शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पालघरमधील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 00:59 IST

पीक विमा योजना : तक्रार ७२ तासांत करण्याची सुविधा उपलब्ध

बोर्डी : पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यांचे पावसामुळे नुकसान झाले असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. याकरिता पीडित शेतकºयाला ७२ तासांच्या कालावधीत नुकसानग्रस्त क्षेत्र आणि विमा भरल्याचा पुरावा मेल करायचा आहे.

कृषी विभागामार्फत शेतकºयांना याबाबत माहिती दिली जात आहे. जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील २८ मंडळांत ३० हजार ३११ शेतकºयांनी १४७६९.८५ हेक्टर क्षेत्रावर ६४ कोटी ५३ लाख ४१ हजार ६८१ रकमेचा भात, तूर आणि नागली पिकाकरिता पीक विमा काढला असून त्यामध्ये सर्वात अधिक भात पिकाचे क्षेत्र आहे. शेतकºयांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत. हवामान विभागाने उत्तर कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचे पूर्वानुमान दिल्यानुसार ३ आॅगस्टपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही भागात नदी, ओहळ आणि नाले या लगतच्या भात खाचरातील पिकांचे नुकसान झाले आहे. भात पीक विमा योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकºयांचे नुकसान झाले असल्यास त्यांनी ७२ तासांच्या आत टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन शासनाने केले आहे. याकरिता शेतकºयांचे पूर्ण नाव, पिकाचे नाव, शेत जमिनीचा सर्व्हे नंबर, पीक विमा अर्ज क्रमांक किंवा विमा भरल्याचा पुरावा आदी कागदपत्रे जोडून स्रोु८.ेंँं१ं२ँ३१ं@ ँािूी१ॅङ्म.ूङ्मे या ई-मेलवर पाठविण्यास सांगितले आहे.जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील २८ मंडळात शेतकºयांनी ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत भात, तूर आणि नागली या पिकांकरिता ३० हजार ३११ शेतकºयांनी १४७६९.८५ हेक्टर क्षेत्रावर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. तर सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते. डहाणू तालुक्यातील चिंचणी, डहाणू, कासा, मल्याण, सायवन येथील ५ हजार ४५० शेतकºयांनी विम्याचे कवच घेतले आहे. त्यामध्ये १०३२ कर्ज घेतलेले आणि ४,४१८ बिगरकर्जदार शेतकरी आहेत. त्यापैकी १९८८ शेतकºयांनी बँकेत तसेच ३,४६२ सरल सेवा केंद्रातून अर्ज भरले असून २६३४.५७ हेक्टरकरिता एकूण ११ कोटी ९७ लाख ७१ हजार ३४९ एवढी विमा रक्कम आहे. जव्हार तालुक्यातील ९७४ शेतकºयांकडून ३७६.७३ हेक्टरवर १ कोटी १२ लाख १ हजार २७५ रकमेची विमा रक्कम आहे. मोखाडा तालुक्यातील ८२१ शेतकºयांनी ४४९.८४ हेक्टरवरील ९६ लाख ९६ हजार २६७ विमा रक्कम आहे. तर पालघर तालुक्यातील ५ हजार ५६३ शेतकºयांनी २३६२.६० हेक्टरकरिता १० कोटी ७४ लाख ९८ हजार ७९ विमा रक्कम आहे. तलासरी तालुक्यातील २ हजार ८४७ शेतकºयांनी ४ कोटी ९२ लाख ६९ हजार ८४८ विमा रक्कम आहे. वाडा तालुक्यातील चार मंडळांतल्या ९ हजार ७२२ शेतकºयांनी ५१६१.५० हेक्टर क्षेत्रावर २३ कोटी ४३ लाख ८ हजार ७७८ रक्कम आहे. वसईतल्या ३६६ शेतकºयांनी ९४ लाख ६० हजार ८७ रकमेचा विमा उतरवला आहे. तर विक्रमगड तालुक्यातील ४ हजार ५६८ शेतकºयांनी १० कोटी ४१ लाख ३५ हजार ९९८ रकमेचा विमा उतरविण्यात आला आहे. 

टॅग्स :palgharपालघरFarmerशेतकरी