शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

बुलेट ट्रेनसाठी वसईतील जमीन मोजणी अखेर पूर्ण, शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:46 IST

वसई - विरार शहर महानगरपालिका, शेतकरी, नागरिक यांच्या विरोधानंतर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचा वसईतील मार्ग खडतर झाला होता.

पारोळ : वसई - विरार शहर महानगरपालिका, शेतकरी, नागरिक यांच्या विरोधानंतर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचा वसईतील मार्ग खडतर झाला होता. मात्र या प्रकल्पाला मंजुरी मिळावी म्हणून शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले. अखेर बुलेट ट्रेनसाठी वसईतील जागेच्या मोजणीचे काम अखेर पूर्ण झाले. वसईतून सुमार ६९ गुंठे जागा आतापर्यंत संपादित करण्यात आल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली.मुंबई - अहमदाबाद या दोन मुख्य शहरांना जोडणाºया बुलेट ट्रेन प्रकल्पाची रूपरेषा आखण्यात आल्यानंतर मुंबईला बुलेट ट्रेनची गरजच काय आहे? असा सवाल करत वसईकर नागरिकांनी मुंबईतील लोकल व्यवस्था सुधारण्याचे शहाणपण शासनाने दाखवावे, अशी कोपरखळी लगावली होती. नागरिकांचा, वसई-विरार शहर महानगरपालिकेचा विरोध असतानाही शासनाला या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे संपादन करण्यात यश आले आहे. सध्या ६९ गुंठे जागेचे संपादन झाले.मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्प हा पालघर जिल्ह्यातून जात आहे. प्रकल्पाला पालघर जिल्ह्यासह विविध भागांतून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला होता. मात्र हळूहळू हा विरोध मावळत असून भूसंपादन करण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्याच्या ७३ गावांतून हा प्रकल्प जात असून त्यामध्ये वसईच्या २१ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांतील भूधारकांच्या गावनिहाय बैठका घेऊन विरोधाचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील एकूण २८८ हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाणार आहे. त्यामध्ये वसईच्या भागातून ३७ हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाणार आहे. सध्या पालघर जिल्ह्यातील ७३ गावांपैकी ६२ गावांमध्ये शेतकऱ्यांच्या व भूधारकांच्या संमतीने जमिनीची संयुक्त मोजणी केल्याची माहिती दिली.>बाधितांना वाºयावर सोडू नकाया प्रकल्पात बाधित होणाºया नागरिकांच्या पुनवर्सनाची जबाबदारी ही मुख्यत्वे शासनाची आहे. त्यामुळे प्रकल्प बाधितांना वाºयावर न सोडता त्यांच्या पुनवर्सनाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.