शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

पालघरमधील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 00:59 IST

पीक विमा योजना : तक्रार ७२ तासांत करण्याची सुविधा उपलब्ध

बोर्डी : पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यांचे पावसामुळे नुकसान झाले असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. याकरिता पीडित शेतकºयाला ७२ तासांच्या कालावधीत नुकसानग्रस्त क्षेत्र आणि विमा भरल्याचा पुरावा मेल करायचा आहे.

कृषी विभागामार्फत शेतकºयांना याबाबत माहिती दिली जात आहे. जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील २८ मंडळांत ३० हजार ३११ शेतकºयांनी १४७६९.८५ हेक्टर क्षेत्रावर ६४ कोटी ५३ लाख ४१ हजार ६८१ रकमेचा भात, तूर आणि नागली पिकाकरिता पीक विमा काढला असून त्यामध्ये सर्वात अधिक भात पिकाचे क्षेत्र आहे. शेतकºयांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत. हवामान विभागाने उत्तर कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचे पूर्वानुमान दिल्यानुसार ३ आॅगस्टपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही भागात नदी, ओहळ आणि नाले या लगतच्या भात खाचरातील पिकांचे नुकसान झाले आहे. भात पीक विमा योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकºयांचे नुकसान झाले असल्यास त्यांनी ७२ तासांच्या आत टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन शासनाने केले आहे. याकरिता शेतकºयांचे पूर्ण नाव, पिकाचे नाव, शेत जमिनीचा सर्व्हे नंबर, पीक विमा अर्ज क्रमांक किंवा विमा भरल्याचा पुरावा आदी कागदपत्रे जोडून स्रोु८.ेंँं१ं२ँ३१ं@ ँािूी१ॅङ्म.ूङ्मे या ई-मेलवर पाठविण्यास सांगितले आहे.जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील २८ मंडळात शेतकºयांनी ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत भात, तूर आणि नागली या पिकांकरिता ३० हजार ३११ शेतकºयांनी १४७६९.८५ हेक्टर क्षेत्रावर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. तर सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते. डहाणू तालुक्यातील चिंचणी, डहाणू, कासा, मल्याण, सायवन येथील ५ हजार ४५० शेतकºयांनी विम्याचे कवच घेतले आहे. त्यामध्ये १०३२ कर्ज घेतलेले आणि ४,४१८ बिगरकर्जदार शेतकरी आहेत. त्यापैकी १९८८ शेतकºयांनी बँकेत तसेच ३,४६२ सरल सेवा केंद्रातून अर्ज भरले असून २६३४.५७ हेक्टरकरिता एकूण ११ कोटी ९७ लाख ७१ हजार ३४९ एवढी विमा रक्कम आहे. जव्हार तालुक्यातील ९७४ शेतकºयांकडून ३७६.७३ हेक्टरवर १ कोटी १२ लाख १ हजार २७५ रकमेची विमा रक्कम आहे. मोखाडा तालुक्यातील ८२१ शेतकºयांनी ४४९.८४ हेक्टरवरील ९६ लाख ९६ हजार २६७ विमा रक्कम आहे. तर पालघर तालुक्यातील ५ हजार ५६३ शेतकºयांनी २३६२.६० हेक्टरकरिता १० कोटी ७४ लाख ९८ हजार ७९ विमा रक्कम आहे. तलासरी तालुक्यातील २ हजार ८४७ शेतकºयांनी ४ कोटी ९२ लाख ६९ हजार ८४८ विमा रक्कम आहे. वाडा तालुक्यातील चार मंडळांतल्या ९ हजार ७२२ शेतकºयांनी ५१६१.५० हेक्टर क्षेत्रावर २३ कोटी ४३ लाख ८ हजार ७७८ रक्कम आहे. वसईतल्या ३६६ शेतकºयांनी ९४ लाख ६० हजार ८७ रकमेचा विमा उतरवला आहे. तर विक्रमगड तालुक्यातील ४ हजार ५६८ शेतकºयांनी १० कोटी ४१ लाख ३५ हजार ९९८ रकमेचा विमा उतरविण्यात आला आहे. 

टॅग्स :palgharपालघरFarmerशेतकरी