शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘आयुषमान भारत’चा शुभारंभ, पाच लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 03:43 IST

आयुषमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

पालघर  - आयुषमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी झालेल्या या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात लता चंदरकर, सुनंदा फर्नांडीस, सुरेखा पामाळे, अशोक जाधव, जीवन गायकवाड या पाच लाभार्थ्यांना ई कार्डांचे वाटप करण्यात आले.यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कांचन वानेरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र केळकर, डॉ.दिनकर गावित आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.देशभरात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आज एकाच वेळी शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड मधील रांची येथे मुख्य कार्यक्र म आयोजित करण्यात आला. या कार्यक्र माचे थेट प्रक्षेपण पालघर येथील कार्यक्र मात दाखिवण्यात आले.निशुल्क असणाऱ्या या योजनेनुसार लाभार्थी कुटुंबाना प्रति वर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी ५ लाख रुपये विमा संरक्षण राहणार आहे. या योजनेअंतर्गत त्या कुटुंबांना ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील.यासाठी लाभार्थी कुटुंबाना ई-कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी जी रु ग्णालये संलग्न करण्यात येतील त्या रु ग्णालयातील आरोग्य मित्र हे ई-कार्ड देतील. सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यातील उपजिल्हा रु ग्णालय जव्हार आणि डहाणू या योजनेमध्ये समाविष्ट असतील.डहाणू व जव्हारमधून होणार सुरूवातया योजनेच्या पालघर जिल्ह्यातील उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री सवरा म्हणाले, आयुषमान भारत ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून याचा आरोग्यदायी लाभ ग्रामीण भागातील २ लाख ७६ हजार तर शहरी भागातील ४३ हजार ३८ कुटुंबांना होणार आहे. एकूण १ हजार १२२ आजारांचा समावेश आहे.या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचिवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी.ही योजना प्राथमिक स्तरावर सध्या डहाणू आणि जव्हार मध्ये राबविण्यात येणार असली तरी त्याचा लाभ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे सांगितले. आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही योजना सर्वांपर्यंत पोहोचिवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतVasai Virarवसई विरार