शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

शेवटच्या टप्प्यात तापले राजकीय वातावरण, अनेक दिग्गजांची जिल्ह्यात हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 01:11 IST

पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये ऐन कडाक्याच्या थंडीतही राजकीय वातावरण चांगलेच तापले.

पंकज राऊतबोईसर : पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये ऐन कडाक्याच्या थंडीतही राजकीय वातावरण चांगलेच तापले. सर्वच राजकीय पक्ष व आघाड्यांनी पालघर जिल्हा परिषदेवर तसेच पंचायत समित्यांवर आपली सत्ता आणण्यासाठी कंबर कसली असून माजी मुख्यमंत्र्यांसह विद्यमान दोन मंत्री व विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनीही जिल्ह्यात प्रचारसभा घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला. रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभा, धावत्या बैठका, गाठीभेटींबरोबरच वाहनांवर लाउडस्पीकर लावून कर्कश आवाजात दिवसभर प्रचार सुरू होता.निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या क्षणापर्यंत जोरात सुरू होती. प्रत्येक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या उमेदवाराला मते मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. काही गण व गटात अपक्ष उमेदवारांनी चिंता वाढवली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पक्षाचे अधिकृत उमेदवार अडचणीत येण्याची आहे.दरम्यान, पालघर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १७ तर पंचायत समितीच्या ३४ जागांवर निवडणूक होणार आहे. २०१५ साली पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ७, बहुजन विकास आघाडी ५, भाजप ३ तर अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक जागांवर विजय मिळवला होता.पालघर तालुक्याच्या पंचायत समितीवर शिवसेनेने सलग भगवा फडकावून पालघर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे दाखवून दिले होते. २०१५ च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने १९, बहुजन विकास आघाडीने १० भाजप ४ व अपक्ष एक असे एकूण पक्षीय बलाबल होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला पालघर पंचायत समितीची एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे ही निवडणूक सर्व पक्षांनी प्रतिष्ठेचीकेली आहे.>सर्वच पक्षांची अस्तित्वाची लढाईजिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामीण भागातील विकासाचे द्वार समजले जाते. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात शिवसेना-भाजप स्वतंत्र लढत असल्यामुळे दोन्ही पक्षांचे जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात किती राजकीय ताकद आहे हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे, तर सर्वच पक्षांची अस्तित्वाची ही लढाई असणार आहे.