शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

अर्नाळा समुद्रकिनाऱ्याकडे जीवरक्षक पथकाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:12 IST

पर्यटकांची वाढती संख्या पाहता गांभीर्य वाढले

विरार : येथील अर्नाळा समुद्र किनारी अनेक पर्यटक येत असतात त्यामुळे याठिकाणी जीवरक्षकांसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र, तेथे जीवरक्षक नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या समुद्र किनारी सर्वात जास्त पर्यटक असल्याने त्यांच्या सुरक्षतेची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. मात्र, जीव रक्षक उपलब्ध नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षततेची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे.अर्नाळा समुद्र किनाºयावरील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या सुरक्षेची जवाबदारी पोलिसांची व जीवरक्षकांची असते. जीवरक्षकांना पूर्ण समुद्र किनाºयावर व लांब पर्यंत नजर ठेवता येईल यासाठी स्टँड देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, बºयाच वेळा या स्टँडवर जीवरक्षकच नसतात. आपत्कालिन परिस्थितीत त्याला कोण जबाबदार असेल? समुद्रमध्ये रोज भरती व ओहटी असते. अशावेळी जीवरक्षकांचे त्यांच्या जागेवर असणे गरजेचे आहे. पर्यटक बाहेरून येत असल्याने त्यांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे ते मजा करण्यासाठी पाण्यात खोल पर्यंत जातात. एखादी लाट जोरात आली तर एखादा व्यक्ती जीव गमवू शकतो.बुडणाºयांना वाचवण्याकारिता हे जीवरक्षक नेमलेले आहेत. पण याठिकाणी गर्दीच्या वेळेस देखील कोणीही उपलब्ध नसतं. रविवार हा सर्वात जास्त गर्दीचा दिवस असतो त्यावेळी देखील जीवरक्षक याठिकाणी उपलब्ध नसल्याने त्यांना दिलेला स्टँड हा रिकामी असतो किंवा त्याठिकाणी इतर तरुण टवाळ्या करत बसलेले असतात. परिणामी समुद्रात एखादी घटना घडली तरी त्याकडे कोणाचं लक्ष नसते. नावापुर, भुईगाव याठिकाणी अजून जीवरक्षक नेमलेले नाही. पण ज्याठिकाणी नेमले आहेत त्या ठिकाणी कुणीही दिसत नाही.जीवरक्षक नेमलेले आहेत त्यांच्या स्टँड वर ते ड्युटी प्रमाणे असतात. समुद्र किनारी बळी जाण्याचा आणि जीवरक्षकाचा काही संबंध नाही अपघाताची दुसरी कारणे देखील असू शकतात त्यामुळे जीवरक्षकांना चुकीचे ठरवणे योग्य नाही.- विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार