शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जिल्ह्यात श्रमजीवीचे आंदोलन; पंचनाम्यात प्रलंबित दावेधारकांसही समाविष्ट करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 23:00 IST

परतीच्या पावसाने वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

पालघर : परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खावटीचे धान्यही वाया गेले आहे. नुकसानीचे पंचनामे करताना जिल्हा प्रशासनाने वनपट्टे धारक तसेच प्रलंबित दावे धारकासही पंचनाम्यात सामावून घ्यावे, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात आली.

परतीच्या पावसाने भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पालघर, ठाणे, रायगड, आणि नाशिक येथील सर्व तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. परतीच्या पावसाने आपल्या जिल्ह्यातील शेतकरी अल्प भूधारक वनपट्टेधारक आणि प्रलंबित दावेदारांच्या भातपिकाचे भरमसाठ नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांच्या जगण्याचे एकमेव साधन असलेली शेती आणि त्या अनुषंगाने वर्षभरात साठवून ठेवले जात असलेल्या खावटी पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयाच्या हातून भात पिकच गेल्याने त्यांना शासनाने रेशन धान्य दुकानातून ३५ किलो धान्य विनामूल्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच २०१७-१८ वर्षामधील बाधित शेतकऱ्यांची प्रलंबित असलेली नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, अशी मागणीही यावेळी उपस्थित आ. श्रीनिवास वनगा यांनी केली. शासन पातळीवरून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी नियुक्त कृषीसेवक, तलाठी, ग्रामसेवक आदींच्या टीम गावातील ग्रामपंचायतीमध्ये बसून वरवरचे पंचनामे करीत असल्याची तक्रार श्रमजीवी तालुकाध्यक्ष दिनेश पवार यांनी केले. त्यामुळे प्रत्येक गावात येणाºया अधिकाºयांच्या टीमने तारीख देऊन मगच पंचनामे करण्यास यावे, असे सुचविले. यावेळी तहसीलदार संदीप शिंदे, गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, वनविभागाचे सानप, तालुका कृषी अधिकारी तरुण वैती, नायब तहसीलदार दीपक गडग आदींशी आ. वनगा, सेना तालुकाध्यक्ष विकास मोरे, सुरेश रेंजड आदीनी चर्चा केली.पंचनामे करून बाधितांना भरपाई मिळावीजव्हार : यावर्षी पाऊस काही थांबायचे नाव घेताना दिसत नाही. या परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेली पिके आडवी करून टाकली आहे. सततच्या पावसामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. म्हणून अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतीचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी श्रमजीवीच्या वतीने शुक्रवारी जव्हार तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. शेतकºयांनी कापून टाकलेल्या भात, वरई या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भात, नागली, वरई ही पिके तयार आहेत. मात्र नोव्हेंबर महिना लागला तरीही पाऊस रोजच संध्याकाळी हजेरी लावत असल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर शेकडो एकर पिके कापून टाकलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पंचनामे करण्याचे काम संथगतीनेवाडा : परतीच्या पावसाने वाडा तालुक्यातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जगण्याचे एकमेव साधन फक्त शेती असल्याने वर्षभराच्या खावटीचे नुकसान झाले आहे. शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश दिले असून पंचनामे करण्याचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर करून शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी श्रमजीवीने मोर्चा दरम्यान केली. तालुक्यातील शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून श्रमजीवीतर्फे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी केले.