शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
5
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
6
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
7
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
8
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
10
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
11
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
12
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
13
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
14
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
15
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
16
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
17
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
18
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
19
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
20
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट

जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: July 22, 2015 03:36 IST

तब्बल २९ दिवसाच्या दिर्घ विश्रांतीनंतर पडलेल्या मुसळधार पावसामुळे बोईसर तारापूरसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील जनजीवन

बोईसर : तब्बल २९ दिवसाच्या दिर्घ विश्रांतीनंतर पडलेल्या मुसळधार पावसामुळे बोईसर तारापूरसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील जनजीवन आज पूर्णपणे विस्कळीत झाले. गेल्या चोवीस तासात पालघरला ४७५ मि. मि. तर बोईसरला ३४६.५ मि. मि. पाऊस पडल्याने रेल्वे विस्कळीत होऊन प्रवाशांचे प्रचंड हाल झाले तर अनेक गावांचा संपर्क तुटून वाहतूकही ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती तर आर्थिक व्यवहारही ठप्प झाले होते. मुसळधार पाऊस पडल्याने बोईसरच्या अनेक भागांसह भिमनगर, सरावली, बेटेगाव, आलेवाडी, उमरोळी, तारापुर एमआयडीसी अशा अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. बेटेगावच्या पुलावरून दोन ते तीन फुट उंचीवरून पाणी प्रचंड वेगाने वाहत होते. सरावली गावातील विनायक घरत, हेमा राऊत, बिपीन राऊत, मोहन घरत यांच्या घरात पाणी शिरल्याचे तेथील तलाठ्यांनी सांगितले मात्र उर्वरीत गावातील तलाठ्याचा संपर्क न झाल्याने किती नुकसान झाले या संदर्भात माहिती मिळाली नाही. बोईसर-पालघर रस्त्यावरील सरावली व उमरोळी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प होती. बेटेगाव येथील शिदोबाचे मंदिर पाण्यात बुडाले होते. बोईसर ते राष्ट्रीय महामार्गावरील छोट्या वाहनांची वाहतूक बंद होती.वीज खंडीत, संपर्क तुटलाअनेक ठिकाणी झाडे कोसळली तर वीजेच्या तारा तुटून किनारपट्टी वरील मुरबे, आलेवाडी, नांदगाव, तारापुर, नवापुर येथील वीजप्रवाह खंडीत झाला होता. बोईसर येथील बँका, इन्शुरन्स कार्यालये व इतर शासकीय कार्यालयात मुंबई व इतर भागातुन येणारे कर्मचारी न आल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. शाळा कॉलेजही बंद ठेवण्यात आल्या होत्या. तारापुर एमआयडीसी तील काही रस्ते पाण्याने व्यापले होते. तर कारखान्यांतही अनुपस्थीती मुले उत्पादनावर परीणाम झाला होता. एकुणच सर्वत्रच पाणी पाणी झाले होते. मात्र दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने थोडा दिलासा मिळाला.लोकल विस्कळीतरात्री १.२२ पासून रेल्वे विस्कळीत झाली त्यामुळे विरार-डहाणू दरम्यान धावणाऱ्या बहुसंख्य लोकल तसेच लांबपल्ल्यांच्या गुजरात एक्स्प्रेस, सौराष्ट्र एक्स्प्रेस, अहमदाबाद पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या. लांब पल्ल्याच्या काही गाड्या धिम्या गतीने सुरू होत्या. त्यांना विरार-डहाणू दरम्यान थांबा दिल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळला. बोईसरलाही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले होते. फलाटावरील उपहारगृहातील सर्व वस्तू संपल्या होत्या.1पारोळ : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई पूर्व भागातील जनजीवन ठप्प झाले. उसगाव, भाताणे, शिरवली, आडणे, सायवन, मेढे, हे पूल पाण्याखाली गेल्यामुळे १७ गावांचा संपर्क तुटला, तसेच चांदीप, खानिवडे, कोपर, नवसई, जांबुलपाडा, या तानसा नदीच्या काठावर गावात अनेक घरांत पुराचे पाणी घुसल्यामुळे अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.2चांदीप गावामध्ये रेती काढणारे मजूर नदीत अडकल्याने त्यांना वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. तसेच शिरसाड अंबाडी मार्गावरील शिरवली व घाटेघर हा मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन शहराचा या भागाशी संपर्क तुटला. पुरामुळे शेतकऱ्यांची रोप वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या भागातील वाहतूक यंत्रणा कोलमडून पडल्याने याचा फटका कामगार, शालेय विद्यार्थी यांना बसला. सुरक्षेचा उपाय म्हणून या भागातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवण पंपींग स्टेशन परिसरात काल रात्रीपासून धुवाँधार पाऊस पडता आहे. त्यामुळे येथील नदीला पूर आला असून पंपींग स्टेशनच्या विहिरीत गाळ जमा झाला आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात वसई विरारचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी प्रमाणात होण्याची शक्यता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्राने व्यक्त केली आहे.सूर्या प्रकल्पाच्या मासवण पंपींग स्टेशन परिसरात सतत पाऊस कोसळत असल्यामुळे येथील नदीला पूर आला आहे. त्यामुळे कचरा व गाळ विहिरीत जमा झाल्यामुळे पाणी खेचणाऱ्या पंपाची क्षमता कमी झाली आहे.