतकरी खुश असलातरी पेरण्या मात्र खोळंबल्या आहे. हा पासून उघड झाप करणारा पाऊस पाहिजे असे मत काही शेतकºयांचे आहे. या पावसामुळे शेत पुर्ण पाण्याखालील गेली आहे. त्यामुळे हा पाऊस लागवडीचा असल्याचे मत शेतकºयांना सांगितले. तालुक्यात हळवा, निमगरवा, व गरवा भात शेती केली जाते या. या पावसामुळे शेतीची कामे खोळबली.डहाणू : डहाणू तालुक्यात आज प्रचंड पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. रस्त्यावर पुर आल्याने सर्व प्रकारची वाहतूक बंद पडली त्याच बरोबर शाळा, महाविद्यालयाचे आणि कर्मचाºयाचे प्रचंड हाल झाले. गेल्या चोवीस तासात सोमवार सकाळी आठ वाजे पर्यंत डहाणूत ३२५ मि.मी. पावसाची नोंद झाली. वाणगाव देदाळे रस्त्यावर आणि वरोर डहाणूखाडी रस्त्यावर प्रचंड पाणी आल्याने संपूर्ण वाहतूक बंद झाली तसेच वरोर वाढवण च्या दोन्ही रस्त्यावर प्रचंड पुर आल्याने बस वाहतूक ही बंद ठेवण्यात आली आहे. भिलाड संजाण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रु ळावर भराव खचल्याने मुंबई कडे जाणाºया सर्व रेल्वे गाड्यांच्या फेºया बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर मुंबईहुन डहाणू पर्यंत येणाºया लोकल गाड्या उशीराने धावत होत्या.१२ गावांचासंपर्क तुटलासलग दुसºया दिवशी ही धुवाधार पडणाºया पावसाने तर कहर केला असून विरारमध्ये तब्बल १२ गावांचा संपर्क तुटला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ही येथील भाताने पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्यानं ही बिकट परिस्थिती उद्धभवली आहे. सोमवारी सकाळ पासूनच पावसाने उसंत न घेतल्याने या पुलाखालच्या पाण्याची पातळी वाढली आणि पुलावरून पाणी जाऊ लागले, त्यामुळे येथील पुलावरची दोन्ही बाजूंची वाहतूक पाण्याचा स्तर कमी होईपर्यंत रोखून धरली होती. त्यामुळे येथील गावांचा संपर्क तुटलेला होता.वसई : प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी रात्रीपासून धो धारा पडणाºया पावसाने मात्र वसई विरारचे मुख्य रस्ते पाण्याखाली गेला असून या दमदार हजेरीने जरी शेतकरी वर्ग सुखावला असला तरी या मुसळधारांची झळा सर्वसामान्य नागरिक , व्यापारी, विद्यार्थी आणि खास करून चाकरमान्यांना बसली आहे, दरम्यान वसईत नवघर, वसई गाव, एस टी डेपो समतानगर, साईनगर, ओमनगर, वसई फाटा, नवघर आद्योगिक वसाहत, गोखिवरे, सातिवली, वालिव तसेच महामार्ग, नालासोपारा येथील आचोळे, सेंट्रल पार्क, प्रगती रोड नगर, तुळींज नालासोपारा पूर्व पश्चिम भाग तर तिथे विरार पूर्व पश्चिम बोळींज खास करून पूर्व भागातील बहुतांशी गावांचा संपर्क तुटला आहे .तालुक्याला पावसाने झोडपले असून सखल भागात पाणी साचण्यासह रस्ते पाण्याखाली गेल्याने मुख्य रस्त्याशी अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जोराचा पाऊस व वाºयामुळे जांबूगावात घराची पडझड झाली, तर पारनाक्या जवळच्या वडाचे झाड उन्मळून पडले. तर बोर्डीच्या धुंडियापाड्यातील काही घरात पाणी शिरले मात्र सुदैवाने जीवितहानी झाल्याची घटना घडली नाही.शनिवार, रविवारी झालेल्या पावसापेक्षा सोमवारी झालेला पाऊस अधिक होता. सर्वात अधिक पाऊस चिंचणी (२५४.० मिमी) भागात झाला. कासा (२२४.० मिमी), सायवन (१५४.२ मिमी), डहाणू ू(१२५.५मिमी) आणि मल्याण (११७.९ मिमी) इतकी पावसाची नोंद झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली. पारनाका येथून डहाणू गावाकडे जाणाºया रस्त्यावर महाराष्ट्र बँकेनजिक वडाचे झाड मध्यरात्रीच्या सुमारास पडले. ते सकाळी हटविण्यात आले. तर बोर्डीलगतच्या जाम्बुगांव ग्रामपंचायती अंतर्गत सवू बादल वरठा यांचे विटांचे घर रविवारच्या रात्री आठच्या सुमारास कोसळून पडले.