शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
7
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
8
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
9
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
10
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
11
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
12
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
13
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
14
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
15
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
16
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
17
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
18
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
19
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
20
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार

क्वारंटाइनच्या भीतीने यंदा कोकण नको रे बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 01:32 IST

वसई, विरार आणि नालासोपारा शहरांत कामधंद्यानिमित्त कोकणातील रहिवासी मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत.

पारोळ : कोरोनाच्या संकटाने अवघे राज्य ग्रासले आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता परप्रांतीय नागरिकांबरोबरच कोकणचा चाकरमानीदेखील मिळेल त्या वाहनाने गावाकडे रवाना होत असल्याचे चित्र मध्यंतरी दिसत होते. मात्र, गावाकडे जाताना मोजावे लागणारे दामदुप्पट भाडे, गावाकडील घरी जाण्याआधी तेथील शासनाने व्यवस्था केलेल्या ठिकाणी १४ दिवसांसाठी क्वारंटाइन होणे, यासारख्या नियमांमुळे कोकणवासी गावाकडे परतण्याऐवजी वसईतीलच घरी राहणे सध्या पसंत करत असल्याचे चित्र आहे.

वसई - विरारमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड आहे. वसई, विरार आणि नालासोपारा शहरांत कामधंद्यानिमित्त कोकणातील रहिवासी मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. इतर वेळेस गुण्यागोविंदाने राहणारे हे नागरिक मध्यंतरी कोरोनाच्या भीतीने मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी परतले आहेत. विरार पूर्वेतील कारगीलनगरमधील परिसरात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील रहिवासी मोठ्या संख्येने राहतात. वाढता उन्हाळा, पाणीटंचाई, लॉकडाउन आणि त्यात अन्नधान्यावाचून हे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यातूनच मध्यंतरीच्या काळात अनेक जण कोकणात परतले. पण, आता हा ओघ मंदावलेला दिसतो.

गावी जायचे असेल तर खासगी वाहनचालकाला जादा भाडे द्यावे लागते. प्रतिमाणूस १००० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच गावी गेल्यानंतर थेट घरात प्रवेश मिळत नाही, तर १४ दिवस तेथील प्रशासनाने व्यवस्था केलेल्या वास्तूत क्वारंटाइन व्हावे लागते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार