शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात श्रमजीवीचे आंदोलन; पंचनाम्यात प्रलंबित दावेधारकांसही समाविष्ट करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 23:00 IST

परतीच्या पावसाने वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

पालघर : परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खावटीचे धान्यही वाया गेले आहे. नुकसानीचे पंचनामे करताना जिल्हा प्रशासनाने वनपट्टे धारक तसेच प्रलंबित दावे धारकासही पंचनाम्यात सामावून घ्यावे, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात आली.

परतीच्या पावसाने भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पालघर, ठाणे, रायगड, आणि नाशिक येथील सर्व तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. परतीच्या पावसाने आपल्या जिल्ह्यातील शेतकरी अल्प भूधारक वनपट्टेधारक आणि प्रलंबित दावेदारांच्या भातपिकाचे भरमसाठ नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांच्या जगण्याचे एकमेव साधन असलेली शेती आणि त्या अनुषंगाने वर्षभरात साठवून ठेवले जात असलेल्या खावटी पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयाच्या हातून भात पिकच गेल्याने त्यांना शासनाने रेशन धान्य दुकानातून ३५ किलो धान्य विनामूल्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच २०१७-१८ वर्षामधील बाधित शेतकऱ्यांची प्रलंबित असलेली नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, अशी मागणीही यावेळी उपस्थित आ. श्रीनिवास वनगा यांनी केली. शासन पातळीवरून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी नियुक्त कृषीसेवक, तलाठी, ग्रामसेवक आदींच्या टीम गावातील ग्रामपंचायतीमध्ये बसून वरवरचे पंचनामे करीत असल्याची तक्रार श्रमजीवी तालुकाध्यक्ष दिनेश पवार यांनी केले. त्यामुळे प्रत्येक गावात येणाºया अधिकाºयांच्या टीमने तारीख देऊन मगच पंचनामे करण्यास यावे, असे सुचविले. यावेळी तहसीलदार संदीप शिंदे, गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, वनविभागाचे सानप, तालुका कृषी अधिकारी तरुण वैती, नायब तहसीलदार दीपक गडग आदींशी आ. वनगा, सेना तालुकाध्यक्ष विकास मोरे, सुरेश रेंजड आदीनी चर्चा केली.पंचनामे करून बाधितांना भरपाई मिळावीजव्हार : यावर्षी पाऊस काही थांबायचे नाव घेताना दिसत नाही. या परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेली पिके आडवी करून टाकली आहे. सततच्या पावसामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. म्हणून अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतीचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी श्रमजीवीच्या वतीने शुक्रवारी जव्हार तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. शेतकºयांनी कापून टाकलेल्या भात, वरई या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भात, नागली, वरई ही पिके तयार आहेत. मात्र नोव्हेंबर महिना लागला तरीही पाऊस रोजच संध्याकाळी हजेरी लावत असल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर शेकडो एकर पिके कापून टाकलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पंचनामे करण्याचे काम संथगतीनेवाडा : परतीच्या पावसाने वाडा तालुक्यातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जगण्याचे एकमेव साधन फक्त शेती असल्याने वर्षभराच्या खावटीचे नुकसान झाले आहे. शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश दिले असून पंचनामे करण्याचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर करून शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी श्रमजीवीने मोर्चा दरम्यान केली. तालुक्यातील शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून श्रमजीवीतर्फे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी केले.