शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाइनच्या भीतीने यंदा कोकण नको रे बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 01:32 IST

वसई, विरार आणि नालासोपारा शहरांत कामधंद्यानिमित्त कोकणातील रहिवासी मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत.

पारोळ : कोरोनाच्या संकटाने अवघे राज्य ग्रासले आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता परप्रांतीय नागरिकांबरोबरच कोकणचा चाकरमानीदेखील मिळेल त्या वाहनाने गावाकडे रवाना होत असल्याचे चित्र मध्यंतरी दिसत होते. मात्र, गावाकडे जाताना मोजावे लागणारे दामदुप्पट भाडे, गावाकडील घरी जाण्याआधी तेथील शासनाने व्यवस्था केलेल्या ठिकाणी १४ दिवसांसाठी क्वारंटाइन होणे, यासारख्या नियमांमुळे कोकणवासी गावाकडे परतण्याऐवजी वसईतीलच घरी राहणे सध्या पसंत करत असल्याचे चित्र आहे.

वसई - विरारमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड आहे. वसई, विरार आणि नालासोपारा शहरांत कामधंद्यानिमित्त कोकणातील रहिवासी मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. इतर वेळेस गुण्यागोविंदाने राहणारे हे नागरिक मध्यंतरी कोरोनाच्या भीतीने मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी परतले आहेत. विरार पूर्वेतील कारगीलनगरमधील परिसरात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील रहिवासी मोठ्या संख्येने राहतात. वाढता उन्हाळा, पाणीटंचाई, लॉकडाउन आणि त्यात अन्नधान्यावाचून हे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यातूनच मध्यंतरीच्या काळात अनेक जण कोकणात परतले. पण, आता हा ओघ मंदावलेला दिसतो.

गावी जायचे असेल तर खासगी वाहनचालकाला जादा भाडे द्यावे लागते. प्रतिमाणूस १००० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच गावी गेल्यानंतर थेट घरात प्रवेश मिळत नाही, तर १४ दिवस तेथील प्रशासनाने व्यवस्था केलेल्या वास्तूत क्वारंटाइन व्हावे लागते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार