शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

कुर्झे धरणाची सुरक्षा वाऱ्यावरच; भूकंपाचाही धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:32 IST

वीज नाहीच, वीजपुरवठ्याअभावी सुरक्षा धोक्यात; कर्मचारी तैनात

तलासरी : तलासरी, डहाणू भागात पडलेला परतीचा पाऊस आणि सातत्याने बसणारे भूकंपाचे धक्के अशा वेळी आपत्तकालीन परिस्थिती उद्भवल्यास कुर्झे धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पण हे धरणाचे दरवाजे उघडण्यास आवश्यक वीज पुरवठाच धरणावर नाही, याचे सोयरसुतक अधिकाऱ्यांना नाही.कुर्झे धरणावर नऊ महिन्यापासून वीज नाही, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध करताच, धरणावर वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वीज विभागाने केला. पण चाळीस वर्षांपूर्वीच्या जीर्ण तारा तसेच डबघाईला आलेले ट्रान्सफॉर्मर यामुळे वीज पुरवठा सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे वीज विभागाचे उपअभियंता प्रशांत दोडे यांनी सांगितले.दापचरी दुग्ध प्रकल्पाची वीज व्यवस्था सार्वजनिक बांधकाम खात्याचे वीज विभाग बघते. त्याचा कारभार कल्याणवरून चालतो. या दुग्ध प्रकल्पात असलेल्या वीज तारा, ट्रान्सफार्मर हे चाळीस वर्षांपूर्वीचे आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी तसेच बदलण्यासाठी निधीची गरज आहे. पण हा निधी दुग्ध आयुक्तांकडून दिलाच जात नसल्याने प्रकल्पात अनेक वीज समस्या आहेत. प्रकल्पाची वीज पुरवठा वीज वितरण कंपनीकडे हस्तांतर करण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपासून दुग्ध विकास आयुक्तांकडे प्रलंबित आहे. वीज पुरवठा हस्तांतर करण्याचा प्रस्ताव असल्याने प्रकल्पाला वीज दुरु स्तीसाठी निधीही दिला जात नाही. ना निधी ना हस्तांतर यामुळे वीज पुरवठ्याअभावी धरणाची सुरक्षाच धोक्यात आली आहे.वीज पुरवठा होत नसल्याने आपत्कालीन स्थितीत धरणाचे दरवाजे उघडण्यास बांधकाम विभागाने धरणावर कर्मचारी नेमल्याचे प्रकल्प बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनिअर कुंदन वाघ यांनी सांगितले. पण आपत्तकालीन परिस्थितीत दरवाजे कर्मचाºयांकडून तत्काळ उघडतील का याबाबत त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. तर, दापचरी दुग्ध प्रकल्पाचे सहा. प्रकल्प अधिकारी एस.सी. चौधरी यांनी फोनच उचलला नाही.

टॅग्स :Damधरण