शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

कुर्झे धरणाची सुरक्षा वाऱ्यावरच; भूकंपाचाही धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:32 IST

वीज नाहीच, वीजपुरवठ्याअभावी सुरक्षा धोक्यात; कर्मचारी तैनात

तलासरी : तलासरी, डहाणू भागात पडलेला परतीचा पाऊस आणि सातत्याने बसणारे भूकंपाचे धक्के अशा वेळी आपत्तकालीन परिस्थिती उद्भवल्यास कुर्झे धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पण हे धरणाचे दरवाजे उघडण्यास आवश्यक वीज पुरवठाच धरणावर नाही, याचे सोयरसुतक अधिकाऱ्यांना नाही.कुर्झे धरणावर नऊ महिन्यापासून वीज नाही, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध करताच, धरणावर वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वीज विभागाने केला. पण चाळीस वर्षांपूर्वीच्या जीर्ण तारा तसेच डबघाईला आलेले ट्रान्सफॉर्मर यामुळे वीज पुरवठा सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे वीज विभागाचे उपअभियंता प्रशांत दोडे यांनी सांगितले.दापचरी दुग्ध प्रकल्पाची वीज व्यवस्था सार्वजनिक बांधकाम खात्याचे वीज विभाग बघते. त्याचा कारभार कल्याणवरून चालतो. या दुग्ध प्रकल्पात असलेल्या वीज तारा, ट्रान्सफार्मर हे चाळीस वर्षांपूर्वीचे आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी तसेच बदलण्यासाठी निधीची गरज आहे. पण हा निधी दुग्ध आयुक्तांकडून दिलाच जात नसल्याने प्रकल्पात अनेक वीज समस्या आहेत. प्रकल्पाची वीज पुरवठा वीज वितरण कंपनीकडे हस्तांतर करण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपासून दुग्ध विकास आयुक्तांकडे प्रलंबित आहे. वीज पुरवठा हस्तांतर करण्याचा प्रस्ताव असल्याने प्रकल्पाला वीज दुरु स्तीसाठी निधीही दिला जात नाही. ना निधी ना हस्तांतर यामुळे वीज पुरवठ्याअभावी धरणाची सुरक्षाच धोक्यात आली आहे.वीज पुरवठा होत नसल्याने आपत्कालीन स्थितीत धरणाचे दरवाजे उघडण्यास बांधकाम विभागाने धरणावर कर्मचारी नेमल्याचे प्रकल्प बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनिअर कुंदन वाघ यांनी सांगितले. पण आपत्तकालीन परिस्थितीत दरवाजे कर्मचाºयांकडून तत्काळ उघडतील का याबाबत त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. तर, दापचरी दुग्ध प्रकल्पाचे सहा. प्रकल्प अधिकारी एस.सी. चौधरी यांनी फोनच उचलला नाही.

टॅग्स :Damधरण