शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

‘लेटलतीफ’ शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 10:41 IST

School : जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्के शिक्षक तालुक्याला निवासी न राहता नाशिक, त्र्यंबकेश्वर येथून ये-जा करतात. यामुळे लेटलतिफ कारभाराचा गाडा नेहमीचाच झाल्याची ओरड पालक वर्गातून केली जात आहे.

खोडाळा : ग्रामीण भागातील प्रत्येक गावपाड्यांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी शासन स्तरावर सर्वच मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत, मोफत शिक्षण, मोफत गणवेश, वह्या-पुस्तके, पोषण आहार इत्यादी उपक्रम राबविले जातात; मात्र मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जेथे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, तेथे प्राथमिक शिक्षकांच्या लेटलतिफ कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. 

बिवलपाडा, दापटी, धामोडी, करोळी, आसे, ब्राह्मणपाडा, कुडवा, धामणी आदी परिसर मोखाडा तालुक्यापासून २० कि.मी. अंतरावर असल्याने या परिसरातील जिल्हा परिषद शाळा सुरू होण्याच्या वेळेच्या १५ ते २० मिनिटे उशिरा येत असून पंधरा मिनिटे लवकर सुट्टी दिली जात असल्याचा आरोप होत आहे. तालुकाभरात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या १५८ प्राथमिक शाळा असून मोखाडा शहर व खोडाळा बाजारपेठ जवळपासच्या शाळा शालेय वेळेत सुरू होऊन शाळेच्या वेळेत सुट्टी होते, परंतु तालुक्यापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावरील शाळा पंधरा मिनिटे उशिरा तर सुट्टी पंधरा मिनिटे लवकर होते.

त्यात भर म्हणून आठवड्यातून दोन ते तीन वेळा तालुक्याला मिटिंगा किंवा शालेय माहिती देण्यासाठी यावे लागत असल्याचा ससेमिरा नेहमी शिक्षकांकडून पुढे केला जातो. त्यामुळे शासनाकडून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांनी राज्याचे अथवा देशाचे भवितव्य शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याऐवजी आपली कामाची उपस्थिती भरण्यासाठी तर खटाटोप नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्के शिक्षक तालुक्याला निवासी न राहता नाशिक, त्र्यंबकेश्वर येथून ये-जा करतात. यामुळे लेटलतिफ कारभाराचा गाडा नेहमीचाच झाल्याची ओरड पालक वर्गातून केली जात आहे.

पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर नाही ना?पालघर जिल्ह्यात मुळात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शाळा साडेदहा वाजता सुरू होतात. पाच वाजता शाळांना सुट्टी होत असते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेतील अर्धा तास वाया जात असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य शिक्षकांच्या लेटलतिफ कामामुळे धोक्यात आले आहे. असे असतानाही पंचायत समितीचा शिक्षण विभाग या शिक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :palgharपालघर