शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

अर्नाळा समुद्रकिनाऱ्याकडे जीवरक्षक पथकाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:12 IST

पर्यटकांची वाढती संख्या पाहता गांभीर्य वाढले

विरार : येथील अर्नाळा समुद्र किनारी अनेक पर्यटक येत असतात त्यामुळे याठिकाणी जीवरक्षकांसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र, तेथे जीवरक्षक नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या समुद्र किनारी सर्वात जास्त पर्यटक असल्याने त्यांच्या सुरक्षतेची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. मात्र, जीव रक्षक उपलब्ध नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षततेची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे.अर्नाळा समुद्र किनाºयावरील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या सुरक्षेची जवाबदारी पोलिसांची व जीवरक्षकांची असते. जीवरक्षकांना पूर्ण समुद्र किनाºयावर व लांब पर्यंत नजर ठेवता येईल यासाठी स्टँड देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, बºयाच वेळा या स्टँडवर जीवरक्षकच नसतात. आपत्कालिन परिस्थितीत त्याला कोण जबाबदार असेल? समुद्रमध्ये रोज भरती व ओहटी असते. अशावेळी जीवरक्षकांचे त्यांच्या जागेवर असणे गरजेचे आहे. पर्यटक बाहेरून येत असल्याने त्यांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे ते मजा करण्यासाठी पाण्यात खोल पर्यंत जातात. एखादी लाट जोरात आली तर एखादा व्यक्ती जीव गमवू शकतो.बुडणाºयांना वाचवण्याकारिता हे जीवरक्षक नेमलेले आहेत. पण याठिकाणी गर्दीच्या वेळेस देखील कोणीही उपलब्ध नसतं. रविवार हा सर्वात जास्त गर्दीचा दिवस असतो त्यावेळी देखील जीवरक्षक याठिकाणी उपलब्ध नसल्याने त्यांना दिलेला स्टँड हा रिकामी असतो किंवा त्याठिकाणी इतर तरुण टवाळ्या करत बसलेले असतात. परिणामी समुद्रात एखादी घटना घडली तरी त्याकडे कोणाचं लक्ष नसते. नावापुर, भुईगाव याठिकाणी अजून जीवरक्षक नेमलेले नाही. पण ज्याठिकाणी नेमले आहेत त्या ठिकाणी कुणीही दिसत नाही.जीवरक्षक नेमलेले आहेत त्यांच्या स्टँड वर ते ड्युटी प्रमाणे असतात. समुद्र किनारी बळी जाण्याचा आणि जीवरक्षकाचा काही संबंध नाही अपघाताची दुसरी कारणे देखील असू शकतात त्यामुळे जीवरक्षकांना चुकीचे ठरवणे योग्य नाही.- विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार