शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: July 22, 2015 03:36 IST

तब्बल २९ दिवसाच्या दिर्घ विश्रांतीनंतर पडलेल्या मुसळधार पावसामुळे बोईसर तारापूरसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील जनजीवन

बोईसर : तब्बल २९ दिवसाच्या दिर्घ विश्रांतीनंतर पडलेल्या मुसळधार पावसामुळे बोईसर तारापूरसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील जनजीवन आज पूर्णपणे विस्कळीत झाले. गेल्या चोवीस तासात पालघरला ४७५ मि. मि. तर बोईसरला ३४६.५ मि. मि. पाऊस पडल्याने रेल्वे विस्कळीत होऊन प्रवाशांचे प्रचंड हाल झाले तर अनेक गावांचा संपर्क तुटून वाहतूकही ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती तर आर्थिक व्यवहारही ठप्प झाले होते. मुसळधार पाऊस पडल्याने बोईसरच्या अनेक भागांसह भिमनगर, सरावली, बेटेगाव, आलेवाडी, उमरोळी, तारापुर एमआयडीसी अशा अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. बेटेगावच्या पुलावरून दोन ते तीन फुट उंचीवरून पाणी प्रचंड वेगाने वाहत होते. सरावली गावातील विनायक घरत, हेमा राऊत, बिपीन राऊत, मोहन घरत यांच्या घरात पाणी शिरल्याचे तेथील तलाठ्यांनी सांगितले मात्र उर्वरीत गावातील तलाठ्याचा संपर्क न झाल्याने किती नुकसान झाले या संदर्भात माहिती मिळाली नाही. बोईसर-पालघर रस्त्यावरील सरावली व उमरोळी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प होती. बेटेगाव येथील शिदोबाचे मंदिर पाण्यात बुडाले होते. बोईसर ते राष्ट्रीय महामार्गावरील छोट्या वाहनांची वाहतूक बंद होती.वीज खंडीत, संपर्क तुटलाअनेक ठिकाणी झाडे कोसळली तर वीजेच्या तारा तुटून किनारपट्टी वरील मुरबे, आलेवाडी, नांदगाव, तारापुर, नवापुर येथील वीजप्रवाह खंडीत झाला होता. बोईसर येथील बँका, इन्शुरन्स कार्यालये व इतर शासकीय कार्यालयात मुंबई व इतर भागातुन येणारे कर्मचारी न आल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. शाळा कॉलेजही बंद ठेवण्यात आल्या होत्या. तारापुर एमआयडीसी तील काही रस्ते पाण्याने व्यापले होते. तर कारखान्यांतही अनुपस्थीती मुले उत्पादनावर परीणाम झाला होता. एकुणच सर्वत्रच पाणी पाणी झाले होते. मात्र दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने थोडा दिलासा मिळाला.लोकल विस्कळीतरात्री १.२२ पासून रेल्वे विस्कळीत झाली त्यामुळे विरार-डहाणू दरम्यान धावणाऱ्या बहुसंख्य लोकल तसेच लांबपल्ल्यांच्या गुजरात एक्स्प्रेस, सौराष्ट्र एक्स्प्रेस, अहमदाबाद पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या. लांब पल्ल्याच्या काही गाड्या धिम्या गतीने सुरू होत्या. त्यांना विरार-डहाणू दरम्यान थांबा दिल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळला. बोईसरलाही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले होते. फलाटावरील उपहारगृहातील सर्व वस्तू संपल्या होत्या.1पारोळ : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई पूर्व भागातील जनजीवन ठप्प झाले. उसगाव, भाताणे, शिरवली, आडणे, सायवन, मेढे, हे पूल पाण्याखाली गेल्यामुळे १७ गावांचा संपर्क तुटला, तसेच चांदीप, खानिवडे, कोपर, नवसई, जांबुलपाडा, या तानसा नदीच्या काठावर गावात अनेक घरांत पुराचे पाणी घुसल्यामुळे अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.2चांदीप गावामध्ये रेती काढणारे मजूर नदीत अडकल्याने त्यांना वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. तसेच शिरसाड अंबाडी मार्गावरील शिरवली व घाटेघर हा मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन शहराचा या भागाशी संपर्क तुटला. पुरामुळे शेतकऱ्यांची रोप वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या भागातील वाहतूक यंत्रणा कोलमडून पडल्याने याचा फटका कामगार, शालेय विद्यार्थी यांना बसला. सुरक्षेचा उपाय म्हणून या भागातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवण पंपींग स्टेशन परिसरात काल रात्रीपासून धुवाँधार पाऊस पडता आहे. त्यामुळे येथील नदीला पूर आला असून पंपींग स्टेशनच्या विहिरीत गाळ जमा झाला आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात वसई विरारचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी प्रमाणात होण्याची शक्यता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्राने व्यक्त केली आहे.सूर्या प्रकल्पाच्या मासवण पंपींग स्टेशन परिसरात सतत पाऊस कोसळत असल्यामुळे येथील नदीला पूर आला आहे. त्यामुळे कचरा व गाळ विहिरीत जमा झाल्यामुळे पाणी खेचणाऱ्या पंपाची क्षमता कमी झाली आहे.