शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

पालघरमधील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 00:59 IST

पीक विमा योजना : तक्रार ७२ तासांत करण्याची सुविधा उपलब्ध

बोर्डी : पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यांचे पावसामुळे नुकसान झाले असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. याकरिता पीडित शेतकºयाला ७२ तासांच्या कालावधीत नुकसानग्रस्त क्षेत्र आणि विमा भरल्याचा पुरावा मेल करायचा आहे.

कृषी विभागामार्फत शेतकºयांना याबाबत माहिती दिली जात आहे. जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील २८ मंडळांत ३० हजार ३११ शेतकºयांनी १४७६९.८५ हेक्टर क्षेत्रावर ६४ कोटी ५३ लाख ४१ हजार ६८१ रकमेचा भात, तूर आणि नागली पिकाकरिता पीक विमा काढला असून त्यामध्ये सर्वात अधिक भात पिकाचे क्षेत्र आहे. शेतकºयांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत. हवामान विभागाने उत्तर कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचे पूर्वानुमान दिल्यानुसार ३ आॅगस्टपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही भागात नदी, ओहळ आणि नाले या लगतच्या भात खाचरातील पिकांचे नुकसान झाले आहे. भात पीक विमा योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकºयांचे नुकसान झाले असल्यास त्यांनी ७२ तासांच्या आत टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन शासनाने केले आहे. याकरिता शेतकºयांचे पूर्ण नाव, पिकाचे नाव, शेत जमिनीचा सर्व्हे नंबर, पीक विमा अर्ज क्रमांक किंवा विमा भरल्याचा पुरावा आदी कागदपत्रे जोडून स्रोु८.ेंँं१ं२ँ३१ं@ ँािूी१ॅङ्म.ूङ्मे या ई-मेलवर पाठविण्यास सांगितले आहे.जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील २८ मंडळात शेतकºयांनी ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत भात, तूर आणि नागली या पिकांकरिता ३० हजार ३११ शेतकºयांनी १४७६९.८५ हेक्टर क्षेत्रावर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. तर सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते. डहाणू तालुक्यातील चिंचणी, डहाणू, कासा, मल्याण, सायवन येथील ५ हजार ४५० शेतकºयांनी विम्याचे कवच घेतले आहे. त्यामध्ये १०३२ कर्ज घेतलेले आणि ४,४१८ बिगरकर्जदार शेतकरी आहेत. त्यापैकी १९८८ शेतकºयांनी बँकेत तसेच ३,४६२ सरल सेवा केंद्रातून अर्ज भरले असून २६३४.५७ हेक्टरकरिता एकूण ११ कोटी ९७ लाख ७१ हजार ३४९ एवढी विमा रक्कम आहे. जव्हार तालुक्यातील ९७४ शेतकºयांकडून ३७६.७३ हेक्टरवर १ कोटी १२ लाख १ हजार २७५ रकमेची विमा रक्कम आहे. मोखाडा तालुक्यातील ८२१ शेतकºयांनी ४४९.८४ हेक्टरवरील ९६ लाख ९६ हजार २६७ विमा रक्कम आहे. तर पालघर तालुक्यातील ५ हजार ५६३ शेतकºयांनी २३६२.६० हेक्टरकरिता १० कोटी ७४ लाख ९८ हजार ७९ विमा रक्कम आहे. तलासरी तालुक्यातील २ हजार ८४७ शेतकºयांनी ४ कोटी ९२ लाख ६९ हजार ८४८ विमा रक्कम आहे. वाडा तालुक्यातील चार मंडळांतल्या ९ हजार ७२२ शेतकºयांनी ५१६१.५० हेक्टर क्षेत्रावर २३ कोटी ४३ लाख ८ हजार ७७८ रक्कम आहे. वसईतल्या ३६६ शेतकºयांनी ९४ लाख ६० हजार ८७ रकमेचा विमा उतरवला आहे. तर विक्रमगड तालुक्यातील ४ हजार ५६८ शेतकºयांनी १० कोटी ४१ लाख ३५ हजार ९९८ रकमेचा विमा उतरविण्यात आला आहे. 

टॅग्स :palgharपालघरFarmerशेतकरी