शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

क्वारंटाइनच्या भीतीने यंदा कोकण नको रे बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 01:32 IST

वसई, विरार आणि नालासोपारा शहरांत कामधंद्यानिमित्त कोकणातील रहिवासी मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत.

पारोळ : कोरोनाच्या संकटाने अवघे राज्य ग्रासले आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता परप्रांतीय नागरिकांबरोबरच कोकणचा चाकरमानीदेखील मिळेल त्या वाहनाने गावाकडे रवाना होत असल्याचे चित्र मध्यंतरी दिसत होते. मात्र, गावाकडे जाताना मोजावे लागणारे दामदुप्पट भाडे, गावाकडील घरी जाण्याआधी तेथील शासनाने व्यवस्था केलेल्या ठिकाणी १४ दिवसांसाठी क्वारंटाइन होणे, यासारख्या नियमांमुळे कोकणवासी गावाकडे परतण्याऐवजी वसईतीलच घरी राहणे सध्या पसंत करत असल्याचे चित्र आहे.

वसई - विरारमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड आहे. वसई, विरार आणि नालासोपारा शहरांत कामधंद्यानिमित्त कोकणातील रहिवासी मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. इतर वेळेस गुण्यागोविंदाने राहणारे हे नागरिक मध्यंतरी कोरोनाच्या भीतीने मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी परतले आहेत. विरार पूर्वेतील कारगीलनगरमधील परिसरात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील रहिवासी मोठ्या संख्येने राहतात. वाढता उन्हाळा, पाणीटंचाई, लॉकडाउन आणि त्यात अन्नधान्यावाचून हे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यातूनच मध्यंतरीच्या काळात अनेक जण कोकणात परतले. पण, आता हा ओघ मंदावलेला दिसतो.

गावी जायचे असेल तर खासगी वाहनचालकाला जादा भाडे द्यावे लागते. प्रतिमाणूस १००० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच गावी गेल्यानंतर थेट घरात प्रवेश मिळत नाही, तर १४ दिवस तेथील प्रशासनाने व्यवस्था केलेल्या वास्तूत क्वारंटाइन व्हावे लागते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार